शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

प्राेत्साहन निधी मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:10 IST

चक्रधर गभणे लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : राज्य शासनाने आधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना आणि नंतर महात्मा ...

चक्रधर गभणे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : राज्य शासनाने आधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना आणि नंतर महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती याेजनेंतर्गत शेतकऱ्यांकडील थकीत पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. पीक कर्जाचा नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपये प्राेत्साहन निधी जमा करण्याची घाेषणाही शासनाने या दाेन्ही याेजनांवेळी केली हाेती. परंतु, माैदा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात ही रक्कम अद्याप जमा करण्यात आली नाही. त्यामुळे ही रक्कम मिळणार कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे.

राज्य शासनाने सुरुवातीला २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना जाहीर केली. या याेजनेंतर्गत शेतकऱ्यांकडील थकीत पीककर्ज माफ करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. पुढे २०१९ मध्ये या याेजनेचे महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती याेजना असे नामकरण करण्यात आले. या याेजनेचा लाभ थकीत कर्जदार शेतकऱ्यांना हाेणार असल्याने तसेच नियमित पीककर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये असंताेष निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे शासनाने नियमित पीककर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्राेत्साहन निधीची घाेषणा केली आणि त्याअंतर्गत ५० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

या प्राेत्साहन निधीसाठी पात्र असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने ही रक्कम अद्याप जमा केली नाही. या काळात काही लाभार्थी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, त्यांची कर्जखाती त्यांच्या पत्नी अथवा मुलांच्या नावे वर्ग करण्यात आले. त्यांनाही या याेजनेचा लाभ मिळालेला नाही. थकीत कर्जदारांमध्ये सधन आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांमध्ये बहुतांश छाेट्या व गरीब शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे शासनाने या याेजनेच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आराेपही काहींनी केला आहे.

...

वर्षभराचे व्याज वसूल

बहुतांश शेतकरी जून महिन्यात पीककर्जाची उचल करीत असून, त्या कर्जाचा ३१ मार्चच्या पूर्वी भरणा करतात. कर्जाची परतफेड करण्यासाठी ते नातेवाईक किंवा मित्रांकडून उसनवार करतात. बँका मात्र त्या पीककर्जावर वर्षभराचे व्याज आकारून ते शेतकऱ्यांकडून सक्तीने वसूल करते. वास्तवात, शेतकऱ्यांकडून १० महिन्यांचे व्याज वसूल करायला पाहिजे. या प्रकारातही बँका शेतकऱ्यांना लुटतात. यात राष्ट्रीयीकृत बँका आघाडीवर आहेत.