शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

कधी होणार चित्रनगरी ?

By admin | Updated: November 22, 2014 02:21 IST

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. केवळ नागरी समस्यांचाच विचार न करता नागरिकांच्या उन्नयनाचा आणि त्यांचे ...

राजेश पाणूरकर नागपूर महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. केवळ नागरी समस्यांचाच विचार न करता नागरिकांच्या उन्नयनाचा आणि त्यांचे राहणीमान उंचाविण्यासाठी हे राज्य प्रयत्न करणारे आहे, असा प्रचार केला जातो. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्राची स्वत:ची ओळख असणारी संस्कृती आहे. ही भूमी आध्यात्मिक परंपरेची आणि कलांवर प्रेम करणाऱ्या संवेदनशील नागरिकांची आहे. त्यामुळेच कदाचित शासनाला राज्याचे सांस्कृतिक धोरण तयार करण्याची गरज वाटली. पण संस्कृतीबाबत शासनाने अद्यापही गांभीर्य दाखविले नाही. सांस्कृतिक धोरणात नागपूर-विदर्भाची बाजू पडतीच आहे. त्यात नागपुरात चित्रनगरीची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली पण सांस्कृतिक धोरणाचीच पायमल्ली सुरू असताना चित्रनगरी (फिल्मसिटी)ची निर्मिती हा गेल्या पाच वर्षात केवळ फार्सच ठरला आहे. सांस्कृतिक धोरण तयार करताना विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समितीत समावेश करण्यात आला. समितीने सांस्कृतिक धोरण तयार केले. यशवंतराव चव्हाण यांचे सांस्कृतिक महाराष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे उद्दिष्ट या धोरणामागे होते. पण या धोरणात विदर्भाच्या वाट्याला नेहमीप्रमाणेच काही आले नाही. चित्रनगरीची निर्मिती करण्याची घोषणा मात्र नागपूरकरांना सुखावणारी होती. चित्रनगरी झाल्यावर चित्रपटांचे चित्रीकरण येथे होईल आणि त्यानिमित्ताने उद्योगनिर्मितीही होईल, अशी अपेक्षा होती. चित्रपटनिर्मितीत आता नागपूरही मागे राहिलेले नाही. पण सांस्कृतिक धोरण तयार झाल्यावर गेल्या चार वर्षात शासनातर्फे धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आनंदीआनंदच आहे.कुठलाच ठोस निर्णय घेण्यात शासन पूर्णपणे अपयशी ठरले. सांस्कृतिक मंत्री विदर्भाचे असताना विदर्भवासीयांच्या अपेक्षांना सांस्कृतिक क्षेत्रातही निराशाच हाती आली. हा विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतो असे सांगून सांस्कृतिक मंत्र्यांनी पळवाट शोधली. गेल्या तीन वर्षात राज्य सरकार छोटीशीही तरतूद करू शकले नाही. लोकप्रतिनिधींच्या सांस्कृतिक शिक्षणावर मात्र आठ लाख रुपये खर्च करण्यात आले. याशिवाय एक गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. याशिवाय शासकीय स्तरावर धोरणाचा प्रारंभच करण्यात आला नाही. नागपूरच्या चित्रनगरीसाठी १० कोटीची तरतूद करण्यात येईल, अशा वल्गना, आश्वासनांनी विदर्भवासीयांच्या मागणीला खो देण्याचा प्रयत्न झाला. गेल्या दोन वर्षात तर समितीच्या आढावा बैठकाही झाल्याच नाहीत. समिती सदस्यच या धोरणाबाबत अनभिज्ञ आहे. नव्या सरकारने चित्रनगरीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सांस्कृतिक क्षेत्रातून करण्यात येत आहे.