शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

मुलींचा जन्मदर वाढणार कधी?

By admin | Updated: June 6, 2017 02:09 IST

समाजात प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असून सगळीकडेच त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे.

उपराजधानीत मुलांच्या तुलनेत ९३ टक्के मुलींचा जन्म : ६ वर्षांत आकडेवारी स्थिरचलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजात प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असून सगळीकडेच त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. ‘बेटी बचावो’ मोहीम व्यापक पातळीवर राबविण्यात येत आहे. दहावी, बारावीसह स्पर्धा परीक्षांतदेखील नागपुरातील मुलीच ‘टॉप’ असतात. मात्र तरीदेखील राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर हवा तसा वाढलेला नाही. गेल्या ६ वर्षांत जन्मदराची टक्केवारी जवळपास स्थिरच असून २०१७ मध्ये मुलांच्या तुलनेत सरासरी ९३ टक्के इतकीच आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात नागपूर महानगरपालिकेकडे जन्म, मृत्यूसंदर्भात विचारणा केली होती. १ जानेवारी २०१२ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत नागपुरात किती मुलामुलींचा जन्म झाला, या कालावधीत नागपुरात किती मृत्यू झाले तसेच उपजत मृत्यूचे प्रमाण किती होते, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१२ ते मार्च २०१७ या कालावधीत २ लाख ९६ हजार ५६७ जन्म झाले. यात मुलांच्या जन्माची संख्या १ लाख ५३ हजार १०९ इतकी होती तर मुलींचा आकडा १ लाख ४३ हजार ४५८ एवढा होता. सरासरी मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण हे ९३.६९ टक्के एवढे होते. दरवर्षीची टक्केवारी लक्षात घेतली तर २०१५ मध्ये मुलांच्या तुलनेत ९४.८३ टक्के मुलींचा जन्म झाला. इतर सर्व वर्ष टक्केवारी ही ९३ व ९४ टक्क्यांच्या मध्येच होती. २०१७ मध्ये मार्च महिन्यापर्यंत मुलांच्या तुलनेत ९३ टक्के मुलींचा जन्म झाला.सव्वा वर्षात ३४८ उपजत मृत्यूदरम्यान, १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत शहरात एकूण ३४८ उपजत मृत्यूची प्रकरणे आढळून आली. यात २०२ मुले व १४६ मुलींचा समावेश होता. सव्वा लाखांहून अधिक मृत्यूची नोंद२०१२ पासून सव्वा पाच वर्षांच्या कालावधीत नागपूर मनपाच्या आरोग्य विभागातर्फे १ लाख ३३ हजार ७३८ मृत्यूची नोंद करण्यात आली. यात ८० हजार ५८२ पुरुष व ५३ हजार १५६ महिलांचा समावेश होता. २०१६ मध्ये सर्वाधिक २६ हजार ९२६ मृत्यूची नोंद करण्यात आली.