शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

झोपडपट्टीधारकांना कधी मिळणार हक्काची घरे

By admin | Updated: November 4, 2015 03:17 IST

शहरातील गरिबांना हक्काची घरे मिळावी, सोबतच शहराचा चेहरामोहरा बदलावा, या हेतूने झोपडपट्टी पुनर्वसन

नागपूर : शहरातील गरिबांना हक्काची घरे मिळावी, सोबतच शहराचा चेहरामोहरा बदलावा, या हेतूने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे बीएसयूपी घरकूल योजना राबविली जात आहे. परंतु या योजनेचे काम संथ असल्याने गरिबांना घरे कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील १७ झोपडपट्ट्यांमधील नागरिकांसाठी ४ हजार ५५२ घरकुले या योजनेंतर्गत मंजूर झालेली आहेत. ही कामे डिसेबर २०१५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु योजना राबविताना अडचणी येत असल्याने जेमतेम १२०० घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना घरकुलासाठी वाट पहावी लागणार आहे.झोपडपट्टीत कच्चे बांधकाम करून अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांना चांगली घरे मिळावी, तसेच येथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात. हा या योजनेमागचा हेतू आहे. काही भागात घरांचे बांधकाम करण्यात आले. परंतु काही झोपडपट्ट्यांमध्ये अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. इंदिरा मातानगर वस्तीतील नागरिकांनी त्यांच्या वस्तीत घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानुसार कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु अद्याप येथील घरांचे काम पूर्ण झालेले नाही. वांजरा येथे २१४ तर नारी येथे २३४ घरकुलांचे काम सुरू आहे. २०१५ या वर्षात घरकु लांचे बांधकाम होण्याची शक्यता नसल्याने या योजनेसाठी २०१७ पर्यंत मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार ती देण्यात आली. काही ठिकाणी अद्याप बांधकामाला सुरुवात झालेली नाही. काही ठिकाणी गरजुंना डावलण्यात आल्याचा आरोप होत आहे. पांढराबोडी येथे घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. परंतु घरकू ल वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करून नगरसेवकांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, अद्याप याबाबतचा चौकशी अहवाल पुढे आलेला नाही.(प्रतिनिधी)तीन हजार घरे बांधल्याचा दावाशहरात तीन हजार घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यातील दोन हजार घरकुलांचे वाटप झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु नगरसेवकांनी याबाबतची माहिती जाहीर करण्याची मागणी सभागृहात केली आहे. प्रतिसाद नाहीकाही झोपडपट्टीधारकांच्या ताब्यात मोठी जागा आहे. मिळणारी घरे छोटी असल्याने अनेकांचा या योजनेला विरोध होता. त्यामुळे झोपडीधारकांना बांधकामासाठी अनुदान देण्याची मागणी पुढे आली आहे.