शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्राेत्साहन निधी मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:10 IST

चक्रधर गभणे लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : राज्य शासनाने आधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना आणि नंतर महात्मा ...

चक्रधर गभणे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : राज्य शासनाने आधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना आणि नंतर महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती याेजनेंतर्गत शेतकऱ्यांकडील थकीत पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. पीक कर्जाचा नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपये प्राेत्साहन निधी जमा करण्याची घाेषणाही शासनाने या दाेन्ही याेजनांवेळी केली हाेती. परंतु, माैदा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात ही रक्कम अद्याप जमा करण्यात आली नाही. त्यामुळे ही रक्कम मिळणार कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे.

राज्य शासनाने सुरुवातीला २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना जाहीर केली. या याेजनेंतर्गत शेतकऱ्यांकडील थकीत पीककर्ज माफ करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. पुढे २०१९ मध्ये या याेजनेचे महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती याेजना असे नामकरण करण्यात आले. या याेजनेचा लाभ थकीत कर्जदार शेतकऱ्यांना हाेणार असल्याने तसेच नियमित पीककर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये असंताेष निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे शासनाने नियमित पीककर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्राेत्साहन निधीची घाेषणा केली आणि त्याअंतर्गत ५० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

या प्राेत्साहन निधीसाठी पात्र असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने ही रक्कम अद्याप जमा केली नाही. या काळात काही लाभार्थी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, त्यांची कर्जखाती त्यांच्या पत्नी अथवा मुलांच्या नावे वर्ग करण्यात आले. त्यांनाही या याेजनेचा लाभ मिळालेला नाही. थकीत कर्जदारांमध्ये सधन आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांमध्ये बहुतांश छाेट्या व गरीब शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे शासनाने या याेजनेच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आराेपही काहींनी केला आहे.

...

वर्षभराचे व्याज वसूल

बहुतांश शेतकरी जून महिन्यात पीककर्जाची उचल करीत असून, त्या कर्जाचा ३१ मार्चच्या पूर्वी भरणा करतात. कर्जाची परतफेड करण्यासाठी ते नातेवाईक किंवा मित्रांकडून उसनवार करतात. बँका मात्र त्या पीककर्जावर वर्षभराचे व्याज आकारून ते शेतकऱ्यांकडून सक्तीने वसूल करते. वास्तवात, शेतकऱ्यांकडून १० महिन्यांचे व्याज वसूल करायला पाहिजे. या प्रकारातही बँका शेतकऱ्यांना लुटतात. यात राष्ट्रीयीकृत बँका आघाडीवर आहेत.