शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कधी होणार नागपूरकर डिजिटल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 09:57 IST

देशातील नागरिकांना स्वत:ची महत्त्वपूर्ण कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी व्यक्तिगत इलेक्ट्रॉनिक लॉकर म्हणजे ‘डीजी लॉकर’ उपलब्ध करून दिले आहे. मुंबई, पुणेच्या तुलनेत डीजी लॉकर नोंदणीसाठी नागपूर मागे पडले आहे.

ठळक मुद्देकेवळ १८ हजार लोकांनीच उघडले ‘डीजी लॉकर’पुणे, मुंबईच्या तुलनेत ५० टक्केही नाही

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील नागरिकांना स्वत:ची महत्त्वपूर्ण कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी व्यक्तिगत इलेक्ट्रॉनिक लॉकर म्हणजे ‘डीजी लॉकर’ उपलब्ध करून दिले आहे. या तंत्रज्ञानामुळे शासकीय कामकाजात लागणारी सर्व महत्त्वाची कादगपत्रे साठविता येतात. ही कागदपत्रे आधार कार्ड क्रमांकाना जोडण्याची सुविधाही उपलब्ध आहे; असे असताना मुंबई, पुणेच्या तुलनेत डीजी लॉकर नोंदणीसाठी नागपूर मागे पडले आहे. गेल्या दोन वर्षात केवळ १८ हजार नागरिकांनी याची नोंदणी केली आहे. यामुळे नागपूरकर कधी डिजिटल होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.नागपूर मेट्रो सिटीच्या रांगेत उभे आहे. ‘स्मार्ट’ सिटीकडे वाटचाल सुरू आहे. मात्र, नागपूरकर स्वत: डिजिटल होण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नागरिकांसाठी ‘डीजी लॉकर’सेवा उपलब्ध करून दिली. यात मोटार वाहन परवाना, आरसी बुकच नाही तर पॅन कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे आणि आता वाहनाचा विमाही साठविता येतो. ‘डीजी लॉकर’ हे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाशी जोडले गेले आहे तसेच अ‍ॅपवरील कागदपत्रे ग्राह्य धरली जावीत, अशा सूचना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाने दिल्या आहेत. त्याचप्रमाणे वाहतूक पोलिसांना अ‍ॅपवरील कागदपत्रांची तपासणी करायची असेल तर तेथे ‘क्यूआर कोड’ची सुविधा आहे. त्या कोडचा वापर करून वाहतूक पोलिसांना किंवा आरटीओ निरीक्षकांना वाहन चालकाचे नाव, पत्ता, मोबाईल, क्रमांक, जन्मतारीख, वाहन क्रमांक, इंजिन क्रमांक, चेसीस क्रमांक आदी बाबींची सत्यता पडताळता येते. डीजी लॉकरमध्ये साठविलेल्या कागदपत्रांची लिंक हव्या त्या ई-मेलवर सहजपणे पाठविण्याची सुविधाही आहे. शिवाय काही शासकीय कार्यालयांमध्ये कागदपत्रांच्या छापील प्रतिऐवजी डीजी लॉकरमधील कागदपत्राची डिजिटल प्रत स्वीकारण्याची सुविधाही आहे.मात्र पुणे, मुंबईच्या तुलनेत ५० टक्केही नागपूरकरांनी याची नोंदणी केलेली नाही.

हे आहेत फायदे

  • ‘डीजी लॉकर’ तंत्रज्ञानामुळे वाहन परवाना, आरसी बुक व इन्शुरन्स वाहन चालकांनी सोबत बाळगण्याची गरज नाही.
  • रेल्वे प्रवासात ओळखपत्र पुरावा म्हणून ‘डीजी लॉकर’मधील ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते.
  • बँकेत खाते उघडताना, गॅसचे कनेक्शन घेताना ‘डीजी लॉकर’ची मदत घेता येते.

डीजी लॉकरमध्ये साठविलेल्या कागदपत्रांची लिंक हव्या त्या ई-मेलवर सहजपणे पाठविता येते.                                   

  महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

‘डीजी लॉकर’ची सर्वाधिक नोंदणी देशात तामिळनाडू येथे झाली आहे. ४६ लाख ६६ हजार ९८ लोकांनी याची नोंदणी करून प्रथम स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेश आहे. येथील ४२ लाख ८ हजार ४५७ लोकांनी नोंदणी केली आहे तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. ४२ लाख १ हजार १८ लोकांनी याची नोंदणी केली आहे. सर्वात कमी नोंदणी नवी दिल्ली येथे झाली आहे. १४ लाख १ हजार १८९ लोकांनीच नोंदणी केली आहे.

राज्यात मुंबईत सर्वाधिक नोंदणीराज्यात सर्वाधिक मुंबईमधील ६५ हजार ५४ लोकांनी ‘डीजी लॉकर’साठी नोंदणी केली आहे. त्यानंतर पुण्यातील ६१ हजार ९५२ तर ठाण्यात ५७ हजार ८५१ लोकांनी नोंदणी केली आहे. नागपुरात केवळ १८ हजार ५५८ लोकांनीच याची नोंदणी केली आहे.

डीजी लॉकर म्हणजे काय?वाहन परवाना, आरसी बुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे किंवा अन्य महत्त्वाची कागदपत्रे साठविण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली सुविधा म्हणजे ‘डीजी लॉकर’. ‘डीजी लॉकर’ हे अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे आवश्यक आहे. त्यामुळे मोबाईलच्या एका क्लिकवर ही कागदपत्रे आपल्याला पाहिजे त्यावेळी उपलब्ध होऊ शकतात. या अ‍ॅपवरील कागदपत्रे ग्राह्य धरली जावीत अशा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सूचना आहेत.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान