शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

कोणीच नसताना ‘हे’ होतात विसरलेल्यांचे सोबती फक्त शोधतच नाही, तर हरवलेलं अस्तित्वही परत मिळवून देतात

By नरेश डोंगरे | Updated: May 27, 2025 22:41 IST

बक्कळ पैसा, नोकरी अन् छोकरी मिळविण्यासाठी समाजातील बहुतांश जण प्रयत्नरत असतानाच काही जण मात्र स्वत:ला विसरलेल्या मंडळींना शोधण्यासाठी धडपडत असतात.

नरेश डोंगरे

नागपूर : बक्कळ पैसा, नोकरी अन् छोकरी मिळविण्यासाठी समाजातील बहुतांश जण प्रयत्नरत असतानाच काही जण मात्र स्वत:ला विसरलेल्या मंडळींना शोधण्यासाठी धडपडत असतात. समाजदूत म्हणून काम करणारी ही मंडळी ‘प्रोफेशनल’ नसल्याने त्यांच्यावर प्रसिद्धीचा प्रकाशझोत पडत नाही. मात्र, जेव्हा त्यांचे कर्तृत्व पुढे येते तेव्हा समाज त्यांंना सॅल्युट केल्याशिवाय राहत नाही. आठ वर्षांत दोनशेवर मनोरुग्णांना मायेचा हात देणारी अशीच मंडळी ‘लोकमत’च्या नजरेस आली आहे. ही मंडळी स्वत:ला विसलेल्यांना फक्त शोधतच नाही तर त्यांना त्यांचे अस्तित्व परत मिळवून देण्यासाठीही झटते. 

स्वत:चा विसर पडल्याने जगभराच्या वेदना सोबत घेऊन फिरणारी मंडळी म्हणजे मनोरुग्ण. वेगवेगळ्या कारणांमुळे मनोरुग्ण झाल्यानंतर ते कोण, कुठले, याचे त्यांना स्मरणच उरत नाही. ते कशासाठी जगत आहे, त्याचेही त्यांना भान नसते. फाटके, मळके कपडे घातलेले किंवा उघडेनागडे दिसणारे हे बिचारे नुसतेच भटकत असतात. समाज, कुटुंबीयच काय, त्यांना स्वत:चीही पर्वा नसते. एकीकडे रखरखत्या उन्हात स्वत:ला चटके देत ते अनवाणी फिरतात, तर दुसरीकडे हाडं गोठविणाऱ्या थंडीत रात्री उशिरापर्यंत त्यांची उघडीनागडी भटकंती बघायला मिळते. कुणी दिले तर ठीक, नाही तर रस्त्यावर पडलेले काहीही उचलून खायचे अन् कोणतेही पाणी पिऊन पुन्हा पायाला भिंगरी बांधायची, अशी त्यांची दिनचर्या असते. याउलट वाईट स्थिती त्यांच्या कुटुंबीयांची असते. आपल्या माणसाला शोधण्यासाठी मनोरुग्णाचे नातेवाईक प्रचंड मानसिक आणि शारीरिक यातना सहन करीत असतात. अशांच्याच मदतीला धावून जाण्याचे, त्यांना दिलासा देण्याचे काम नागपुरातील सुमंत नारायणराव ठाकरे, आशिष कांबळे, प्रीतम भामरे आणि त्यांचे मित्र करीत आहेत. एमएलसी फाउंडेशन, सिंहगर्जना युवा मंच, टीडब्ल्यूझेड फाउंडेशन, तसेच राज्यातील नागपूर, पुणे, ठाणे आणि रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने ते मनोरुग्ण शोधण्याची मोहीम राबवीत आहेत.८ वर्षांत दोनशेवर मनोरुग्णांची मदत

या मित्रांनी गेल्या ८ वर्षांत राज्यात ठिकठिकाणी दोनशेवर मनोरुग्णांना शोधले. अलीकडे जानेवारी २०२५ सिंधुदुर्गमध्ये ७ मनोरुग्ण, फेब्रुवारी २०२५ मध्ये नागपूर जिल्ह्यात ९, मार्च २०२५ - कोल्हापूर, चिपळूणमध्ये २, एप्रिलमध्ये रत्नागिरीत ३ अशा २१ मनोरुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करून घेतले. त्यातील १३ जणांच्या कुटुंबीयांचाही पत्ता मिळवला अन् त्यांना त्यांचे गोकुळ परत मिळवून देण्याची कामगिरी त्यांनी बजावली आहे. ५ जणांना पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले असून, ३ जणांवर अद्यापही उपचार सुरू असल्याचे सुमंत सांगतो.