शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

मोबदल्याचा धनादेश गेला कुठे?

By admin | Updated: April 6, 2016 03:21 IST

शासनाने भिवापूर तालुक्यातील किन्हीकला येथील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना मोबदला जाहीर केला.

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त विवंचनेत : भूसंपादन अधिकाऱ्याची माहिती देण्यास टाळाटाळमनोहर वानखेडे मालेवाडाशासनाने भिवापूर तालुक्यातील किन्हीकला येथील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना मोबदला जाहीर केला. येथील एका प्रकल्पग्रस्ताने त्या मोबदल्याच्या धनादेशाची उचल केली नाही. दुसरीकडे, या धनादेशाची उचल करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकारी देतात. त्यातच भूसंपादन अधिकारी टाळाटाळ करीत असून, माहिती अधिकारांतर्गत अपूर्ण माहिती देण्यात आली. त्यामुळे हा धनादेश गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भिवापूर तालुक्यातील किल्हीकला गाव गोसेखुर्द प्रकल्पबाधित आहे. येथील रहिवासी दयाराम पांडुरंग मेश्राम, तुकाराम पांडुरंग मेश्राम, हरिश्चंद्र पांडुरंग मेश्राम आणि मंजुळाबाई मोहन चहांदे यांचे नावे किन्हीकला शिवारात (पटवारी हलका नंबर - ७७) शेती (सर्वे नंबर - ६२ व ७३) आहे. या शेतीच्या सर्व दस्तऐवजांवर या चौघांची नावे नमूद आहेत. विशेष भूसंपादन अधिकारी नागपूर यांनी शासनाच्या आदेशान्वये सन १९९८ - ९९ मध्ये मेश्राम कुटुंबीयांच्या शेतीचे अधिग्रहण केले. या शेतीच्या अधिग्रहण आणि मोबदल्यासाठी भूसंपादन विभागाकडून त्यांना लेखी सूचनाही देण्यात आली होती. मोबदल्याची सूचना मिळताच मेश्राम कुटुंबीय मोबदल्याचा धनादेश घेण्यासाठी नागपूर येथील भूसंपादन अधिकारी यांच्या कार्यालयात गेले. तिथे मेश्राम कुटुंबीयांच्या नावे असलेला धनादेश नेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मेश्राम कुटुंबीयांनी कागदपत्रे दाखविण्याची मागणी करताच रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे कारण सांगून त्यांना परत पाठविले. पुढे मेश्राम कुटुंबीयांनी माहितीच्या अधिकारांतर्गत भूसंपादन अधिकाऱ्यांना माहिती मागितली. त्यात सातबारावरील नमूद वारसांना मोबदला का देण्यात आला नाही, मोबदल्याचा धनादेश कुणाच्या नावे दिला, त्या धनादेशाचा क्रमांक काय, तो कोणत्या बँकेचा धनादेश आहे आदी प्रश्नांच्या माधमातून माहिती विचारण्यात आली. भूसंपादन अधिकाऱ्याच्या कार्यालयातील नोंदवहीत सर्व मोबदलाधारकाची नावे आहेत. मात्र धनादेशाचा क्रमांक नमूद केला नाही. धनादेशाच्या क्रमांकाबाबत विचारणा करताच भूसंपादन अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मेश्राम कुटुंबीयांनी केला. मेश्राम कुटुंबीय फारसे शिक्षके नसल्याने त्याना सतत नागपूरच्या वाऱ्या करणे शक्य नाही. नागपूर शहराची त्यांना योग्य नाहिती नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून मोबदल्याचा धनादेश देण्यात यावा, अशी मागणी मेश्राम कुटुंबीयांनी केली आहे. दाद मागायची कुणाकडे?प्रशासनाने गोसेखुर्द प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेली मेश्राम कुटुंबियांची शेती ही त्यांची वडिलोपार्जित शेती आहे. अधिग्रहण प्रक्रियेनंतर त्यांच्याकडे हक्काचे उपजीविकेचे साधन उरले नाही. मेश्राम कुटुंबियांना या शेतीच्या मोबदल्यापोटी किमान पाच लाख रुपये मिळणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. भू संपादन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना मोबदल्याच्या धनादेशाची आधीच उचल करण्यात आल्याचे सांगितल्याने त्यांनी सुरुवातील भिवापूर तहसील कार्यालयात आणि नंतर उमरेड येथील उपविभागीय कार्यालयात चौकशी केली. परंतु, कुणीही त्यांची कैफियत ऐकून घेतली नाही. कार्यालयाचे खेटे घालणे सुरूमेश्राम कुटुंबातील बहुतांश सदस्य अशिक्षत किंवा अर्धशिक्षित आहेत. नागपूर हे जिल्ह्याचे ठिकाण असले तरी ते त्यांच्यासाठी नवीन आहे. ही मंडळी नागपूर शहरात फारसी येत नसल्याने त्यांना शहरातील रस्ते, कार्यालय व परिसर याची ओळख नाही. त्यामुळे त्यांना नागपूर येथील भू संपादन अधिकाऱ्याच्या कार्यालयात येण्यासाठी पदरमोड तर करावीच लागते. नागपुरात आल्यानंतर विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. संबंधित कार्यालयात आल्यानंतरही त्या कार्यालयातील कर्मचारी त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतात. या प्रकारामुळे या मंडळींचे संबंधित कार्यालयात खेटे घालणे कित्येक दिवसांपासून सुरू आहे.