शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
2
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
4
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
5
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
6
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
7
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
8
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
9
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
10
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
11
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
12
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
13
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
14
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
15
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
16
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
17
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
18
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
19
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता
20
धक्कादायक! अंकिता भंडारीचा खुनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही हसत राहिला, फोटोसाठी पोजही दिली

कोणीच नसताना ‘हे’ होतात विसरलेल्यांचे सोबती फक्त शोधतच नाही, तर हरवलेलं अस्तित्वही परत मिळवून देतात

By नरेश डोंगरे | Updated: May 27, 2025 22:41 IST

बक्कळ पैसा, नोकरी अन् छोकरी मिळविण्यासाठी समाजातील बहुतांश जण प्रयत्नरत असतानाच काही जण मात्र स्वत:ला विसरलेल्या मंडळींना शोधण्यासाठी धडपडत असतात.

नरेश डोंगरे

नागपूर : बक्कळ पैसा, नोकरी अन् छोकरी मिळविण्यासाठी समाजातील बहुतांश जण प्रयत्नरत असतानाच काही जण मात्र स्वत:ला विसरलेल्या मंडळींना शोधण्यासाठी धडपडत असतात. समाजदूत म्हणून काम करणारी ही मंडळी ‘प्रोफेशनल’ नसल्याने त्यांच्यावर प्रसिद्धीचा प्रकाशझोत पडत नाही. मात्र, जेव्हा त्यांचे कर्तृत्व पुढे येते तेव्हा समाज त्यांंना सॅल्युट केल्याशिवाय राहत नाही. आठ वर्षांत दोनशेवर मनोरुग्णांना मायेचा हात देणारी अशीच मंडळी ‘लोकमत’च्या नजरेस आली आहे. ही मंडळी स्वत:ला विसलेल्यांना फक्त शोधतच नाही तर त्यांना त्यांचे अस्तित्व परत मिळवून देण्यासाठीही झटते. 

स्वत:चा विसर पडल्याने जगभराच्या वेदना सोबत घेऊन फिरणारी मंडळी म्हणजे मनोरुग्ण. वेगवेगळ्या कारणांमुळे मनोरुग्ण झाल्यानंतर ते कोण, कुठले, याचे त्यांना स्मरणच उरत नाही. ते कशासाठी जगत आहे, त्याचेही त्यांना भान नसते. फाटके, मळके कपडे घातलेले किंवा उघडेनागडे दिसणारे हे बिचारे नुसतेच भटकत असतात. समाज, कुटुंबीयच काय, त्यांना स्वत:चीही पर्वा नसते. एकीकडे रखरखत्या उन्हात स्वत:ला चटके देत ते अनवाणी फिरतात, तर दुसरीकडे हाडं गोठविणाऱ्या थंडीत रात्री उशिरापर्यंत त्यांची उघडीनागडी भटकंती बघायला मिळते. कुणी दिले तर ठीक, नाही तर रस्त्यावर पडलेले काहीही उचलून खायचे अन् कोणतेही पाणी पिऊन पुन्हा पायाला भिंगरी बांधायची, अशी त्यांची दिनचर्या असते. याउलट वाईट स्थिती त्यांच्या कुटुंबीयांची असते. आपल्या माणसाला शोधण्यासाठी मनोरुग्णाचे नातेवाईक प्रचंड मानसिक आणि शारीरिक यातना सहन करीत असतात. अशांच्याच मदतीला धावून जाण्याचे, त्यांना दिलासा देण्याचे काम नागपुरातील सुमंत नारायणराव ठाकरे, आशिष कांबळे, प्रीतम भामरे आणि त्यांचे मित्र करीत आहेत. एमएलसी फाउंडेशन, सिंहगर्जना युवा मंच, टीडब्ल्यूझेड फाउंडेशन, तसेच राज्यातील नागपूर, पुणे, ठाणे आणि रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने ते मनोरुग्ण शोधण्याची मोहीम राबवीत आहेत.८ वर्षांत दोनशेवर मनोरुग्णांची मदत

या मित्रांनी गेल्या ८ वर्षांत राज्यात ठिकठिकाणी दोनशेवर मनोरुग्णांना शोधले. अलीकडे जानेवारी २०२५ सिंधुदुर्गमध्ये ७ मनोरुग्ण, फेब्रुवारी २०२५ मध्ये नागपूर जिल्ह्यात ९, मार्च २०२५ - कोल्हापूर, चिपळूणमध्ये २, एप्रिलमध्ये रत्नागिरीत ३ अशा २१ मनोरुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करून घेतले. त्यातील १३ जणांच्या कुटुंबीयांचाही पत्ता मिळवला अन् त्यांना त्यांचे गोकुळ परत मिळवून देण्याची कामगिरी त्यांनी बजावली आहे. ५ जणांना पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले असून, ३ जणांवर अद्यापही उपचार सुरू असल्याचे सुमंत सांगतो.