शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकांची ‘एमएसपी’ जाहीर करणार कधी? ‘सीएसीपी’ची प्रक्रिया ३१ मार्चपूर्वीच पूर्ण

By सुनील चरपे | Updated: May 29, 2023 11:14 IST

नियाेजनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

सुनील चरपे

नागपूर : खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ही दरवर्षी एप्रिलच्या शेवटी अथवा मेच्या सुरुवातीला जाहीर हाेणे अपेक्षित असताना केंद्र सरकार चालू खरीप हंगामाचे एमएसपी दर जाहीर करण्यात दीर्घ दिरंगाई करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिकांचे नियाेजन करण्यात अडचणी येत असल्याने एमएसपी नेमकी कधी जाहीर केली जाणार? असा प्रश्न बाजार अभ्यासक गाेविंद वैराळे, विजय जावंधिया यांच्यासह अभ्यासू शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

केंद्र सरकार दरवर्षी १४ खरीप पिकांची एमएसपी जाहीर करत असून, सीएसीपी (कमिशन फाॅर ॲग्रीकल्चर काॅस्ट ॲण्ड प्राइजेस)च्या माध्यमातून या पिकांचा राज्यनिहाय उत्पादन खर्च जाणून घेण्याची प्रक्रिया जानेवारीपासून सुरू केली जाते. सीएसीपी या पिकांची एमएसपी ठरवून त्यांचा अहवाल दरवर्षी ३१ मार्चपूर्वीच केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाला सादर करते. त्यानंतर केंद्र सरकारची सीसीइए (कॅबिनेट कमिटी ऑन इकाॅनाॅमिक अफेअर्स) सीएसीपीच्या अहवालावर शिक्कामाेर्तब करून एमएसपी जाहीर करते. या महिनाभराच्या प्रक्रियेला तीन महिन्यांचा काळ लागावा, याबाबत अभ्यासकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

खरीप पिकांच्या एमएसपीनुसार शेतकरी त्या पिकांच्या पेरणीचे नियाेजन करतात. मात्र, केंद्र सरकार ऐन पावसाळ्याच्या ताेंडावर एमएसपी जाहीर करत असल्याने शेतकऱ्यांना या पिकांचे नियाेजन करणे शक्य हाेत नाही. शिवाय, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण हाेऊन त्यांची फसगत हाेते, असेही शेतमाल बाजार अभ्यासकांनी सांगितले.

केंद्र सरकारची दीर्घ दिरंगाई

केंद्र सरकार मागील पाच वर्षांपासून एमएसपी जाहीर करण्याला दीर्घ दिरंगाई करत आहे. सन २०१८-१९च्या हंगामासाठी ४ जुलै, २०१९-२०च्या हंगामासाठी ३ जून, २०२०-२१च्या हंगामासाठी १ जून, २०२१-२२च्या हंगामासाठी ९ जून आणि सन २०२२-२३च्या हंगामासाठी ८ जून राेजी एमएसपी जाहीर केली हाेती.

एमएसपीमध्ये वाढ व निवडणूक वर्ष

सध्या कापूस, साेयाबीन, व माेहरीचे दर कमालीचे काेसळले आहेत. सध्या कापूस व साेयाबीनचे दर एमएसपीच्या आसपास आले असून, माेहरीचे दर एमएसपीपेक्षा कमी आहेत. निवडणुकीच्या वर्षी एमएसपीमध्ये बऱ्यापैकी वाढ केली जाते. त्यामुळे सन २०२३-२४ च्या हंगामातील खरीप पिकांच्या एमएसपी दरात केंद्र सरकारने माेठी वाढ करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कापूस, साेयाबीन व माेहरीच्या दरवाढीला आधार मिळणार असल्याचे शेतमाल बाजार विश्लेषकांनी सांगितले.

एमएसपीमध्ये वाढ का हवी?

अलीकडे खते, बियाणे यासह अन्य कृषी निविष्ठांच्या किमतीत माेठी वाढ झाली असून, वाहतूक व मजुरीचा खर्च वाढला आहे. वाढीव मजुरी देऊनही मजूर मिळत नाहीत. पिकांचा एमएसपी दर उत्पादन खर्चापेक्षा कितीतरी कमी असताे. दर नियंत्रणासाठी केंद्र सरकार काही घातक उपाययाेजना करून दर आटोक्यात आणते. त्यामुळे एमएसपी दर वाढविणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

एमएसपी दरावर शेतकऱ्यांच्या पिकांचे नियाेजन अवलंबून असते. या नियाेजनासाठी शेतकऱ्यांना एक महिना तरी हवा असताे. केंद्र सरकारने कापसासह इतर पिकांच्या एमएसपी दरात माेठी वाढ केल्यास त्याचा बाजारभावावर परिणाम हाेऊन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा हाेईल.

- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक, कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा