शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकांची ‘एमएसपी’ जाहीर करणार कधी? ‘सीएसीपी’ची प्रक्रिया ३१ मार्चपूर्वीच पूर्ण

By सुनील चरपे | Updated: May 29, 2023 11:14 IST

नियाेजनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

सुनील चरपे

नागपूर : खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ही दरवर्षी एप्रिलच्या शेवटी अथवा मेच्या सुरुवातीला जाहीर हाेणे अपेक्षित असताना केंद्र सरकार चालू खरीप हंगामाचे एमएसपी दर जाहीर करण्यात दीर्घ दिरंगाई करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिकांचे नियाेजन करण्यात अडचणी येत असल्याने एमएसपी नेमकी कधी जाहीर केली जाणार? असा प्रश्न बाजार अभ्यासक गाेविंद वैराळे, विजय जावंधिया यांच्यासह अभ्यासू शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

केंद्र सरकार दरवर्षी १४ खरीप पिकांची एमएसपी जाहीर करत असून, सीएसीपी (कमिशन फाॅर ॲग्रीकल्चर काॅस्ट ॲण्ड प्राइजेस)च्या माध्यमातून या पिकांचा राज्यनिहाय उत्पादन खर्च जाणून घेण्याची प्रक्रिया जानेवारीपासून सुरू केली जाते. सीएसीपी या पिकांची एमएसपी ठरवून त्यांचा अहवाल दरवर्षी ३१ मार्चपूर्वीच केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाला सादर करते. त्यानंतर केंद्र सरकारची सीसीइए (कॅबिनेट कमिटी ऑन इकाॅनाॅमिक अफेअर्स) सीएसीपीच्या अहवालावर शिक्कामाेर्तब करून एमएसपी जाहीर करते. या महिनाभराच्या प्रक्रियेला तीन महिन्यांचा काळ लागावा, याबाबत अभ्यासकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

खरीप पिकांच्या एमएसपीनुसार शेतकरी त्या पिकांच्या पेरणीचे नियाेजन करतात. मात्र, केंद्र सरकार ऐन पावसाळ्याच्या ताेंडावर एमएसपी जाहीर करत असल्याने शेतकऱ्यांना या पिकांचे नियाेजन करणे शक्य हाेत नाही. शिवाय, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण हाेऊन त्यांची फसगत हाेते, असेही शेतमाल बाजार अभ्यासकांनी सांगितले.

केंद्र सरकारची दीर्घ दिरंगाई

केंद्र सरकार मागील पाच वर्षांपासून एमएसपी जाहीर करण्याला दीर्घ दिरंगाई करत आहे. सन २०१८-१९च्या हंगामासाठी ४ जुलै, २०१९-२०च्या हंगामासाठी ३ जून, २०२०-२१च्या हंगामासाठी १ जून, २०२१-२२च्या हंगामासाठी ९ जून आणि सन २०२२-२३च्या हंगामासाठी ८ जून राेजी एमएसपी जाहीर केली हाेती.

एमएसपीमध्ये वाढ व निवडणूक वर्ष

सध्या कापूस, साेयाबीन, व माेहरीचे दर कमालीचे काेसळले आहेत. सध्या कापूस व साेयाबीनचे दर एमएसपीच्या आसपास आले असून, माेहरीचे दर एमएसपीपेक्षा कमी आहेत. निवडणुकीच्या वर्षी एमएसपीमध्ये बऱ्यापैकी वाढ केली जाते. त्यामुळे सन २०२३-२४ च्या हंगामातील खरीप पिकांच्या एमएसपी दरात केंद्र सरकारने माेठी वाढ करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कापूस, साेयाबीन व माेहरीच्या दरवाढीला आधार मिळणार असल्याचे शेतमाल बाजार विश्लेषकांनी सांगितले.

एमएसपीमध्ये वाढ का हवी?

अलीकडे खते, बियाणे यासह अन्य कृषी निविष्ठांच्या किमतीत माेठी वाढ झाली असून, वाहतूक व मजुरीचा खर्च वाढला आहे. वाढीव मजुरी देऊनही मजूर मिळत नाहीत. पिकांचा एमएसपी दर उत्पादन खर्चापेक्षा कितीतरी कमी असताे. दर नियंत्रणासाठी केंद्र सरकार काही घातक उपाययाेजना करून दर आटोक्यात आणते. त्यामुळे एमएसपी दर वाढविणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

एमएसपी दरावर शेतकऱ्यांच्या पिकांचे नियाेजन अवलंबून असते. या नियाेजनासाठी शेतकऱ्यांना एक महिना तरी हवा असताे. केंद्र सरकारने कापसासह इतर पिकांच्या एमएसपी दरात माेठी वाढ केल्यास त्याचा बाजारभावावर परिणाम हाेऊन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा हाेईल.

- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक, कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा