शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

कोणत्या अधिकारी, कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे नोंदवले ? हायकोर्टाची पोलीस आयुक्तांना विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:30 IST

रोडवरील धोकादायक खड्यांसाठी जबाबदार असलेल्या कोणकोणत्या अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना केली.

ठळक मुद्देरोडवरील खड्यांमुळे होताहेत गंभीर अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रोडवरील धोकादायक खड्यांसाठी जबाबदार असलेल्या कोणकोणत्या अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना केली. तसेच, यावर येत्या ३ ऑक्टोबरपर्यंत अधिकारी व कंत्राटदारांच्या नावांसह विस्तृत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शहरामध्ये रोडवरील धोकादायक खड्यांमुळे गेल्या पाच महिन्यात झालेल्या अपघातात एका नागरिकांचा मृत्यू झाला तर, २९ नागरिक गंभीर व किरकोळ जखमी झाले. रोडवरील खड्डे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असल्यामुळे न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. गेल्या तारखेला न्यायालयाने या अपघात प्रकरणांत किती व कुणा-कुणाविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले याची माहिती सादर करण्याचे निर्देश डॉ. उपाध्याय यांना दिले होते. त्यानुसार, डॉ. उपाध्याय यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले, पण गुन्हे दाखल करण्यात आलेल्या अधिकारी व कंत्राटदारांची नावे त्यात नसल्यामुळे न्यायालयाचे समाधान झाले नाही. परिणामी, वरील आदेश देण्यात आला.प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, प्राणघातक अपघात प्रकरणात २२ एप्रिल २०१९ रोजी लकडगंज पोलिसांनी टिप्पर चालक व बीएसएनएल कंत्राटदाराविरुद्ध तर, अन्य एका अपघातानंतर २९ मे २०१९ रोजी सदर पोलिसांनी मंगळवारी झोनचे संबंधित अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदवला. तसेच, इतर २२ प्रकरणांतही विविध कलमांखाली एफआयआर नोंदविण्यात आले. परंतु, आरोपींची नावे न्यायालयाला सांगण्यात आली नाही. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात अ‍ॅड. राहील मिर्झा न्यायालय मित्र असून, सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी कामकाज पाहिले.अपघात कक्ष स्थापनवाहतूक विभागाने १ जानेवारी २०१८ रोजी अपघात कक्ष स्थापन केला. कक्षातील कर्मचारी अपघातस्थळी जाऊन आवश्यक अभ्यास केल्यानंतर उपाययोजनांसह अहवाल सादर करतात. नागरिकांना सूचना फलकांद्वारे अपघात प्रवण स्थळांची माहिती दिली जाते. आवश्यक उपाययोजना केल्यामुळे २०१७ व २०१८ सालच्या तुलनेत यावर्षी १७ प्राणघातक व ४४ अन्य अपघात कमी झाले. वाहतूक विभागाने जनमंच संस्थेच्या सहकार्याने ३२ धोकादायक खड्डे बुजवले. कंत्राटदारांना रोडची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. संबंधित विभागांना यासंदर्भात पत्रे पाठवली अशी माहितीदेखील डॉ. उपाध्याय यांनी न्यायालयाला दिली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPoliceपोलिसcommissionerआयुक्त