शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

नागपुरातील शिवसेनेच्या मावळ्यांना कधी करणार सरदार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 10:35 IST

भाजपाला नागपुरात कडवे आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेकडे गेल्या चार वर्षांपासून स्वत:ची शहर कार्यकारिणी नाही.

ठळक मुद्देचार वर्षांपासून कार्यकारिणीच नाहीसंपर्क प्रमुख, जिल्हाध्यक्ष बदलूनही ‘जैसे थे’

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाला नागपुरात कडवे आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेकडे गेल्या चार वर्षांपासून स्वत:ची शहर कार्यकारिणी नाही. पक्षाचे मावळे निष्ठेने काम करताहेत मात्र, त्यांना पद देऊन पदानुसार जबाबदारी सोपविली नाही. त्यामुळे कुठलेही राजकीय नियोजन होताना दिसत नाही. गेल्या चार वर्षात पक्षाचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख बदलत गेले. मात्र, कुणालाही ‘मातोश्री’ वरून कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करण्यात यश आले नाही. नवनियुक्त जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनाही तीन महिने पूर्ण झाले. मात्र, ते स्वत:ची टीम नेमू शकलेले नाहीत. आता लोकसभा व विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना कार्यकारिणी नेमून कार्यकर्त्यांना पदे दिली नाही, त्यांना एकसंघ केले नाही तर शिवसेनेची पार दाणादाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेकडून दक्षिण नागपूरची उमेदवारी न मिळाल्यामुळे शेखर सावरबांधे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे सावरबांधे अपक्ष लढले व त्यांनी शिवसेनेचे उमेदवार किरण पांडव यांच्यापेक्षा जास्त मते घेतली होती. सावरबांधे यांच्यानंतर सतीश हरडे यांच्याकडे जिल्हा प्रमुख पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना पूर्णपणे विखुरल्या गेली. पुढील अडीच वर्षे हरडे हे शहर कार्यकारिणीसाठी मातोश्रीच्या चकरा मारत राहिले. मात्र, काहीच झाले नाही. शिवसेनेला महापालिकेच्या निवडणुकीला कार्यकारिणीविना सामोरे जावे लागले. त्यामुळे ऐन लढाईत शिवसेनेला जोमाने लढणारे मावळेच मिळाले नाहीत. परिणामी सेनेचे पानिपत झाले. दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.गेल्या साडेतीन वर्षात शिवसेनेचे एकामागून एक संपर्क प्रमुख बदलत गेले. मात्र, एकाही संपर्क प्रमुखाने पक्ष प्रमुखाशी संपर्क साधून कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करून दिले नाही. नागपुरातील कार्यकर्ते मुंबईकडे आशेने पहायचे. मात्र, लवकरच होईल, असे सांगून सबुरीचा सल्ला दिला जायचा. माजी संपर्क प्रमुख आ. अनिल परब यांनी तर शिवसैनिकाला कुठल्याही पदाची गरज नाही, असे वक्तव्य नागपुरात केले होते. त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी आपण दोन- दोन पदे घेऊन बसला आहात, अशी आठवण आ. परब यांना करून दिली होती. शेवटी हरडे यांनी कार्यकारिणीची यादी मातोश्रीवर सादर केली होती. मात्र, यादी मंजूर होण्यापूर्वीच हरडे यांच्याकडून जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे काढून घेण्यात आली आणि कार्यकारिणी पुन्हा रखडली.नव्या वर्षाच्या सुरुवातीला १५ जानेवारी २०१८ रोजी माजी खासदार प्रकाश जाधव यांच्याकडे नागपूर लोकसभा मतदारसंघाची जिल्हा प्रमुख पदाची धुरा सोपविण्यात आली. ग्रामीण भागातील व्यक्तीला शहराची सूत्रे दिल्यामुळे सुरुवातीला नाराजीचे सूर उठले. मात्र, नंतर जाधव यांनी बाजू सावरली. शहरातील विविध प्रश्नांसाठी थेट भाजपाशी लढण्याची आपली तयारी असल्याचे ते उघडपणे बोलू लागले. या लढ्यासाठी त्यांनाही पदाधिकाऱ्यांची फौज हवी होती. जाधव जिल्हाप्रमुख होऊन तीन महिने झाले. मात्र, पूर्णवेळ जिल्हा प्रमुख देऊनही शिवसेनेने अद्याप जाधव यांच्या मदतीसाठी कार्यकारिणी दिलेली नाही. जाधव यांचाही हरडे यांच्यासारखाच एकाकी कारभार सुरू आहे.

शिवसेनेची वाढ खुंटवायची आहे का ?गेल्या चार वर्षात शिवसेना कार्यकारिणी का जाहीर करू शकली नाही, असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला आहे. एकीकडे पक्षाचा जिल्हा प्रमुख जाहीर करायचा पण दुसरीकडे त्याला गतीने काम करता येऊ नये, यासाठी कार्यकारिणी रोखून धरायची, असा गेम पक्षातील काही लोक खेळत आहेत, असा आरोप आता कार्यकर्ते करू लागले आहेत. मुंबईतील काही नेत्यांना नागपुरात भाजपाच्या मदतीसाठी शिवसेना वाढूच द्यायची नाही, असा आरोपही आता कार्यकर्ते उघडपणे करू लागले आहेत.

शहर प्रमुखांचे पद रद्द करणारशिवसेनेच्या शहर कार्यकारिणीमध्ये यापूर्वी एक जिल्हा प्रमुख, दोन शहर प्रमुख व प्रत्येक विधानसभेसाठी एक उपजिल्हाप्रमुख नेमले जायचे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारर आता शहर प्रमुख हे पदच गहाळ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हा प्रमुख व उपजिल्हा प्रमुख यांच्यातील दुवा म्हणून शहर प्रमुख काम करायचे.एका शहर प्रमुखाकडे शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असायची. मात्र, आता ही व्यवस्थाच संंपविण्यात येणार असल्याची माहिती आहे. याचा शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे.भाजप व संघ पदाधिकाऱ्यांनी धरली होती सेनेची वाटमहापालिकेच्या निवडणुकीत भाजपातर्फे तिकीट न मिळाल्याने भाजप व संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा बाण उचलला होता. त्यांनी शिवसेनेकडून रिंगणात उडी घेत थेट भाजपाला आव्हान दिले होते. शहर प्रमुख मंगेश काशीकर यांची यात महत्त्वाची भूमिका होती. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीनंतर अनेकांनी शिवसेनेची साथ सोडली. नवा मोठा चेहरा पक्षात दाखल झाल्याचेही पहायला मिळाले नाही.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना