शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

जागांचे हस्तांतरण कधी?

By admin | Updated: July 3, 2015 03:04 IST

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या परंतु सातबारावर नोंदी नसलेल्या जनपदकालीन....

जिल्हा परिषद : कोट्यवधींच्या जागांचा शोध लागता लागेना गणेश हूड  नागपूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या परंतु सातबारावर नोंदी नसलेल्या जनपदकालीन जमिनी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामविकास विभागाने दोन वर्षभरापूर्वी घेतला. परंतु महसूल विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने जमिनीचे हस्तांतरण अडकले आहे. जि.प.च्या निर्मितीनंतर जनपदकालीन जमिनीची मालकी जि.प.कडे असणे अपेक्षित होते. परंतु सातबारावर नाव न चढवल्याने अद्याप या जमिनींचा कायदेशीर मालकी हक्क आलेला नाही. अशा जमिनीचे सातबारावर नाव चढविण्यासाठी जि.प. प्रशासनाने मोहीम हाती घेतली होती. काही महिन्यानंतर ती थंड पडली. परंतु महसूल विभागाकडून प्रतिसाद न मिळाल्याने जि.प.चे अधिकारी वैतागले आहेत. जिल्ह्यातील १११ जमिनी जि.प.च्या ताब्यात असणे अपेक्षित होते. परंतु यातील ७२ जागा कब्जात आहेत. २५ जागा अद्याप जनपदच्या नावाने आहेत. काही जागांचा रेकॉर्ड अप्राप्त आहे. २९ जानेवारी २००४ च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्याकडील स्थावर मालमत्तेचे अभिलेख तयार करणे व अद्यावत ठेवण्याची जबाबदारी उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. परंतु तांत्रिक बाबीमुळे जमिनीचे फेरफार अडकले आहे.नागपूर शहरातील बडकस चौक, झिंगाबाई टाकळी, वर्धा मार्गावरील साईमंदिरलगत, भामटी परसोडी, सुभाषनगर, हिंगणा रोड, पटवर्धन हायस्कूल अशा मोक्याच्या ठिकाणी जि.प.च्या जागा आहेत. सोन्याचा भाव असलेल्या यातील काही जागांवर अतिक्र मण झालेले आहे. परसोडी येथील १३ एक रपैकी काही जागेवर अतिक्र मण झाले आहे. हिंगणा मार्ग व झिंगाबाई टाकळी येथील जागेच्या काही भागात अतिक्र मण आहे. जि.प.ची मालकी पण ताबा दुसऱ्याचाजिल्ह्यातील जि.प.च्या मालक ीच्या १२१३ हेक्टर जमिनीवर दुसऱ्यांचा ताबा आहे. काही जागांचा व्यवसायासाठी वापर होतो. पैसा मात्र जि.प.तिजोरीत जमा होत नाही. उमरेड येथील जमिनीची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. कामठी तालुक्यातील आठ एकर जमीन क्रीडा संकुलासाठी देण्यात आली आहे. या जमिनीच्या मोबदल्यात तितकीच जमीन जि.प.ला मिळणे अपेक्षित होते, परंतु असे झाले नाही.इच्छाशक्तीचा अभावजि.प.च्या जागा सुरक्षित असाव्या, सातबारावर नोंदी व्हाव्या यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. जि.प.अध्यक्ष निशा सावरकर व इतर पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यापासून या संदर्भात गंभीर नसल्याचे चित्र आहे. इच्छाशक्तीचा अभाव असल्याने तूर्त हा प्रश्न मार्गी लगण्याची शक्यता दिसत नाही.