शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
5
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
6
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
7
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
8
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
9
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
10
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
11
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
12
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
13
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
14
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
15
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
17
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
18
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
20
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!

कधी होणार चित्रनगरी ?

By admin | Updated: November 22, 2014 02:21 IST

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. केवळ नागरी समस्यांचाच विचार न करता नागरिकांच्या उन्नयनाचा आणि त्यांचे ...

राजेश पाणूरकर नागपूर महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. केवळ नागरी समस्यांचाच विचार न करता नागरिकांच्या उन्नयनाचा आणि त्यांचे राहणीमान उंचाविण्यासाठी हे राज्य प्रयत्न करणारे आहे, असा प्रचार केला जातो. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्राची स्वत:ची ओळख असणारी संस्कृती आहे. ही भूमी आध्यात्मिक परंपरेची आणि कलांवर प्रेम करणाऱ्या संवेदनशील नागरिकांची आहे. त्यामुळेच कदाचित शासनाला राज्याचे सांस्कृतिक धोरण तयार करण्याची गरज वाटली. पण संस्कृतीबाबत शासनाने अद्यापही गांभीर्य दाखविले नाही. सांस्कृतिक धोरणात नागपूर-विदर्भाची बाजू पडतीच आहे. त्यात नागपुरात चित्रनगरीची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली पण सांस्कृतिक धोरणाचीच पायमल्ली सुरू असताना चित्रनगरी (फिल्मसिटी)ची निर्मिती हा गेल्या पाच वर्षात केवळ फार्सच ठरला आहे. सांस्कृतिक धोरण तयार करताना विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समितीत समावेश करण्यात आला. समितीने सांस्कृतिक धोरण तयार केले. यशवंतराव चव्हाण यांचे सांस्कृतिक महाराष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे उद्दिष्ट या धोरणामागे होते. पण या धोरणात विदर्भाच्या वाट्याला नेहमीप्रमाणेच काही आले नाही. चित्रनगरीची निर्मिती करण्याची घोषणा मात्र नागपूरकरांना सुखावणारी होती. चित्रनगरी झाल्यावर चित्रपटांचे चित्रीकरण येथे होईल आणि त्यानिमित्ताने उद्योगनिर्मितीही होईल, अशी अपेक्षा होती. चित्रपटनिर्मितीत आता नागपूरही मागे राहिलेले नाही. पण सांस्कृतिक धोरण तयार झाल्यावर गेल्या चार वर्षात शासनातर्फे धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आनंदीआनंदच आहे.कुठलाच ठोस निर्णय घेण्यात शासन पूर्णपणे अपयशी ठरले. सांस्कृतिक मंत्री विदर्भाचे असताना विदर्भवासीयांच्या अपेक्षांना सांस्कृतिक क्षेत्रातही निराशाच हाती आली. हा विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतो असे सांगून सांस्कृतिक मंत्र्यांनी पळवाट शोधली. गेल्या तीन वर्षात राज्य सरकार छोटीशीही तरतूद करू शकले नाही. लोकप्रतिनिधींच्या सांस्कृतिक शिक्षणावर मात्र आठ लाख रुपये खर्च करण्यात आले. याशिवाय एक गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. याशिवाय शासकीय स्तरावर धोरणाचा प्रारंभच करण्यात आला नाही. नागपूरच्या चित्रनगरीसाठी १० कोटीची तरतूद करण्यात येईल, अशा वल्गना, आश्वासनांनी विदर्भवासीयांच्या मागणीला खो देण्याचा प्रयत्न झाला. गेल्या दोन वर्षात तर समितीच्या आढावा बैठकाही झाल्याच नाहीत. समिती सदस्यच या धोरणाबाबत अनभिज्ञ आहे. नव्या सरकारने चित्रनगरीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सांस्कृतिक क्षेत्रातून करण्यात येत आहे.