शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

सायको लपलाय तरी कुठे?

By admin | Updated: February 7, 2017 01:57 IST

सायको हल्लेखोराच्या संबंधाने सकाळपासून रात्रीपर्यंत अफवांचे बॉम्ब फुटत असल्याने सामान्य नागरिकात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

नागरिकांत प्रचंड दहशत : अजनीत पुन्हा कथित हल्ल्याचा प्रयत्ननागपूर : सायको हल्लेखोराच्या संबंधाने सकाळपासून रात्रीपर्यंत अफवांचे बॉम्ब फुटत असल्याने सामान्य नागरिकात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सोमवारी दिवसभरात सायकोने अजनीतील महिलांवर हल्ला केल्याच्या पाच बातम्या पोलीस आणि पत्रकारांच्या कानावर आल्या. रात्री एक महिला पोलिसांकडे पोहचली. तिने चाकूहल्ल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, आपल्याला तक्रार नोंदवायची नाही, केवळ माहिती द्यायची होती, असे सांगितले. दुसरीकडे सायकोच्या संबंधाने चुकीची माहिती देणारे फोन कॉल्स येत असल्याने पोलिसांची धावपळ वाढली आहे. सायकोच्या दहशतीने संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला धडा शिकविण्याची तयारी केल्यामुळे उपराजधानीत नाथजोगी प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची भीती वाढली आहे.महिनाभरात सायकोने वेगवेगळ्या भागात हल्ला करून महिलांना जखमी केल्याप्रकरणी हुडकेश्वरमध्ये एक, अजनीत दोन आणि सक्करदऱ्यात चार असे एकूण सात गुन्हे दाखल झाले. मात्र, या घटनांच्या किती तरी अधिक पटीने शहरात अशा घटना घडल्याच्या रोज अफवा पसरत आहेत. एकट्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळपासून पाच ठिकाणी सायकोने हल्ला केल्याच्या बातम्या पोलिसांकडे पोहचल्या. कुकडे लेआऊट, त्रिशरण चौक, मानवता स्कूल, तुकडोजी चौक आणि बॅनर्जी लेआऊटमध्ये एका महिलेवर सायकोने चाकूहल्ला केल्याची माहिती अजनी पोलीस ठाण्यात कुणी तरी कळविली. प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन चौकशी केली. त्यातील श्वेता (वय ४०) नामक महिला तिच्या मामांसह अजनी ठाण्यात पोहचली. दुपारी ३.३० च्या सुमारास आपण अ‍ॅक्टिव्हाने जात असताना बाजूला पल्सरवर एक इसम आला. काळे कपडे आणि हेल्मेट घातलेल्या त्या तरुणाने आपल्यावर चाकू काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आपण प्रसंगावधान राखल्याने त्याचा वार हुकला आणि चाकू दुचाकीच्या सीटला लागल्यामुळे सीटचे रेक्झिन फाटले. त्यानंतर तो पळून गेला, असे तिने अजनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे अजनीचे द्वितीय पोलीस निरीक्षक पाटील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. आजूबाजूच्या दुकानदारांना विचारणा करण्यात आली. अशी काही घटना आमच्यासमोर घडली नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची माहिती तिखट-मीठ लावून इकडेतिकडे देण्यात आल्याने अल्पावधीतच या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेसी अजनीत पोहचले. त्यांनीही श्वेतासोबत घडलेल्या घटनेची शहानिशा करून घेतली. दरम्यान, विविध भागात हल्ले झाल्याच्या अफवा सुरूच होत्या. त्यामुळे उपायुक्त परदेसी यांनी तुकडोजी चौकात रात्री ८ वाजता ठिय्या मांडला. तेथून परिमंडळ ४ मधील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यासंबंधाच्या घटनांचा ते आढावा घेऊ लागले.(प्रतिनिधी)सायको पकडल्याचीही अफवा सायकोने हल्ला केल्याच्या अफवा पसरत असतानाच सोमवारी रात्री ८ च्या सुमारास व्हॉटस्अ‍ॅपवर सायकोला सक्करदऱ्यात पकडण्यात आल्याची बातमी व्हायरल झाली. त्यात कथित सायकोचा फोटोही होता. त्यामुळे सायकोच्या बातमीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली. पोलीस आणि पत्रकारांना ‘सायको पकडला का, कुठे आहे, कसा आहे, कसा पकडला...,’अशाप्रकारचे प्रश्न विचारणारे फोन येऊ लागले. फोन करणाऱ्यांमध्ये महिलांचीही संख्या मोठी होती. पत्रकारांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे शहानिशा केली. त्यानंतर त्याला अद्याप पकडण्यात आले नाही, केवळ अफवा आहे, असे पोलिसांकडून स्पष्ट झाले.पोलिसांची धावपळ वाढली दररोज होणारे हल्ले आणि सायकोची दहशत वाढतच चालल्याने आता पोलिसांनीही धावपळ वाढविली आहे. रविवारपर्यंत ४० पोलीस अधिकारी आणि १५० पोलीस कर्मचारी सायकोला पकडण्यासाठी धावपळ करीत होते. सोमवारी ही संख्या दुप्पट करण्यात आली. परिमंडळ ४ मधील दोन सहायक पोलीस आयुक्तांसह, सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, निरीक्षक दर्जाचे पोलीस अधिकारी, सर्व बीट मार्शल आणि डीबी पथके, साध्या वेशातील आणि गस्तीवरील पोलीस पथके, खुपिया पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी सायकोचा शोध घेत आहेत. नाकाबंदी करून, सार्वजनिक ठिकाणी सापळे लावून आणि खबऱ्यांच्या माध्यमातून सायकोच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलिसांनी धावपळ वाढविली आहे. धोका वाढला सायकोमुळे काळे कपडे आणि हेल्मेट घालून मोटरसायकलवर निघालेले अनेक जण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. रस्त्याने जाणारे-येणारेही त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत. पोलिसांसोबतच काही ठिकाणी उत्साही तरुणही अशा पेहरावात असलेल्या दुचाकीचालकांना थांबवून विचारपूस करीत आहेत. काही भागातील नागरिक लाठ्या घेऊन सायकोचा बंदोबस्त करण्याची भाषा वापरत असल्याने एखाद्या निष्पाप तरुणाचा बळी जाऊ शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी विविध भागात नागरिकांच्या बैठका घेऊन नागरिकांनी कायदा हाती नये म्हणून समुपदेशन करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. दरम्यान, यापूर्वी सहा घटनांमध्ये सायकोने सायंकाळनंतर हल्ला केला होता. तर, रविवारी रेखा पवार या महिलेने दुपारी १२.४५ तर सोमवारी श्वेता या महिलेने दुपारी ३.३० वाजता हल्ला केल्याची तक्रार नोंदविल्यामुळे सायकोची दहशत तीव्र झाली आहे. अनेक महिला-मुलींनी सकाळ- सायंकाळी फिरायला जाणे बंद केले आहे. पालकही बाहेर पडणाऱ्या मुलींना खबरदारीच्या टिप्स देत आहेत.