शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लतादीदींच्या आठवणींचा ‘जहाँ जाईएगा हमे पाईयेगा’

By admin | Updated: September 29, 2014 01:04 IST

लतादीदी म्हणजे रसिकांच्या गळ्यातील ताईतच. लतादीदींचे गीत ऐक ले नाही, असा एकही दिवस रसिकांचा जात नाही. कितीही व्यस्ततेत असलो तरी लतादीदींचे गाणे कधीतरी कानावर

कलासंगमचे आयोजन : स्वरधाराचे सादरीकरण नागपूर : लतादीदी म्हणजे रसिकांच्या गळ्यातील ताईतच. लतादीदींचे गीत ऐक ले नाही, असा एकही दिवस रसिकांचा जात नाही. कितीही व्यस्ततेत असलो तरी लतादीदींचे गाणे कधीतरी कानावर पडतेच आणि रसिक मग हे गाणे बराच काळ गुणगुणत राहतात. लतादीदींचा मधाळ स्वर लाभलेली अनेक गीते रसिकांच्या मनात अजरामर झाली आहेत. या स्वरकोकीळेच्या वाढदिवसानिमित्त दीदींच्या गीतांचा कार्यक्रम म्हटल्यावर रसिकांनी खच्चून गर्दी केली. कार्यक्रमाचे शीर्षकही जहाँ जाईयेगा हमे पाईयेगा असे होते. या कार्यक्रमात रसिकांनी दीदींच्या गीतांचा आनंद घेतला. कलासंगम संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंटिफिक सभागृहात हा कार्यक्रम स्वरधारा संस्थेच्यावतीने सादर करण्यात आला. गायक ईशा रानडे आणि योगेंद्र रानडे यांनी यावेळी गीते सादर करून रसिकांना आनंद दिला. श्वेता शेलगावकर यांचे निवेदन लतादीदींच्या अनेक आठवणींचा पट उलगडणारे होते. यानिमित्ताने गीतकार हसरत जयपुरी, प्रेम धवन, शैलेंद्र, मजरूह सुल्तानपुरी आदींच्या गीतांचा आनंद आणि सलिल चौधरीपासून अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, मदन मोहन, एस. डी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आदींच्या संगीताची जादू रसिकांनी अनुभविली. ‘आएगा आनेवाला...’ या गीताने ईशाने कार्यक्रमाला प्रारंभ केला. यानंतर काही स्वंतंत्र तर काही युगल गीते इशा आणि योगेंद्र यांनी सादर करून रसिकांची दाद घेतली. यावेळी ‘ओ सजना बरखा बहार आयी.., नैनो मे बदरा छाए.., सीने मे सुलगते है अरमां.., याद किया दिल ने.., वो चुप रहे तो...देखो रुठा ना करो.., रहे ना रहे हम, मनमोहना बडे झुठे, दिल की नजर से, मुझे कितना प्यार है तुमसे, धीरे धीरे चल.., अजी रुठकर अब कहाँ जाईयेगा, रसिक बलमा, व जब याद आये, ये जिंदगी उसिकी है...’ आदी गीतांचा गुलदस्ता रसिकांच्या पुढ्यात आला. कार्यक्रमाची संकल्पना प्रद्युम्न सहस्त्रभोजनी, सशेधन डॉ. सुहास देशपांडे, विवेक देशपांडे, ध्वनी पराग घुसे, रंगमंच राजेश अमीन, प्रकाशव्यवस्था सुनील व मायकेल यांची होती. वाद्यांवर गोविंद गडीकर, रघुनंदन परसतवार, अरविंद उपाध्ये, मोरेश्वर दहासहस्त्र, श्रीकांत पिसे, गौरव टांकसाळे, निशिकांत देशमुख, उज्ज्वला गोकर्ण यांनी साथसंगत केली. (प्रतिनिधी)