शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भंगारातील २० बस गेल्या कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:18 IST

महापालिकेच्या परिवहन विभागाच्या २३० बस खापरी व हिंगणा येथील डेपोत गेल्या सात वर्षापासून भंगारात पडून आहेत. अनेक बसचे टायर, सीट, स्पेअर पार्ट, तर काही बसचे इंजित बेपत्ता आहे. एवढेच नव्हे तर २० बसचा शोध घेतल्यानंतरही ठावठिकाणा न लागल्याने परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे७ वर्षापासून २३० बस भंगारात : अनेक गाड्यांचे स्पेअर पार्ट, चाक, इंजिन बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाच्या २३० बस खापरी व हिंगणा येथील डेपोत गेल्या सात वर्षापासून भंगारात पडून आहेत. अनेक बसचे टायर, सीट, स्पेअर पार्ट, तर काही बसचे इंजित बेपत्ता आहे. एवढेच नव्हे तर २० बसचा शोध घेतल्यानंतरही ठावठिकाणा न लागल्याने परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.मागील दहा वर्षापूर्वी महापालिकेने शहर बस सेवा चालविण्याचा निर्णय घेतला. ही जबाबदारी व्हीएनआयएल या खासगी कंपनीकडे सोपविली होती. आॅपरेटरने २३० बसेस सुरू करावयाच्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम अंतर्गत महापालिकेला मिळालेल्या ३०० बस खासगी आॅपरेटरक डे देण्यात आल्या.अशा प्रकारे शहरात ५३० बस सुरू करण्यात करण्यात येणार होत्या. परिवहन विभागाचा कारभार व्यवस्थित चालावा यांसाठी नागपूर महानगर परिवहन लिमिटेड (एनएमपीएल)ची स्थापना करण्यात आली. मात्र एमएमपीएलला परिवहन विभागाच्या कारभारात सुधारणा करण्यात यश मिळालेले नाही. प्परिणामी नवीन २३० बस भंगारात टाकाव्या लागल्या.शहर बस सेवेची महापालिकेने जबाबदारी स्वीकारण्याची प्रक्रिया १९९४ साली सुरू झाली होती. २००१ ते २००६ या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या शहर बस सेवेत २०.६८ कोटींचा तोटा झाला होता. याचा भार महापालिकेने स्वीकारावा, अशी मागणी परिवहन विभागाने केली होती. परंतु महापालिकेने नुकसान भरपाई देण्याला विरोध दर्शविला. त्यानतंर २००७ मध्ये महापालिकेला शहर बस सेवा चालविण्याला परवानगी दिली. त्यानुसार १०आॅक्टोबर २००७ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहर बस सेवेची जबाबदारी खासगी आॅपरेटरकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २००७ मध्ये महापालिका व व्हीएनआयएल यांच्यात करार झाला होता.करारानुसार व्हीएनआयएलला २३० बस शहरात सुरू करावयाच्या होत्या. यात १५० मोठ्या तर ८० मिनी बसचा समावेश होता. यातील २०० बस आॅपरेटरने खरेदी करावयाच्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारकडून ३०० बस महापालिकेला प्राप्त झाल्या. यातील २४० बस आॅपरेटरक डे सोपविण्यात आल्या. ६३.६० कोटीच्या या प्रकल्पात केंद्र सरकारचा वाटा ५० टक्के, २० टक्के राज्य सरकार तर ३० टक्के वाटा महापालिकेला उचलावयाचा होता. प्रकल्पानुसार ५३० बस शहरात धावणार होत्या. परंतु पूर्ण बस शहरात धावल्याच नाही. यातील २४० बस भंगारात पडून आहेत.भंगार समितीची आज बैठकभंगारात पडून असलेल्या २३० बसची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या परिवहन समितीने समितीचे उपसभापती प्रवीण भिसीकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. यात नितीन साठवणे व अर्चना पाठक यांचा समावेश आहे. गुुरुवारी समितीची बैठक आयोजित केली आहे. यात भंगार बसचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती प्रवीण भिसीकर यांनी दिली.जबाबदार कोण ?परिवहन विभागाच्या खापरी व हिंगणा येथील डेपोमध्ये भंगारातील बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत. येथे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे. असे असूनही बसचे स्पेअरपार्ट, टायर चोरीला गेले आहे. एवढेच नव्हेतर काही गाड्यांना इंजिनही नाही. यात महापालिकेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर