शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
3
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
4
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
5
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
6
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
7
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
8
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
9
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
10
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
11
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
12
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
13
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
14
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
15
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
16
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
17
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
18
'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
19
थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
20
IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थ्यांना ३ टक्के गुणांची सवलत कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 10:49 IST

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी राज्य शासनाने त्यांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापही ठोस पाऊल उचललेले नाही.

ठळक मुद्देराज्य शासनाने दीड वर्षं अगोदर घेतला होता निर्णय

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी राज्य शासनाने उच्च शिक्षण संस्थामध्ये त्यांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. याअंतर्गतच अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्रातील प्रत्येक परीक्षेत एकूण गुणांच्या तीन टक्के गुणांची सवलत देण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापही ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या अंतर्गत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन व मूल्यमापनाची पद्धती वेगळी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक मूल्यमापनात आवश्यक सोई सवलती देण्यासंदर्भात धोरण निश्चितीसाठी शासनाने विशेष समिती नमली होती. या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारावर शासनाने ४ मार्च २०१७ रोजी निर्णय निर्गमित केले होते. यात जवळचे परीक्षा केंद्र, लेखनिकाची व्यवस्था, विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी २० मिनिटांचा अतिरिक्त वेळ, आरोग्य-शारीरिक शिक्षण विषयांत सूट देणे, दिव्यांग विद्यार्थ्यांचे व्याकरणाचे गुण कापण्यात येऊ नये तसेच हजेरीमधील सूट इत्यादींचा समावेश होता. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षेत एकूण गुणांच्या तीन टक्के गुणांची सवलत देण्याचा एक प्रमुख निर्णय होता. ही सवलत एकाच विषयात किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यासंदर्भातदेखील सूचना देण्यात आली होती. या निर्णयाची अंमलबजावणी विद्यापीठांनी तात्काळ करावी, असे निर्देश शासनाने दिले होते. नागपूर विद्यापीठाने लेखनिक व परीक्षेमध्ये २० मिनिटांचा अतिरिक्त वेळ यासंदर्भात तर निर्णय घेतला व त्यांची अंमलबजावणी मागील सत्रातील परीक्षेपासून केली. मात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना तीन टक्के गुणांची सवलत देण्यासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येदेखील नाराजीचा सूर आहे.

अभ्यास मंडळाला घ्यावा लागणार निर्णययासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांना संपर्क केला असता शैक्षणिक मूल्यमापनातील बदल हे अभ्यास मंडळाच्या अधिकारक्षेत्रातील विषय असल्याचे स्पष्ट केले. विद्यापीठाने लेखनिक देणे किंवा परीक्षेत अतिरिक्त वेळ देणे या निर्णयांची अंमलबजावणी केली आहे. मात्र तीन टक्के गुणांची सूट देण्याच्या मुद्याला अभ्यास मंडळ व त्यानंतर विद्वत् परिषद यांची मंजुरी आवश्यक आहे. परीक्षा मंडळात यावर मोहोर लागल्यानंतर विद्यापीठ यावर पावले उचलेल, असे डॉ. खटी यांनी सांगितले. विद्यापीठात अनेक दिवस अभ्यासमंडळेच नव्हती. ती आता अस्तित्वात आली असून लवकरच पुढील प्रक्रिया विद्या विभागाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ