शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सत्ताधारीच जेव्हा विरोधक होतात... स्थगन प्रस्तावाला केला विरोध, जोरदार नारेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:11 IST

विधिमंडळात साधारणत: विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे कामकाज स्थगित होत असल्याचे दिसून येते. मात्र, बुधवारी विधान परिषदेत नेमके उलटे चित्र दिसून आले.

- योगेश पांडेनागपूर : विधिमंडळात साधारणत: विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे कामकाज स्थगित होत असल्याचे दिसून येते. मात्र, बुधवारी विधान परिषदेत नेमके उलटे चित्र दिसून आले. बोंडअळीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाचा विरोध करत, सत्ताधारी बाकांवरील सदस्य जोरदार नारेबाजी करत, सभापतींसमोरील मोकळ्या जागी जमा झाले. सलग चार वेळा कामकाज स्थगित झाल्यानंतर, अखेर उपसभापतींनी दिवसभरासाठीचे कामकाज तहकूब केले.बुधवारी कामकाज सुरू होताच, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी कामकाज सुरू करण्याबाबत निवेदन केले. मात्र, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकºयांच्या नुकसानीचा मुद्दा मांडला. येथूनच गोंधळाला सुरुवात झाली. गदारोळातच उपसभापतींनी प्रश्नोत्तरे पुकारल्यानंतर, सुनील तटकरे यांनी बोंडअळीच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. मात्र, सातत्याने दोन दिवस स्थगनवरील चर्चा नाकारल्यानंतर परत तोच प्रस्ताव मांडणे अयोग्य आहे, अशी भूमिका सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी घेतली. उपसभापतींनी तटकरे यांना बोलणे मांडण्याची परवानगी दिल्यामुळे, सत्ताधारी बाकांवरील सदस्य संतप्त झाले आणि घोषणाबाजी करत, उपसभापतींच्या आसनासमोर गोळा झाले. दुसरीकडे विरोधकदेखील घोषणा देत, आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनीदेखील नारे देण्यास सुरुवात केली. या गोंधळात चार वेळा कामकाज स्थगित करावे लागले. सत्ताधाºयांची नारेबाजी सुरू असतानाच तटकरे यांनी प्रस्ताव मांडला. उपसभापतींनी हा प्रस्ताव नाकारला. मात्र, तरीदेखील गोंधळ सुरूच होता. अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.मंत्रीच म्हणाले, ‘न्याय द्या!’सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आक्रमकपणे स्थगन प्रस्तावाचा विरोध केला. सभापतींच्या दालनातच स्थगन प्रस्ताव फेटाळण्यात आला असताना, त्यावर सभागृहात बोलण्याची आवश्यकताच नाही. शेतकºयांशी संबंधित सर्व मुद्द्यांवर आम्ही चर्चेला तयार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. विरोधकांकडून त्यांच्या भूमिकेवर गोंधळ सुरू झाल्यामुळे, पाटील यांनी ‘न्याय द्या, न्याय द्या’ अशी उपसभापतींकडे विनंती केली.पंचनामे झाले कुठे? : बोंडअळीच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. बोंडअळीच्या पंचनाम्याला कुठेही सुरुवात झालेली नाही. शासन विरोधकांची गळचेपी करत आहे. शेतकºयांविषयीच्या मुद्द्यांना उचलले की, गोंधळ होत आहे. यातूनच सत्ताधाºयांचा शेतकºयांविषयीचा दृष्टीकोन दिसून येत आहे. सरकार शेतकºयांची दिशाभूल करत आहे, असा आरोप तटकरे यांनी केला.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७