शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
3
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
4
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
5
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
6
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
7
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी
8
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
9
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
10
सेबीने जेन स्ट्रीट प्रकरण जाणूनबुजून लांबवले? माधवी बुच यांचा 'स्फोटक' खुलासा, आता सत्य काय?
11
चिंताजनक! ४० दिवसांत हार्ट अटॅकने २३ जणांचा मृत्यू; 'या' राज्यात खळबळ, रुग्णालयात प्रचंड गर्दी
12
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
13
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
14
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
15
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
16
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
17
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!
18
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
19
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
20
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

लोकल सेवा ग्लोबल कधी होणार ?

By admin | Updated: April 14, 2016 03:18 IST

नैसर्गिक आपत्तीत अग्निशमन विभागाचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण व संपत्तीचे संरक्षण करतात.

अग्निशमन विभागाला हवी ऊर्जा : अर्ध्याहून अधिक पदे रिक्तनागपूर : नैसर्गिक आपत्तीत अग्निशमन विभागाचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण व संपत्तीचे संरक्षण करतात. महापालिकेच्या अग्निशमन विभागावर शहरासोबतच ग्रामीण भागासह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु जबाबदारी विचारात घेता, या विभागाला सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. केवळ कागदावर प्रस्तावांना मंजुरी दिली जात असल्याचे चित्र आहे. या विभागाला अत्याधुनिक यंत्रसामुग्री व मनुष्यबळाची गरज आहे. आज गुरुवारी अग्निशिमन दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने चिटणवीस पार्क येथे सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने या विभागाला सक्षम करण्यासाठी ठोस निर्णयाची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. १९६५ च्या लोकसंख्येच्या आधारावर शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यात आली होती. त्यानुसार पाच केंद्रे व १९३ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली होती. चार दशकात ही संख्या ४११ झाली. परंतु विभागात २५० कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या चार दशकात शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. दोन लाख लोकसंख्येमागे एक अग्निशमन केंद्र असायला हवे, त्यानुसार शहरात १५ केंद्रांची गरज आहे. त्यानुसार ८७२ कर्मचाऱ्यांची गरज आहे. नवीन आकृतिबंध राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. याला शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर नवीन भरती प्रक्रि या सुरू केली जाणार आहे. (प्रतिनिधी)