शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जप्त आंबे गेले कुठे ?

By admin | Updated: May 21, 2017 02:15 IST

कार्बाईडने अवैधपणे पिकविलेले आंबे जप्त करून भांडेवाडीत नष्ट केल्याचे आणि सुगंधित तंबाखू व निकृष्ट सुपारी विक्रेत्यांवर कारवाई

अन्न व औषध विभागाचा देखावा : फौजदारी कारवाई करा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कार्बाईडने अवैधपणे पिकविलेले आंबे जप्त करून भांडेवाडीत नष्ट केल्याचे आणि सुगंधित तंबाखू व निकृष्ट सुपारी विक्रेत्यांवर कारवाई करून जप्त केलेला माल जाळल्याचे अधिकारी सांगतात. पण पुराव्याअभावी त्यांच्या वक्तव्यात किती तथ्य आहे, हे पडताळून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. यंदा आंब्याच्या हंगामात अन्न व औषधी विभागाने केवळ एकदाच कळमना मार्केटमध्ये कार्बाईडने आंबे पिकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली आणि सुमारे १.६१ लाख रुपयांचा माल जप्त करून भांडेवाली डम्पिंग यार्डमध्ये नष्ट केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण जप्त केलेला माल अधिकाऱ्यांनी कुणाच्या उपस्थितीत नष्ट केला, याची नावे गुलदस्त्यात आहे. अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांना विचारणा केली असता काही सामाजिक संघटनांचे लोक यावेळी उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण यापूर्वीही अधिकाऱ्यांकडे मागणी केल्यानंतरही जप्त माल नष्ट केल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग कधीही दाखविले नाही, असा आरोप ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना केला. केकरे यांनी सांगितले, चार दिवसांपूर्वी जप्त केलेली निष्कृष्ट दर्जाची सुपारी आरोपीच्या प्रतिष्ठानमध्ये सील करून ठेवली असून नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. पुढे या सुपारीचे काय, हा गंभीर प्रश्न आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी विभागाने सुमारे आठ लाख रुपयांचा गुटखा व तंबाखू नष्ट केल्याची माहिती आहे. विभागाचे माल नष्ट केल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले असावे. तो व्हिडीओ अधिकाऱ्यांनी दाखवावा, असे संघटनांचे मत आहे. जप्त आंबे गेले कुठे ? तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी नागपुरात लगतच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत आहे. गुटखा माफियांसोबत अन्न व प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांचे असलेले लागेबांधे यामुळे शहरासह जिल्ह्यात अधिक प्रमाणात अवैध गुटखा विक्री होत आहे. कारवाईचा केवळ देखावा केला जात आहे. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांसह गुटखा शौकिनांचेही फावत आहे. तसेच खाद्यपदार्र्थांचे नमुने घेण्याच्या नावावर कारवाई केली जाते. सण आणि उत्सवाच्या काळात दरवर्षीच अन्न व प्रशासन विभाग कारवाईचा देखावा करत आपला हप्ता वाढवून घेतो, असा आरोप होत आहे. अपुरे कर्मचारी असल्याची ओरड न करता सहआयुक्तांनी कारवाई करण्याचा सपाटा लावावा, अशी ग्राहक संघटनांची मागणी आहे. दाल मिल, आॅईल मिल, बेसन मिल यांचे नमुने घेण्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात वसुली केली जाते. त्यामुळे याचा थेट परिणाम शरीरावर होत आहे. मात्र, यांचे काहीही सोयरसुतक अन्न व औषध प्रशासन विभागाला नाही, असा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे. सर्वच पानठेल्यांवर खर्रा उपलब्ध एका नामांकित कंपनीच्या गुटख्याची पुडी काळ्या बाजारात सुमारे ५० रुपयांत तसेच नागपुरातील सर्वच पानठेल्यांवर खर्रा सहजरीत्या उपलब्ध आहे. वर्षातून एकदाच कारवाई होत असल्यामुळे अधिकाऱ्यांचा धाक राहिला नाही. गुटख्याच्या विक्रीला अधिकाऱ्यांचे पूर्ण पाठबळ असल्यामुळे सर्रास विक्री होत असल्याचा आरोप होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी थातूरमातूर कारवाई करून जप्त केलेला माल व्यापाऱ्यांना परत करतात. जप्त आणि नष्ट केल्याचे सोंग करतात. लोकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ सुरू आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांचे कारण नेहमीचेच आहे. हे कारण चुकीचे आहे. कार्बाईडने पिकविलेल्या आंब्याची बाजारात विक्री होते. पण कारवाई शून्य आहे. कारवाई केलेल्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये धाक निर्माण होईल. - गजानन पांडे, विदर्भ प्रांत अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत.