शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित सिंचन प्रकल्प कधी पूर्ण करणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 01:32 IST

विदर्भातील ४५ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, अशी हमी राज्य शासनाने दिली होती. मात्र मागील चार वर्षांत हे प्रकल्प पूर्ण का झाले नाही व हे प्रकल्प कधी पूर्ण करणार अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. सोबतच दोन आठवड्यात कालबद्ध कार्यक्रमदेखील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाकडून शासनाला विचारणा : दोन आठवड्यात कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भातील ४५ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, अशी हमी राज्य शासनाने दिली होती. मात्र मागील चार वर्षांत हे प्रकल्प पूर्ण का झाले नाही व हे प्रकल्प कधी पूर्ण करणार अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. सोबतच दोन आठवड्यात कालबद्ध कार्यक्रमदेखील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने विदभार्तील सिंचन अनुशेषाकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्या. रवी देशपांडे व न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. गेल्या चार वर्षात केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून काही प्रकल्प पूर्ण केल्याचा दावा करण्यात आला आहे. तेव्हा ते प्रकल्प नेमके कोणते आहेत, त्याबाबत माहिती सादर करण्याची विनंती याचिकाकर्त्यांकडून न्यायालयाला करण्यात आली. विदर्भात सुमारे अडीच लाख हेक्टरहून अधिक जमिनीला अद्याप सिंचन सुविधा मिळालेल्या नाहीत. काही प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. तर काही प्रकल्प निव्वळ कागदावरच आहेत. प्रलंबित प्रकल्प पूर्ण केल्यास शेतकऱ्यांना सिंचन सुविधा मिळणार आहेत. तेव्हा त्या प्रकल्पांना कधी पूर्ण करणार त्याबाबत कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशीही विनंती करण्यात आली.त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने किती प्रकल्प १०० टक्के पूर्ण झालेत, किती प्रकल्प अपूर्ण आहेत, ते अपूर्ण प्रकल्प किती कालावधीत पूर्ण करणार त्याचा कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे निर्देश दिले आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड.अविनाश काळे, अ‍ॅड. भारती काळे यांनी बाजू मांडली.अगोदरदेखील झाली होती याचिकायाअगोदरदेखील लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने प्रलंबित प्रकल्पांबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने जलसंपदा खात्याला प्रलंबित सिंचन प्रकल्पाची यादी सादर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार सुमारे ४५ प्रमुख प्रकल्पांची यादी सादर करण्यात आली होती. सदर प्रकल्प प्रलंबित असण्याची कारणे आणि ते प्रकल्प किती कालावधीत पूर्ण होतील त्याची माहिती देण्यात आली होती. तसेच तीन ते चार वर्षात सर्व प्रकल्प पूर्ण होतील, अशी हमी न्यायालयात देण्यात आली होती. त्याआधारे सदर याचिका निकाली काढण्यात आली होती. मात्र न्यायालयाला दिलेल्या आश्वासनानुसार कोणत्याही प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही, असे आढळून आल्याने समितीने परत उच्च न्यायालयात धाव घेतली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प