शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

नागपुरातील शिवसेनेच्या मावळ्यांना कधी करणार सरदार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 10:35 IST

भाजपाला नागपुरात कडवे आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेकडे गेल्या चार वर्षांपासून स्वत:ची शहर कार्यकारिणी नाही.

ठळक मुद्देचार वर्षांपासून कार्यकारिणीच नाहीसंपर्क प्रमुख, जिल्हाध्यक्ष बदलूनही ‘जैसे थे’

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाला नागपुरात कडवे आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेकडे गेल्या चार वर्षांपासून स्वत:ची शहर कार्यकारिणी नाही. पक्षाचे मावळे निष्ठेने काम करताहेत मात्र, त्यांना पद देऊन पदानुसार जबाबदारी सोपविली नाही. त्यामुळे कुठलेही राजकीय नियोजन होताना दिसत नाही. गेल्या चार वर्षात पक्षाचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख बदलत गेले. मात्र, कुणालाही ‘मातोश्री’ वरून कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करण्यात यश आले नाही. नवनियुक्त जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनाही तीन महिने पूर्ण झाले. मात्र, ते स्वत:ची टीम नेमू शकलेले नाहीत. आता लोकसभा व विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना कार्यकारिणी नेमून कार्यकर्त्यांना पदे दिली नाही, त्यांना एकसंघ केले नाही तर शिवसेनेची पार दाणादाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेकडून दक्षिण नागपूरची उमेदवारी न मिळाल्यामुळे शेखर सावरबांधे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे सावरबांधे अपक्ष लढले व त्यांनी शिवसेनेचे उमेदवार किरण पांडव यांच्यापेक्षा जास्त मते घेतली होती. सावरबांधे यांच्यानंतर सतीश हरडे यांच्याकडे जिल्हा प्रमुख पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना पूर्णपणे विखुरल्या गेली. पुढील अडीच वर्षे हरडे हे शहर कार्यकारिणीसाठी मातोश्रीच्या चकरा मारत राहिले. मात्र, काहीच झाले नाही. शिवसेनेला महापालिकेच्या निवडणुकीला कार्यकारिणीविना सामोरे जावे लागले. त्यामुळे ऐन लढाईत शिवसेनेला जोमाने लढणारे मावळेच मिळाले नाहीत. परिणामी सेनेचे पानिपत झाले. दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.गेल्या साडेतीन वर्षात शिवसेनेचे एकामागून एक संपर्क प्रमुख बदलत गेले. मात्र, एकाही संपर्क प्रमुखाने पक्ष प्रमुखाशी संपर्क साधून कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करून दिले नाही. नागपुरातील कार्यकर्ते मुंबईकडे आशेने पहायचे. मात्र, लवकरच होईल, असे सांगून सबुरीचा सल्ला दिला जायचा. माजी संपर्क प्रमुख आ. अनिल परब यांनी तर शिवसैनिकाला कुठल्याही पदाची गरज नाही, असे वक्तव्य नागपुरात केले होते. त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी आपण दोन- दोन पदे घेऊन बसला आहात, अशी आठवण आ. परब यांना करून दिली होती. शेवटी हरडे यांनी कार्यकारिणीची यादी मातोश्रीवर सादर केली होती. मात्र, यादी मंजूर होण्यापूर्वीच हरडे यांच्याकडून जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे काढून घेण्यात आली आणि कार्यकारिणी पुन्हा रखडली.नव्या वर्षाच्या सुरुवातीला १५ जानेवारी २०१८ रोजी माजी खासदार प्रकाश जाधव यांच्याकडे नागपूर लोकसभा मतदारसंघाची जिल्हा प्रमुख पदाची धुरा सोपविण्यात आली. ग्रामीण भागातील व्यक्तीला शहराची सूत्रे दिल्यामुळे सुरुवातीला नाराजीचे सूर उठले. मात्र, नंतर जाधव यांनी बाजू सावरली. शहरातील विविध प्रश्नांसाठी थेट भाजपाशी लढण्याची आपली तयारी असल्याचे ते उघडपणे बोलू लागले. या लढ्यासाठी त्यांनाही पदाधिकाऱ्यांची फौज हवी होती. जाधव जिल्हाप्रमुख होऊन तीन महिने झाले. मात्र, पूर्णवेळ जिल्हा प्रमुख देऊनही शिवसेनेने अद्याप जाधव यांच्या मदतीसाठी कार्यकारिणी दिलेली नाही. जाधव यांचाही हरडे यांच्यासारखाच एकाकी कारभार सुरू आहे.

शिवसेनेची वाढ खुंटवायची आहे का ?गेल्या चार वर्षात शिवसेना कार्यकारिणी का जाहीर करू शकली नाही, असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला आहे. एकीकडे पक्षाचा जिल्हा प्रमुख जाहीर करायचा पण दुसरीकडे त्याला गतीने काम करता येऊ नये, यासाठी कार्यकारिणी रोखून धरायची, असा गेम पक्षातील काही लोक खेळत आहेत, असा आरोप आता कार्यकर्ते करू लागले आहेत. मुंबईतील काही नेत्यांना नागपुरात भाजपाच्या मदतीसाठी शिवसेना वाढूच द्यायची नाही, असा आरोपही आता कार्यकर्ते उघडपणे करू लागले आहेत.

शहर प्रमुखांचे पद रद्द करणारशिवसेनेच्या शहर कार्यकारिणीमध्ये यापूर्वी एक जिल्हा प्रमुख, दोन शहर प्रमुख व प्रत्येक विधानसभेसाठी एक उपजिल्हाप्रमुख नेमले जायचे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारर आता शहर प्रमुख हे पदच गहाळ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हा प्रमुख व उपजिल्हा प्रमुख यांच्यातील दुवा म्हणून शहर प्रमुख काम करायचे.एका शहर प्रमुखाकडे शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असायची. मात्र, आता ही व्यवस्थाच संंपविण्यात येणार असल्याची माहिती आहे. याचा शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे.भाजप व संघ पदाधिकाऱ्यांनी धरली होती सेनेची वाटमहापालिकेच्या निवडणुकीत भाजपातर्फे तिकीट न मिळाल्याने भाजप व संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा बाण उचलला होता. त्यांनी शिवसेनेकडून रिंगणात उडी घेत थेट भाजपाला आव्हान दिले होते. शहर प्रमुख मंगेश काशीकर यांची यात महत्त्वाची भूमिका होती. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीनंतर अनेकांनी शिवसेनेची साथ सोडली. नवा मोठा चेहरा पक्षात दाखल झाल्याचेही पहायला मिळाले नाही.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना