शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

‘त्या’ वाघांचा वनवास कधी संपणार?

By admin | Updated: July 8, 2014 01:20 IST

गत पाच वर्षांपासून वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद भोगत असलेल्या ‘त्या’ वाघांच्या सुटकेची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र केवळ ‘रेडिओ कॉलर’च्या प्रतीक्षेत ‘त्या’ वाघांना पिंजऱ्यात कैद भोगावी लागत आहे.

पेंचच्या एन्क्लोजरमध्ये कै द : वन विभाग ‘रेडिओ कॉलर’च्या प्रतीक्षेत नागपूर : गत पाच वर्षांपासून वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद भोगत असलेल्या ‘त्या’ वाघांच्या सुटकेची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र केवळ ‘रेडिओ कॉलर’च्या प्रतीक्षेत ‘त्या’ वाघांना पिंजऱ्यात कैद भोगावी लागत आहे. दुसरीकडे शेवटी या निरपराध वाघांचा वनवास कधी संपणार? असा वन्यजीवप्रेमी प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. विशेष म्हणजे, या एन्क्लोजरमधील तिन्ही वाघांची फारच रोमांचक हकीकत आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी तिन्ही बछडे आपल्या आईपासून जंगलात भटकले होते. यानंतर वन अधिकाऱ्यांनी या बछड्यांना आपल्या ताब्यात घेऊन सुरुवातीला त्यांना बोर अभयारण्यातील पिंजऱ्यात ठेवण्यात आले. येथे त्यांनी सुमारे तीन वर्षे कैद भोगली. यानंतर त्यांना पेंचमधील एन्क्लोजरमध्ये स्थलांतरित करण्यात आले. येथे ते गत दोन वर्षांपासून राहात असून, आता ते सुमारे पाच वर्षांचे झाले आहेत. माहिती सूत्रानुसार, गत काही दिवसांपूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी यांनी पुढाकार घेऊन त्यांना जंगलात सोडण्यासंबंधी हालचाली सुरू केल्या. तिघांपैकी दोन वाघिणींना रेडिओ कॉलर लावून पेंचच्या जंगलात सोडण्याचा निर्णयही घेण्यात आला; शिवाय ‘रेडिओ कॉलर’चा आॅर्डरही देण्यात आला. मात्र गत सहा महिन्यांपासून रेडिओ कॉलर वन विभागापर्यंत पोहोचलेली नाही. यासंबंधी मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी केवळ रेडिओ कॉलरसाठी विलंब होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, रेडिओ कॉलर विदेशातून मागणी करावी लागत असून, त्यासाठी वन विभागाने संबंधित संस्थेला आॅर्डर दिली आहे. त्यानुसार रेडिओ कॉलर पोहोचताच, वाघांची सुटका केली जाईल. (प्रतिनिधी)