शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इस्राईलच्या धर्तीवर सुरक्षा व्यवस्था कधी? नागपूरच्या घटनेमुळे विषय पुन्हा ऐरणीवर, कैदीच बनलेत सुरक्षा रक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 21:50 IST

 आयुष निर्मल पुगलिया (वय २७) या कैद्याची येथील मध्यवर्ती कारागृहात निर्घृण हत्या झाल्याने नागपूरसह राज्यभरातील कारागृहांमधील कैद्यांची भांडणं आणि सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेला आली आहे.

- नरेश डोंगरे 

नागपूर, दि. 11 -  आयुष निर्मल पुगलिया (वय २७) या कैद्याची येथील मध्यवर्ती कारागृहात निर्घृण हत्या झाल्याने नागपूरसह राज्यभरातील कारागृहांमधील कैद्यांची भांडणं आणि सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेला आली आहे. सरकारकडून महाराष्ट्रातील कारागृहात इस्राईलच्या धर्तीवर सुरक्षा व्यवस्था उभारण्याची घोषणा झाली. मात्र, तूर्त ती कागदांवरच आहे. अनेक ठिकाणी कर्मचारी नसल्यामुळे खतरनाक कैदीच कारागृहात सुरक्षा रक्षक म्हणून कारभार करीत आहेत. 

 अंडरवर्ल्डच्या टोळ्यांमधील गुंडांची भांडण आणि त्यांचे गेम पूर्वी मुंबई आणि पुण्यातील येरवडा कारागृहात व्हायचे. इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी मोहम्मद कतिल मोहम्मद जाफर सिद्धीकी याची येरवडा कारागृहात शरद मोहोळ आणि आलोक भालेराव या गुंडांनी ८ जून २०१२ ला गळा आवळून हत्या केली होती. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर नाशिकच्या कारागृहात १६ आॅक्टोबर २०१३ ला विशाल बाळासाहेब चौधरी याची सोपान सुदाम पगारे याने खिळ्याची पाटी डोक्यात घालून हत्या केली. यामुळे हादरलेल्या कारागृह प्रशासनाने राज्यातील खतरनाक कैद्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलविणे सुरू केले. तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित कारागृह अशी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाची ख्याती होती.  मुंबई-पुण्यात ऐषोरामाची सवय जडलेल्या गुन्हेगारांनी नागपूरच्या कारागृहातील अधिकारी-कर्मचाºयांच्या खिशातही नोटांचे बंडल कोंबले.  येथील भ्रष्ट अधिका-यांमुळे हे मध्यवर्ती कारागृह खतरनाक कैद्यांचे नंदनवन बनले. कैद्यांना डनलॉपच्या गाद्यांसोबत मेवा-मिठाई, चिकन, मटण, दारू, गांजा अन् ऐषोरामाच्या सर्वच चीजवस्तू उपलब्ध करून दिल्या जाऊ लागल्या. (हे धक्कादायक वास्तव वेळोवेळी लोकमतने उघड केले. लोकमतने या संबंधाने तशी व्हिडीओ क्लीपच व्हायरल करून खळबळ उडवून दिली होती.) त्यानंतर या कारागृहात हत्या आणि हत्येचा प्रयत्न (प्राणघातक हल्ला) करण्याच्या घटनांची मालिकाच सुरू झाली. २९ नोव्हेंबर २०१५ ला अल्पेश शालिक वानखेडे या कैद्याला बेदम मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तो हत्येचाच प्रकार असल्याची ओरड झाली. २० जानेवारी २०१६ ला अनुराग ऊर्फ विनोद राजकुमार खन्ना याचाही बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाला. हा हत्येचाच प्रकार असल्याचा जोरदार आरोप झाला. चार वर्षांपूर्वी एका बराकीत दोन कैद्यांनी एकाची गळा दाबून हत्या केली. 

हे प्रकरणही त्यावेळी गाजले. २३ जून २०१७ ला भायखळाच्या कारागृहात मंजुळा शेट्येची हत्या झाली. येरवडाच्या कारागृहात दहशतवादी कतील सिद्धीकीव्यतिरिक्त सुखदेव मेघराज मेहकारकर याची दिनेश दबडेने हत्या केली. या बहुचर्चित हत्याकांडाची चर्चा कारागृह प्रशासनात ताजीच असताना आता आयुष पुगलियाची हत्या झाली. अशा घटना घडल्या की कारागृहातील सुरक्षा व्यवस्था कडक करणार, अशी घोषणा केली जाते. प्रत्यक्षात मात्र आणली जात नाही. नागपूरच्या कारागृहात इस्राायलच्या धर्तीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्याची घोषणा होऊन आता सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. इस्रायलचे पथकही त्यासाठी येथे येऊन गेले. मात्र, सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा झाली नाही.  

दहशतवादी सांभाळतात कैदी 

नागपूरच्या कारागृहातील रचना आणि मर्यादा ९०० कैद्यांची आहे. प्रत्यक्षात येथे २,४०० कैदी आहेत. खतरनाक नक्षलवादी,मुंबई- पुण्यातील बॉम्बस्फोटांसह ठिकठिकाणी झालेल्या घातपाताच्या घटनेतील दहशतवादी, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि अनेक टोळ्यातील शूटरचाही त्यात समावेश आहे. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी केवळ २०० अधिकारी-कर्मचा-यांवर आहे. दोन पाळीत ते काम करतात. अर्थात एका पाळीत १०० अधिकारी-कर्मचारी असतात. त्यात १० जण सुटीवर, १० जणांची साप्ताहिक रजा असते. १० ते १५ जण दुसºया जबाबदारीत गुंतले असतात. उरलेले ६५ ते ७० कैदी २,४०० कैद्यांना सांभाळण्याची कसरत कशी करीत असतील, त्याची कल्पनाच न केलेली बरी. हीच अवस्था राज्यभरातील कारागृहांची आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येकच कारागृहात खतरनाक कैदीच सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात तर काही कैद्यांसह मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दहशतवादी अब्दुल गनी तुर्क आणि मोहम्मद अजगर हे दोघे सुरक्षा रक्षक म्हणून कैद्यांना सांभाळण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.

भांडण, हाणामारी रोजचीच !

कारागृहात कैद्यांमधील भांडणं नेहमीचाच प्रकार झाला आहे. एकमेकांवर प्राणघातक हल्ला करण्याच्या घटनाही नेहमीच घडतात. अनेक घटनांची पोलिसात तक्रार होत नसल्याने त्या  बाहेर चर्चेला येत नाहीत.  जर्मन बेकरी हत्याकांडातील दहशतवादी हिमायत बेग आणि त्याच्या साथीदारांनी नागपुरातील बहुचर्चित युग चांडक अपहरण आणि हत्याकांडात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला राजेश धन्नालाल दवारे याला  २५ मे २०१६ ला बेदम मारहाण केली. त्याच्या हत्येचाही प्रयत्न केला. ५ जुलै २०१६ ला जांभुळकर आणि नागपूरे नामक कैद्यांनी चव्हाण नामक कैद्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. नारायण केवट याच्यावर २३ सप्टेंबर २०१५ ला, तर २०१४ च्या सप्टेंबर महिन्यात अमर लोहकरे याच्यावर आतमधील गुंडांनी प्राणघातक हल्ला चढवला होता. या व्यतिरिक्त अनेक अशा घटना आहेत की ज्या कारागृहाच्या बाहेर चर्चेलाच येत नाहीत. आंघोळीसाठी आणि नैसर्गिक विधीला अगोदर जाण्यासाठी कारागृहात त्यांच्यात जवळपास रोजच भांडणं होतात. याच कैद्यांपैकी काही जण (सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे) भांडण, हाणामारी करणारांना आवरत असतात. 

राज्य कारागृह प्रशासनाला हादरा

आयुष पुगलियाच्या हत्येमुळे राज्य कारागृह प्रशासनाला जोरदार हादरा बसला आहे. या संबंधाने कारागृह प्रशासन प्रमूख, अतिरिक्त पोलीस महासंचालक  डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी संपर्क करून ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली, अशी प्रस्तूत प्रतिनिधीने विचारणा केली. त्यावर बोलताना अद्याप काही स्पष्ट झाले नाही, असे ते म्हणाले. त्यांच्यात कोणते भांडण झाल्याचे आमच्या रेकॉर्डवर नाही. त्यामुळे हत्येसारखा गुन्हा कसा घडला, यावर भाष्य करता येत नाही. मात्र, या प्रकरणाला कारागृहातील कैदी, अधिकारी की कर्मचारी जबाबदार आहेत,त्याची चौकशी सुरू केल्याचे डॉ. उपाध्याय म्हणाले. या घटनेपासून बोध घेत राज्यातील सर्व कारागृहांच्या अधिका-यांना आज एक विशेष सूचना देण्यात आली असून, आपसात भांडणा-या कैद्यांवर विशेष लक्ष ठेवा, असे सूचविण्यता आले आहे, असेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हा