शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

कधी येईल स्वस्ताई ?

By admin | Updated: August 3, 2015 02:56 IST

राज्य शासनाने एलबीटी रद्द केला, पण त्याचा फायदा ग्राहकांना मिळत असल्याचे दिसून येत नाही.

एलबीटी कागदोपत्रीच रद्द : ग्राहकांवर महागाईचा बोजा कायमचनागपूर : राज्य शासनाने एलबीटी रद्द केला, पण त्याचा फायदा ग्राहकांना मिळत असल्याचे दिसून येत नाही. आॅटोमोबाईल क्षेत्र, टायर-ट्यूब तसेच स्थानिक घरगुती वस्तूंच्या बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांनी वस्तूंचे भाव अद्यापही कमी केले नाहीत. एलबीटी असो वा नसो, ग्राहकांना वाढीव भावातच वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. एलबीटी कागदोपत्रीच रद्द झाल्याचे सदर प्रतिनिधीने बाजारपेठेचा फटका मारल्याचे दिसून आले. कॉस्मेटिक, साबण अथवा ब्रॅण्डेड चहाच्या पॅकिंगवर किंमत सर्व करासह असे छापून येत असले तरीही ग्राहकांकडून एलबीटीची आकारणी सुरूच आहे. १आॅगस्टपासून एलबीटी रद्द झाल्याने यापुढे कोणत्याही स्थानिक कराची आकारणी होणार नाही, असा अर्थ होतो. पण विक्रेत्यांनी स्थानिक कर आकारूनच विक्री सुरू ठेवली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर व्यापाऱ्यांनी सांगितले की, व्यवसाय करताना नियमितपणे मालाची साठवणूक करावी लागते. तो माल लवकर विकेल याची गॅरंटी घेता येत नाही. ३१ जुलैपूर्वी सर्व माल विकला गेला असेही नाही. त्यामुळे काही दिवसांपर्यंत एलबीटी छुपी आकारणी करावीच लागेल, असे व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.मॉल वा मोठ्या दुकानांमध्ये संगणकाद्वारे मालाचे बिल देत असेल तर एलबीटी रद्द झाल्याचे शासनाचे परिपत्रक मिळाले नसल्याचे कारण पुढे करीत ते ग्राहकांकडून एलबीटीची वसुली अद्यापही करीत आहेत. नफा कमविणे, हा व्यापाऱ्यांचा त्यांचा मूळ उद्देश असल्यामुळे बाजारात एलबीटीची छुपी आकारणी काही महिने सुरू राहणार असल्याचे दिसून येते. अनावश्यक कर वसुली करणाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना केली. एलबीटी रद्द करण्याचा शासन निर्णय असला तरीही ग्राहकांना फायद्यासाठी काही दिवस वाट बघावी लागेल, हे नक्की.(प्रतिनिधी)