शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

 कुठे खर्च झाले ‘ते’ लाखो रुपये ? विद्युत पुरवठा खंडित होण्यामागे नेमके काय कारण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2023 22:13 IST

Nagpur News दरवर्षी फांद्या कापण्यासाठी ३० लाखांचा खर्च होऊनही वेगाने वारा सुटला तर फांद्या पडण्याचे प्रमाण तसेच आहे. त्यामुळे ही रक्कम कुठे खर्च होते असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

नरेश डोंगरेनागपूर : शहरात जरा का वेगाची हवा आली किंवा पाऊस पडला तर वीज पुरवठा खंडित होतो. महावितरण याबाबत सांगते की, अमूक ठिकाणी वृक्ष किंवा त्याच्या फांद्या पडल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचा युक्तिवादही होतो. विशेष म्हणजे, विविध भागातील विजेच्या लाइनजवळ असलेले वृक्ष, फांद्यांची कटाई करण्यासाठी महावितरण आपल्या प्रत्येक डिव्हीजनमध्ये दरवर्षी थोडथोडका नव्हे ३० लाखांचा खर्च करते. त्यामुळे एवढा खर्च होऊनही वीज पुरवठा खंडित होण्यामागे तेच ते कारण सांगितले जात असेल तर हा निधी कुठे खर्च होतो, असा प्रश्न आहे.

बुधवारी पूर्व नागपुरात वादळी वारा आणि पावसामुळे सुमारे १५० झाडं पडली. ७० पेक्षा जास्त खंबे क्षतिग्रस्त झाले. यासाठी हवामान कारणीभूत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच तुरळक पावसामुळे वृक्ष वीजेच्या तारांवर पडले होते. या पार्श्वभूमीवर, 'लोकमत'च्या चमूने शहरातील अनेक भागात विजेच्या तारांची (लाइनची) पाहणी केली. त्यात अनेक लाइनच्या आजुबाजुला झाडं आणि फांद्या असून, त्याची छाटणीच झाली नसल्याचे पुढे आले. अनेक ठिकाणी डीपी उघडी दिसून आली. यावरून मिळणारा निधी कसा वापरला जातो आणि मेंटेनन्स किती गांभीर्याने घेतले जाते, त्याचा खुलासा झाला. 

एजन्सीवर मेहरनजरमेंटेनन्सचे काम खासगी एजन्सीकडून करून घेतले जाते. जम्पर आणि कंटक्टरला कसने, खुल्या डीपीला ठीक करणे आणि झाडांची, फांद्यांची छाटणी करण्याचे काम मान्सूनपूर्वीच करायचे असते. मात्र, यावर्षी एजन्सी नियुक्त करण्यासाठी आतापर्यंत निविदा जारी करण्यात आली नाही. जुन्याच एजन्सीला एक वर्षांची मुदतवाढ देऊन काम करण्यात आले. या एजन्सीच्या कामाचे ऑडिटसुद्धा होत नसल्याचा आरोप आहे.

अभियंत्यांचा अजब तर्क

महावितरणचे अभियंता नाव न छापण्याच्या अटीवर अजब तर्क देतात. ते म्हणतात की, शहरात मोठी 'हरियाली' आहे. छाटणी होते. मात्र, काही दिवसांतच झाड जसेच्या तसे होते. अनेकदा नागरिक वृक्ष तोडण्याच्या संशयामुळे छाटणीचा विरोध करतात. महापालिकेकडूनही आवश्यक सहकार्य मिळत नाही.------

टॅग्स :electricityवीज