शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

नागपूर जिल्हा परिषद कधी होणार ‘पेपरलेस’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 11:18 IST

डिजिटल इंडियाअंतर्गत शासनाने ई-गव्हर्नन्सचे धोरण अवलंबले आहे. शासनाचे प्रत्येक कार्यालय आता इंटरनेटशी जुळलेले असून, पेपरलेस कामावर भर देण्यात येत आहे. असे असताना जि.प.चा पंचायत विभाग आजही फाईल्सच्या गठ्ठ्यांमध्ये अडकला आहे.

ठळक मुद्देजागोजागी पडलेत फाईलचे गठ्ठेपंचायत समितीमध्येही जुन्याच पद्धतीने कामे

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिजिटल इंडियाअंतर्गत शासनाने ई-गव्हर्नन्सचे धोरण अवलंबले आहे. शासनाचे प्रत्येक कार्यालय आता इंटरनेटशी जुळलेले असून, पेपरलेस कामावर भर देण्यात येत आहे. असे असताना जि.प.चा पंचायत विभाग आजही फाईल्सच्या गठ्ठ्यांमध्ये अडकला आहे. गावागावांना ‘आपले सेवा केंद्रा’ने जोडणाऱ्या या विभागाच्या कार्यालयात कागदपत्रांचे गठ्ठे जागोजागी पडलेले आहेत.केंद्र व राज्य सरकारने ई-गव्हर्नन्सवर भर देण्यासाठी अनेक प्रणाली आॅनलाईन केल्या आहेत. यात निविदा प्रक्रियेपासून सेवार्थ प्रणालीपर्यंत सगळ्या प्रणाली आॅनलाईन केल्या जात आहे. भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी व कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी व कामाचा वेग वाढविण्यासाठी आॅनलाईन कामकाजाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. परंतु जि.प.चा पंचायत विभाग पूर्णपणे आॅनलाईन झाला नसल्याचे कार्यालयाच्या अवस्थेवरून दिसून येते.कार्यालयाला पेपरलेस करण्यासाठी प्रशासनाने योजना राबविल्या आहेत. परंतु योजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सोमवारी दुपारी यासंदर्भात जि.प.च्या पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी वैयक्तिक भेटण्यास सांगितले. सायंकाळी ५ वाजता त्यांच्याशी भेट घेतली असता, त्यांनी ‘आपले सेवा केंद्रा’च्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. कार्यालयीन वेळेत केंद्र बंद होते. त्याचदरम्यान भुयारसुद्धा तेथून निघून गेले.

योजनेच्या माहितीचा अभावपंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पेपरलेससंदर्भात खुलासा होऊ न शकल्याने दुसऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांना पेपरलेस वर्किंगसंदर्भात माहिती नव्हती. पण काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, योजना आहेत, पण हे वरिष्ठ अधिकारीच सांगू शकेल. कार्यालयाची परिस्थिती लक्षात घेता, पेपरलेस बनविण्याकरिता कुठलेही गंभीर पाऊल उचलण्यात आले नाही. अधिकारीसुद्धा वरिष्ठांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकताना दिसून आले. कार्यालयात उपस्थित तीन अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

टॅग्स :Governmentसरकार