शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

बर्ड फ्लू आला कुठून, पसरला किती?, युद्ध पातळीवर शाेध; रॅपिड रिस्पॉन्स टीम सक्रिय

By निशांत वानखेडे | Updated: March 9, 2024 18:47 IST

बायो सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

नागपूर : सेमिनरी हिल्सवरील विभागीय अंडी उबवणी केंद्रात बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ८५०० कोंबड्या मारण्यात आल्याने कुक्कुट पालन उद्योगात खळबळ उडाली आहे. हा विषाणू नेमका पोल्ट्रीत आला कसा आणि ताे पसरला किती, याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी झुनोटिक आजारांचे संशोधन करणाऱ्या २० जणांची ‘रॅपिड एक्शन टीम’ सक्रिय झाली असून विषाणूच्या स्राेतांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.

फुटाळा तलावालगत काहीजण उंटाची सफारी घडवून आणतात. ते उंट रात्री पोल्ट्री फार्मला लागून असेल्या रस्त्यावर बांधले जातात. सोबतच ज्या पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांना बर्डफ्लूची लागण झाली त्याच्या अगदी समोर घोड्यांचा देखील तबेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरपी) या दोन्ही संशयीत सोर्सचे नमुने घेऊन ते पुण्यातील आर. डी. आय. लॅबला पाठविणार आहे. त्यामुळे ही टीम विषाणूच्या जनुकीय संक्रमणावरही लक्ष केंद्रीत करणार आहे.

१० किलोमिटर परिघात सर्वेक्षण

अंडी उबवणी केंद्रात बर्डफ्लूची लागण झाल्यानंतर एक्टिव्ह मोडवर आलेली रॅपिड रिस्पॉन्स टीम १० किलोमिटरच्या परिघात सर्वेक्षण करणार आहे. माहितीनुसार सध्या १ किमीच्या परिसरातील काेंबड्या मारण्यात आल्या आहेत. ३ किमीपर्यंतच्या पक्ष्यांचे नमुने गाेळा करण्यात आले आहेत. विषाणूचे जनुकीय संक्रमण झाल्यास धोका वाढू शकतो, म्हणून पुढचा महिनाभर ही टीम या १० किलोमिटरच्या परिघातील पाळीव प्राणी, स्थलांतरीत पक्षी, कोंबड्यांचे नमुने तातडीने पुणे येथील रिजनल डिसिज इन्व्हेस्टिगेशन लॅब (आरडीआयएल) आणि भोपाळ येथील हाय सेक्युरिटी लॅब (एचएसएल) ला पाठविले जाणार आहेत.

नवापूर साथ नियंत्रणात नागपूरचे योगदान

महाराष्ट्रात सर्वांत प्रथम २००६ मध्ये बर्डफ्लूच्या साथीचा उद्रेक झाला होता. गुजरातच्या सिमेवरील नंदूरबार-धुळे येथील नवापूर येथे बर्डफ्लूचा उद्रेक झाला होता. त्यावेळी नागपुरातील पशुवैद्यक संशोधकांच्या २५ हून अधिक जणांच्या टीमने ही साथ आटोक्यात आणली होती. नागपूरच्या टीमकडे हा अनुभव असल्याने अंडी उबवणूक केंद्रातील साथही आटोक्यात येण्याची आशा आहे.

पॅनिक होण्याचे कारण नाही

नवापूर साथ नियंत्रणात नागपूर पशुवैद्यकांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे बर्डफ्लूचा ताजा उद्रेक पाहता केंद्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईननुसार सर्व टिम आणि संशोधकांना सक्रिय करण्यात आले आहे. अर्थव्यवस्थेत पोल्ट्री उद्योगाचे योगदान मोठे आहे. त्यामुळे तुर्तास पॅनिक होण्याचे कारण नाही. -डॉ. अजय पोहरकर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद

पशुसंवर्धन विभागाने बर्ड फ्लूच्या शाेधासाठी रॅपिड रिस्पाॅन्स टीम तयार केली आहे. त्यानुसार सर्व संस्थांना निर्देश देण्यात आले आहेत. सर्व केंद्राची तपासणी सुरू असून आतापर्यंत कुठेही पक्ष्यांचा मृत्यु झाल्याची नाेंद मिळाली नाही. - मंजुषा पुंडलिक, पशुसंवर्धन आयुक्त, नागपूर

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूnagpurनागपूर