शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सावरकरांवर टीका करणाऱ्यांच्या कोणत्या पूर्वजांना फाशी झाली?

By योगेश पांडे | Updated: June 13, 2023 19:00 IST

Nagpur News स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख यांनी टीकास्त्र सोडले आहे.

योगेश पांडे नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख यांनी टीकास्त्र सोडले आहे. सावरकरांबाबत अनेक जण वाट्टेल ते बोलतात. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक जण शहीद झाले किंवा कारावास भोगला. मात्र या टीकाकारांच्या कोणत्या पुर्वजांना फाशी झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विश्व संवाद केंद्राच्या वतीने देण्यात येणाऱ्या देवर्षि नारद जयंती पत्रकारिता पुरस्कारांचे मंगळवारी वितरण झाले. त्यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.

चिटणवीस सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय पातळीवरील वृत्तनिवेदक रुबिका लियाकत, विश्व संवाद केंद्राचे प्रमुख अतुल पिंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. सेल्युलर जेलमध्ये यातना सहन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे की, माणूस कठीण प्रसंगाला किती संयमाने सामोरे जाऊ शकतो हे माणसाच्या आठवणी व संस्कारांवर अवलंबून असते. सावरकरांचे हे विचार पत्रकारिता जगतात काम करणाऱ्यांसाठी अतिशय योग्य आहेत. जर माध्यमे चांगली होणे अपेक्षित असेल तर नागरिकांनीदेखील सोशल मीडियावर जबाबदारीने वागले पाहिजे, असे आंबेकर म्हणाले. पत्रकारांनी नेहमीच सत्याच्या बाजूने असायला हवे. समाजात ५ ते १० टक्के लोक आहेत जे बदलत नाहीत आणि राष्ट्रहितासाठी चालत राहतात, तर तेवढेच लोक आहेत ज्यांना समाजाच्या हिताची आणि राष्ट्रहिताची पर्वा नाही. उर्वरित ८० टक्के लोक हे देशात कसे वातावरण आहे ते पाहून आपली भूमिका ठरवितात. त्यामुळे समाजात सकारात्मकता आणण्यासाठी नकारात्मक मनोवृत्ती असलेल्या ५ ते १० टक्के लोकांनाच बदलविणे आवश्यक आहे, असेदेखील ते म्हणाले.

धर्म, भाषा, पंथ, लिंग यापेक्षा देशाचे हित सर्वात महत्त्वाचे आहे. पत्रकारांनी नेहमीच देशहिताचे निर्णय घ्यावेत, असे आवाहन लियाकत यांनी केले. देशहिताच्या मुद्द्यांवर पत्रकारांनी निष्पक्ष राहणे चुकीचे ठरते. पत्रकारांनी आपले मुद्दे निर्भयपणे मांडले पाहिजेत, असे प्रतिपादन रुबिका लियाकत यांनी केले. प्रसाद बरवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दिपाली टेकाम यांनी संचालन केले, तर महानगर प्रचार प्रमुख ब्रजेश मानस यांनी आभार मानले. यावेळी तरुण भारतचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी संजय रामगिरीवार, एबीपी माझाचे विदर्भ ब्युरो चीफ रजत वशिष्ठ, लोकमतचे वरिष्ठ छायाचित्रकार विशाल महाकाळकर, सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर निखील चंदवानी व सिटीझन जर्नलिस्ट डॉ.लखेश्वर चंद्रवंशी यांचा सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्कारांचे स्वरूप होते.

राज्यघटनेतील स्पिरीट हरविले होतेयावेळी आंबेकर यांनी इतिहासाच्या मुद्द्यांवरदेखील भाष्य केले. राज्यघटनेतील स्पिरीट अनेक वर्ष हरविले होते. राज्यघटनेच्या ‘स्पिरीट’मध्ये गुरुकूलातील ज्ञान सांगितले आहे, भारतीय मूल्यांची भावना आहे. आता यावर काम होत आहे. काही लोक याला विरोध करत आहे, तर काही जण त्यांच्या राज्यातील गोष्टी लपविण्यावर भर देता आहेत. मात्र सत्य समोर येतेच, असे आंबेकर म्हणाले.

टॅग्स :Socialसामाजिक