शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारचे सुधारित शिष्यवृत्ती धोरण कधी लागू होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST

लाखो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणार लाभ आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारने पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचे सुधारित धोरण ...

लाखो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणार लाभ

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र सरकारने पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचे सुधारित धोरण जारी केले आहे. या धोरणात अनेक नव्या बाबींची तरतूद करण्यात आली आहे. परंतु राज्यात अजूनही हे धोरण लागू झालेले नाही. परिणामी

लाखो मागासवर्गीय विद्यार्थी नवीन लाभांपासून वंचित आहेत. त्यामुळे राज्यात हे सुधारित शिष्यवृत्ती धोरण कधी लागू होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

केंद्र सरकारने मार्च २०२१मध्ये पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचे सुधारित धोरण जारी केले आहे. या सुधारित धोरणानुसार अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठे यांसह ९ प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. शैक्षणिक संस्थांची पात्रता व जबाबदारी निश्चित केली आहे. विद्यार्थ्यांची पात्रता, निकष व अटी शर्ती नमूद आहेत. ही केंद्राची योजना आहे. अंमलबजावणी राज्याकडे आहे. राज्याने उच्च शिक्षणासाठी संधी उपलब्ध केली आहे. तरीही अनुसूचित जातीच्या उच्च शिक्षणाची टक्केवारी केवळ २३ टक्के इतकीच आहे. ती किमान २७ टक्के असायला हवी. तसेच १०वी व १२वीमध्ये drop out यांचा शोध घेण्याची आणि त्यांना रोजगार प्राप्त होईल, असा स्कील डेव्हलपमेंट अभ्यासक्रम व शिक्षण देण्याचे सुचोवाच यात आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी नमूद आहेत. शैक्षणिक संस्था आणि शासन प्रशासनाने यासंदर्भात मोहीम सुरू करून, आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्वांना शिक्षण देण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे. राज्य सरकारकडे अंमलबजावणी असल्यामुळे राज्याची यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, उच्च शिक्षण विभाग, शैक्षणिक संस्था व इतर संबंधित कसे काम करणार, यावर या योजनेचे यश अवलंबून राहणार आहे.

- असे आहे धोरण

- ११वी पासून पदव्युत्तर शिक्षण, डिप्लोमा, सर्टिफिकेट अभ्यासक्रम १०वीनंतरच्या अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती

विद्यापीठमान्य, सरकारमान्य अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती

शैक्षणिक अभ्यासक्रम चार ग्रुप्समध्ये विभागला आहे.

ग्रुप १साठी वर्षाकाठी १० महिने - १३,५०० हॉस्टेलेरला आणि इतरला ७ हजार रुपये मिळणार, पूर्वीपेक्षा १५०० रुपयाने वाढ

पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश करताना ट्युशन फी इत्यादी भरण्याची गरज नाही.

प्रवेश करताना शिष्यवृत्तीचा अर्ज भरून घ्यायचा आहे. त्यासाठी मार्गदर्शन केंद्र व नोडल कर्मचारी हे शैक्षणिक संस्थांनीच कार्यान्वित करण्याचे निर्देश आहेत.

पात्र विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक अकाऊंटमध्ये डीबीटीमार्फत सर्व फी व निर्वाह भत्ता जमा होणार.

शिष्यवृत्ती योजनेतील एकूण खर्चाची ६० टक्के रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकार ४० टक्के भार उचलेल.

- राज्य सरकारने सुधारित धोरण त्वरित लागू करावे.

केंद्राचे सुधारित शिष्यवृत्ती धोरण लागू करण्याचे आदेश राज्य सरकारने त्वरित काढावे. त्यामुळे लाखो मागासर्गीय विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. अन्यथा ते लाभापासून वंचित राहतील. विद्यार्थी संघटना, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांनी ही मागणी लावून धरावी.

इ. झेड. खोब्रागडे

अध्यक्ष, संविधान फाऊंडेशन