शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

जलयुक्त शिवारचा २० हजार कोटींचा निधी गेला कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:19 IST

राज्यकर्त्यांनी मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजनेवर गेल्या चार वर्षात २० हजार कोटींचा निधी खर्च केला. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा केला जात आहे.

ठळक मुद्देआकडेवारी जाहीर करण्याची मागणीकाँग्रेसची दुष्काळ पाहणी समिती विदर्भाच्या दौऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यकर्त्यांनी मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजनेवर गेल्या चार वर्षात २० हजार कोटींचा निधी खर्च केला. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे राज्यात गेल्या १५ ते २० वर्षात पडला नाही असा भीषण दुष्काळ आहे. राज्यातील २२ जिल्ह्यात तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई व गुरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धरणे कोरडी पडली, विहिरी व बोरवेल आटल्या. भूगर्भातील पाण्याची पातळी दिड ते दोन हजार फुटावर गेली आहे. लोकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. मग शासनाने जलयुक्त शिवार योजनेवर खर्च केलेला निधी गेला कुठे असा सवाल करून विधीमंडळातील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी जलयुक्त शिवारमुळे नेमका कोणता लाभ झाला. याची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी केली.विदर्भातील दुष्काळग्रस्त बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ अमरावती व नागपूर जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. सोमवारपासून या दौºयाला सुरूवात केली आहे. दौºयावर रवाना होण्यापूर्वी विजय वडेट्टीवार लोकमतशी बोलत होते.बुलडाणा जिल्ह्यातील ८५ टक्के गावे टंचाईग्रस्त आहेत. जून महिन्यात या जिल्ह्यातील शंभरटक्के गावे टंचाईग्रस्त होतील अशी परिस्थिती आहे. अशी गंभीर परिस्थिती असूनही शासनाने दुष्काळ निवारणासाठी एक रुपयाही खर्च केलेला नाही. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावे अशी आहेत की जिथे बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. बाब इतकी गंभीर आहे की त्या गावांमध्ये साधी नळयोजना सुद्धा नाही.जलव्यवस्थापनाची कोणतीही प्रभावी कामे जिल्ह्यात केली गेली नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील भूगर्भ जलपातळी खूप खालावली आहे. विहिरी, कूपनलिका तसेच तलाव सर्वकाही कोरडे पडले आहेत . दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊ . यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करू. बुलडाणा प्रमाणेच विदभार्तील सहा जिल्ह्यातील परिस्थिती कमी अधिक प्रमाणात सारखीच आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी व गुरांसाठी चारा छावण्याची तातडीने व्यवस्था करण्याची गरज आहे. परंतु सरकार दुष्काळाबाबत गंभीर दिसत नाही. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या दौºयानंतर मागणी केल्यानुसार सरकारने उपाययोजना केल्या नाही तर काँग्रेस तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर तीव्र आंदोलन उभारून सरकारला तातडीने उपाययोजना करण्यास भाग पाडू असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार