शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

दिव्यांग विद्यार्थ्यांना ३ टक्के गुणांची सवलत कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 10:49 IST

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी राज्य शासनाने त्यांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापही ठोस पाऊल उचललेले नाही.

ठळक मुद्देराज्य शासनाने दीड वर्षं अगोदर घेतला होता निर्णय

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी राज्य शासनाने उच्च शिक्षण संस्थामध्ये त्यांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. याअंतर्गतच अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्रातील प्रत्येक परीक्षेत एकूण गुणांच्या तीन टक्के गुणांची सवलत देण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापही ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या अंतर्गत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन व मूल्यमापनाची पद्धती वेगळी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक मूल्यमापनात आवश्यक सोई सवलती देण्यासंदर्भात धोरण निश्चितीसाठी शासनाने विशेष समिती नमली होती. या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारावर शासनाने ४ मार्च २०१७ रोजी निर्णय निर्गमित केले होते. यात जवळचे परीक्षा केंद्र, लेखनिकाची व्यवस्था, विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी २० मिनिटांचा अतिरिक्त वेळ, आरोग्य-शारीरिक शिक्षण विषयांत सूट देणे, दिव्यांग विद्यार्थ्यांचे व्याकरणाचे गुण कापण्यात येऊ नये तसेच हजेरीमधील सूट इत्यादींचा समावेश होता. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षेत एकूण गुणांच्या तीन टक्के गुणांची सवलत देण्याचा एक प्रमुख निर्णय होता. ही सवलत एकाच विषयात किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यासंदर्भातदेखील सूचना देण्यात आली होती. या निर्णयाची अंमलबजावणी विद्यापीठांनी तात्काळ करावी, असे निर्देश शासनाने दिले होते. नागपूर विद्यापीठाने लेखनिक व परीक्षेमध्ये २० मिनिटांचा अतिरिक्त वेळ यासंदर्भात तर निर्णय घेतला व त्यांची अंमलबजावणी मागील सत्रातील परीक्षेपासून केली. मात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना तीन टक्के गुणांची सवलत देण्यासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येदेखील नाराजीचा सूर आहे.

अभ्यास मंडळाला घ्यावा लागणार निर्णययासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांना संपर्क केला असता शैक्षणिक मूल्यमापनातील बदल हे अभ्यास मंडळाच्या अधिकारक्षेत्रातील विषय असल्याचे स्पष्ट केले. विद्यापीठाने लेखनिक देणे किंवा परीक्षेत अतिरिक्त वेळ देणे या निर्णयांची अंमलबजावणी केली आहे. मात्र तीन टक्के गुणांची सूट देण्याच्या मुद्याला अभ्यास मंडळ व त्यानंतर विद्वत् परिषद यांची मंजुरी आवश्यक आहे. परीक्षा मंडळात यावर मोहोर लागल्यानंतर विद्यापीठ यावर पावले उचलेल, असे डॉ. खटी यांनी सांगितले. विद्यापीठात अनेक दिवस अभ्यासमंडळेच नव्हती. ती आता अस्तित्वात आली असून लवकरच पुढील प्रक्रिया विद्या विभागाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ