शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

स्वच्छतेचा सुवर्ण ‘मध्य’ कधी गाठणार?

By admin | Updated: May 7, 2017 02:15 IST

राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर शहर १३७ व्या क्रमांकावर पोहोचले आहे.

मोठमोठ्या स्वप्नांपूर्वी कचरा साफ करा : स्वच्छतेत माघारण्यासाठी जबाबदार कोण? लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर शहर १३७ व्या क्रमांकावर पोहोचले आहे. स्वच्छता सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर लोकमत चमूला महाल, मोमीनपुरा, जागनाथ बुधवारी, पाचपावली, गरोबा मैदान, सतरंजीपुरा, गंजीपेठ, बजेरिया, संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, गणेशपेठ, नवी शुक्रवारी, जुनी मंगळवारी, क्वेटा कॉलनी आदी भागांची पाहणी करून जागोजागी कचरा फेकला जात असल्याचे निदर्शनास आले. आमच्या प्रतिनिधीने त्यांची छायाचित्रेही काढली. बहुतांश उघडे प्लॉट, विहिरी, गल्ल्या आदी कचऱ्या फेकण्याचे स्थळ बनले आहेत. महालातून वाहणाऱ्या नाल्याला तर डोळ्यांनी पाहताही येऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी लोक कचरा न उचलला जात असल्याने प्रशासनाला धारेवर धरत आहेत. नागपूर हे देशात सर्वाधिक गतीने विकास करीत असलेल्या शहरांमध्ये सामील आहे. आर्थिक घडामोडीही गतीने होत असताना नागरिकांद्वारे उत्पादनांचा उपयोगही वाढला आहे. खाण्याच्या वस्तू असो की वापरण्याच्या वस्तू, कपडे, फर्निचर आदी. प्रत्येक वस्तू उपभोगल्यावर ती सोडून दिली जाते. अशा सोडलेल्या वस्तूंची योग्यपणे विल्हेवाट लावली जात नसल्याने त्याला कचऱ्याचे स्वरूप प्राप्त होते. शहरात दररोज कित्येक टन कचरा निघतो. तो व्यवस्थित व नियमितपणे उचलला जात नसल्याने तो उघड्यावरच पसरतो. अशा वेळी स्वच्छतेच्या नावावर जनतेकडून वसूल करण्यात येत असलेल्या पैशाचे अखेर काय केले जाते, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांना मोठमोठे स्वप्न दाखविण्यापूर्वी शहरातील कचराच साफ करावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे. आमदार म्हणतात, नेते व प्रशासन जबाबदार मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही २० व्या क्रमांकावरून १३७ व्या क्रमांकावर पोहोचलो. हे आमच्यासाठी शरमेची बाब आहे. यासाठी आम्ही नेते आणि प्रशासन दोघेही जबाबदार आहोत. मला वाटते की, कचरा व्यवस्थापनाबाबत आमच्या नियोजनात काहीतरी गडबड आहे. हेच कारण आहे की आम्ही मागे पडलो. यासंदर्भात आ. कुंभारे यांनी हे आपले व्यक्तिगत मत असल्याचेही स्पष्ट केले. अस्वच्छतेसाठी भाजपा नेतेच जबाबदार काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी यासाठी भाजपाच्या नेत्यांना सर्वस्वी जबाबदार ठरविले आहे. मागील दहा वर्षांपासून मनपात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी भाजपाच जबाबदार आहे. भाजपा केंद्र आणि राज्य सरकारद्वारे स्वच्छता आणि व्यवस्थापनासाठी मिळत असलेल्या निधीचा योग्य उपयोग करीत नाही.