शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भंगारातील २० बस गेल्या कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:18 IST

महापालिकेच्या परिवहन विभागाच्या २३० बस खापरी व हिंगणा येथील डेपोत गेल्या सात वर्षापासून भंगारात पडून आहेत. अनेक बसचे टायर, सीट, स्पेअर पार्ट, तर काही बसचे इंजित बेपत्ता आहे. एवढेच नव्हे तर २० बसचा शोध घेतल्यानंतरही ठावठिकाणा न लागल्याने परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे७ वर्षापासून २३० बस भंगारात : अनेक गाड्यांचे स्पेअर पार्ट, चाक, इंजिन बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाच्या २३० बस खापरी व हिंगणा येथील डेपोत गेल्या सात वर्षापासून भंगारात पडून आहेत. अनेक बसचे टायर, सीट, स्पेअर पार्ट, तर काही बसचे इंजित बेपत्ता आहे. एवढेच नव्हे तर २० बसचा शोध घेतल्यानंतरही ठावठिकाणा न लागल्याने परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.मागील दहा वर्षापूर्वी महापालिकेने शहर बस सेवा चालविण्याचा निर्णय घेतला. ही जबाबदारी व्हीएनआयएल या खासगी कंपनीकडे सोपविली होती. आॅपरेटरने २३० बसेस सुरू करावयाच्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम अंतर्गत महापालिकेला मिळालेल्या ३०० बस खासगी आॅपरेटरक डे देण्यात आल्या.अशा प्रकारे शहरात ५३० बस सुरू करण्यात करण्यात येणार होत्या. परिवहन विभागाचा कारभार व्यवस्थित चालावा यांसाठी नागपूर महानगर परिवहन लिमिटेड (एनएमपीएल)ची स्थापना करण्यात आली. मात्र एमएमपीएलला परिवहन विभागाच्या कारभारात सुधारणा करण्यात यश मिळालेले नाही. प्परिणामी नवीन २३० बस भंगारात टाकाव्या लागल्या.शहर बस सेवेची महापालिकेने जबाबदारी स्वीकारण्याची प्रक्रिया १९९४ साली सुरू झाली होती. २००१ ते २००६ या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या शहर बस सेवेत २०.६८ कोटींचा तोटा झाला होता. याचा भार महापालिकेने स्वीकारावा, अशी मागणी परिवहन विभागाने केली होती. परंतु महापालिकेने नुकसान भरपाई देण्याला विरोध दर्शविला. त्यानतंर २००७ मध्ये महापालिकेला शहर बस सेवा चालविण्याला परवानगी दिली. त्यानुसार १०आॅक्टोबर २००७ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहर बस सेवेची जबाबदारी खासगी आॅपरेटरकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २००७ मध्ये महापालिका व व्हीएनआयएल यांच्यात करार झाला होता.करारानुसार व्हीएनआयएलला २३० बस शहरात सुरू करावयाच्या होत्या. यात १५० मोठ्या तर ८० मिनी बसचा समावेश होता. यातील २०० बस आॅपरेटरने खरेदी करावयाच्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारकडून ३०० बस महापालिकेला प्राप्त झाल्या. यातील २४० बस आॅपरेटरक डे सोपविण्यात आल्या. ६३.६० कोटीच्या या प्रकल्पात केंद्र सरकारचा वाटा ५० टक्के, २० टक्के राज्य सरकार तर ३० टक्के वाटा महापालिकेला उचलावयाचा होता. प्रकल्पानुसार ५३० बस शहरात धावणार होत्या. परंतु पूर्ण बस शहरात धावल्याच नाही. यातील २४० बस भंगारात पडून आहेत.भंगार समितीची आज बैठकभंगारात पडून असलेल्या २३० बसची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या परिवहन समितीने समितीचे उपसभापती प्रवीण भिसीकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. यात नितीन साठवणे व अर्चना पाठक यांचा समावेश आहे. गुुरुवारी समितीची बैठक आयोजित केली आहे. यात भंगार बसचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती प्रवीण भिसीकर यांनी दिली.जबाबदार कोण ?परिवहन विभागाच्या खापरी व हिंगणा येथील डेपोमध्ये भंगारातील बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत. येथे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे. असे असूनही बसचे स्पेअरपार्ट, टायर चोरीला गेले आहे. एवढेच नव्हेतर काही गाड्यांना इंजिनही नाही. यात महापालिकेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर