शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

लोकल सेवा ग्लोबल कधी होणार ?

By admin | Updated: April 14, 2016 03:18 IST

नैसर्गिक आपत्तीत अग्निशमन विभागाचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण व संपत्तीचे संरक्षण करतात.

अग्निशमन विभागाला हवी ऊर्जा : अर्ध्याहून अधिक पदे रिक्तनागपूर : नैसर्गिक आपत्तीत अग्निशमन विभागाचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण व संपत्तीचे संरक्षण करतात. महापालिकेच्या अग्निशमन विभागावर शहरासोबतच ग्रामीण भागासह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु जबाबदारी विचारात घेता, या विभागाला सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. केवळ कागदावर प्रस्तावांना मंजुरी दिली जात असल्याचे चित्र आहे. या विभागाला अत्याधुनिक यंत्रसामुग्री व मनुष्यबळाची गरज आहे. आज गुरुवारी अग्निशिमन दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने चिटणवीस पार्क येथे सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने या विभागाला सक्षम करण्यासाठी ठोस निर्णयाची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. १९६५ च्या लोकसंख्येच्या आधारावर शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यात आली होती. त्यानुसार पाच केंद्रे व १९३ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली होती. चार दशकात ही संख्या ४११ झाली. परंतु विभागात २५० कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या चार दशकात शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. दोन लाख लोकसंख्येमागे एक अग्निशमन केंद्र असायला हवे, त्यानुसार शहरात १५ केंद्रांची गरज आहे. त्यानुसार ८७२ कर्मचाऱ्यांची गरज आहे. नवीन आकृतिबंध राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. याला शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर नवीन भरती प्रक्रि या सुरू केली जाणार आहे. (प्रतिनिधी)