शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

केंद्र सरकारचे सुधारित शिष्यवृत्ती धोरण कधी लागू होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST

लाखो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणार लाभ आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारने पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचे सुधारित धोरण ...

लाखो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणार लाभ

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र सरकारने पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचे सुधारित धोरण जारी केले आहे. या धोरणात अनेक नव्या बाबींची तरतूद करण्यात आली आहे. परंतु राज्यात अजूनही हे धोरण लागू झालेले नाही. परिणामी

लाखो मागासवर्गीय विद्यार्थी नवीन लाभांपासून वंचित आहेत. त्यामुळे राज्यात हे सुधारित शिष्यवृत्ती धोरण कधी लागू होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

केंद्र सरकारने मार्च २०२१मध्ये पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचे सुधारित धोरण जारी केले आहे. या सुधारित धोरणानुसार अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठे यांसह ९ प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. शैक्षणिक संस्थांची पात्रता व जबाबदारी निश्चित केली आहे. विद्यार्थ्यांची पात्रता, निकष व अटी शर्ती नमूद आहेत. ही केंद्राची योजना आहे. अंमलबजावणी राज्याकडे आहे. राज्याने उच्च शिक्षणासाठी संधी उपलब्ध केली आहे. तरीही अनुसूचित जातीच्या उच्च शिक्षणाची टक्केवारी केवळ २३ टक्के इतकीच आहे. ती किमान २७ टक्के असायला हवी. तसेच १०वी व १२वीमध्ये drop out यांचा शोध घेण्याची आणि त्यांना रोजगार प्राप्त होईल, असा स्कील डेव्हलपमेंट अभ्यासक्रम व शिक्षण देण्याचे सुचोवाच यात आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी नमूद आहेत. शैक्षणिक संस्था आणि शासन प्रशासनाने यासंदर्भात मोहीम सुरू करून, आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्वांना शिक्षण देण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे. राज्य सरकारकडे अंमलबजावणी असल्यामुळे राज्याची यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, उच्च शिक्षण विभाग, शैक्षणिक संस्था व इतर संबंधित कसे काम करणार, यावर या योजनेचे यश अवलंबून राहणार आहे.

- असे आहे धोरण

- ११वी पासून पदव्युत्तर शिक्षण, डिप्लोमा, सर्टिफिकेट अभ्यासक्रम १०वीनंतरच्या अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती

विद्यापीठमान्य, सरकारमान्य अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती

शैक्षणिक अभ्यासक्रम चार ग्रुप्समध्ये विभागला आहे.

ग्रुप १साठी वर्षाकाठी १० महिने - १३,५०० हॉस्टेलेरला आणि इतरला ७ हजार रुपये मिळणार, पूर्वीपेक्षा १५०० रुपयाने वाढ

पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश करताना ट्युशन फी इत्यादी भरण्याची गरज नाही.

प्रवेश करताना शिष्यवृत्तीचा अर्ज भरून घ्यायचा आहे. त्यासाठी मार्गदर्शन केंद्र व नोडल कर्मचारी हे शैक्षणिक संस्थांनीच कार्यान्वित करण्याचे निर्देश आहेत.

पात्र विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक अकाऊंटमध्ये डीबीटीमार्फत सर्व फी व निर्वाह भत्ता जमा होणार.

शिष्यवृत्ती योजनेतील एकूण खर्चाची ६० टक्के रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकार ४० टक्के भार उचलेल.

- राज्य सरकारने सुधारित धोरण त्वरित लागू करावे.

केंद्राचे सुधारित शिष्यवृत्ती धोरण लागू करण्याचे आदेश राज्य सरकारने त्वरित काढावे. त्यामुळे लाखो मागासर्गीय विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. अन्यथा ते लाभापासून वंचित राहतील. विद्यार्थी संघटना, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांनी ही मागणी लावून धरावी.

इ. झेड. खोब्रागडे

अध्यक्ष, संविधान फाऊंडेशन