शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

इस्राईलच्या धर्तीवर सुरक्षा व्यवस्था कधी? नागपूरच्या घटनेमुळे विषय पुन्हा ऐरणीवर, कैदीच बनलेत सुरक्षा रक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 21:50 IST

 आयुष निर्मल पुगलिया (वय २७) या कैद्याची येथील मध्यवर्ती कारागृहात निर्घृण हत्या झाल्याने नागपूरसह राज्यभरातील कारागृहांमधील कैद्यांची भांडणं आणि सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेला आली आहे.

- नरेश डोंगरे 

नागपूर, दि. 11 -  आयुष निर्मल पुगलिया (वय २७) या कैद्याची येथील मध्यवर्ती कारागृहात निर्घृण हत्या झाल्याने नागपूरसह राज्यभरातील कारागृहांमधील कैद्यांची भांडणं आणि सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेला आली आहे. सरकारकडून महाराष्ट्रातील कारागृहात इस्राईलच्या धर्तीवर सुरक्षा व्यवस्था उभारण्याची घोषणा झाली. मात्र, तूर्त ती कागदांवरच आहे. अनेक ठिकाणी कर्मचारी नसल्यामुळे खतरनाक कैदीच कारागृहात सुरक्षा रक्षक म्हणून कारभार करीत आहेत. 

 अंडरवर्ल्डच्या टोळ्यांमधील गुंडांची भांडण आणि त्यांचे गेम पूर्वी मुंबई आणि पुण्यातील येरवडा कारागृहात व्हायचे. इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी मोहम्मद कतिल मोहम्मद जाफर सिद्धीकी याची येरवडा कारागृहात शरद मोहोळ आणि आलोक भालेराव या गुंडांनी ८ जून २०१२ ला गळा आवळून हत्या केली होती. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर नाशिकच्या कारागृहात १६ आॅक्टोबर २०१३ ला विशाल बाळासाहेब चौधरी याची सोपान सुदाम पगारे याने खिळ्याची पाटी डोक्यात घालून हत्या केली. यामुळे हादरलेल्या कारागृह प्रशासनाने राज्यातील खतरनाक कैद्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलविणे सुरू केले. तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित कारागृह अशी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाची ख्याती होती.  मुंबई-पुण्यात ऐषोरामाची सवय जडलेल्या गुन्हेगारांनी नागपूरच्या कारागृहातील अधिकारी-कर्मचाºयांच्या खिशातही नोटांचे बंडल कोंबले.  येथील भ्रष्ट अधिका-यांमुळे हे मध्यवर्ती कारागृह खतरनाक कैद्यांचे नंदनवन बनले. कैद्यांना डनलॉपच्या गाद्यांसोबत मेवा-मिठाई, चिकन, मटण, दारू, गांजा अन् ऐषोरामाच्या सर्वच चीजवस्तू उपलब्ध करून दिल्या जाऊ लागल्या. (हे धक्कादायक वास्तव वेळोवेळी लोकमतने उघड केले. लोकमतने या संबंधाने तशी व्हिडीओ क्लीपच व्हायरल करून खळबळ उडवून दिली होती.) त्यानंतर या कारागृहात हत्या आणि हत्येचा प्रयत्न (प्राणघातक हल्ला) करण्याच्या घटनांची मालिकाच सुरू झाली. २९ नोव्हेंबर २०१५ ला अल्पेश शालिक वानखेडे या कैद्याला बेदम मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तो हत्येचाच प्रकार असल्याची ओरड झाली. २० जानेवारी २०१६ ला अनुराग ऊर्फ विनोद राजकुमार खन्ना याचाही बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाला. हा हत्येचाच प्रकार असल्याचा जोरदार आरोप झाला. चार वर्षांपूर्वी एका बराकीत दोन कैद्यांनी एकाची गळा दाबून हत्या केली. 

हे प्रकरणही त्यावेळी गाजले. २३ जून २०१७ ला भायखळाच्या कारागृहात मंजुळा शेट्येची हत्या झाली. येरवडाच्या कारागृहात दहशतवादी कतील सिद्धीकीव्यतिरिक्त सुखदेव मेघराज मेहकारकर याची दिनेश दबडेने हत्या केली. या बहुचर्चित हत्याकांडाची चर्चा कारागृह प्रशासनात ताजीच असताना आता आयुष पुगलियाची हत्या झाली. अशा घटना घडल्या की कारागृहातील सुरक्षा व्यवस्था कडक करणार, अशी घोषणा केली जाते. प्रत्यक्षात मात्र आणली जात नाही. नागपूरच्या कारागृहात इस्राायलच्या धर्तीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्याची घोषणा होऊन आता सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. इस्रायलचे पथकही त्यासाठी येथे येऊन गेले. मात्र, सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा झाली नाही.  

दहशतवादी सांभाळतात कैदी 

नागपूरच्या कारागृहातील रचना आणि मर्यादा ९०० कैद्यांची आहे. प्रत्यक्षात येथे २,४०० कैदी आहेत. खतरनाक नक्षलवादी,मुंबई- पुण्यातील बॉम्बस्फोटांसह ठिकठिकाणी झालेल्या घातपाताच्या घटनेतील दहशतवादी, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि अनेक टोळ्यातील शूटरचाही त्यात समावेश आहे. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी केवळ २०० अधिकारी-कर्मचा-यांवर आहे. दोन पाळीत ते काम करतात. अर्थात एका पाळीत १०० अधिकारी-कर्मचारी असतात. त्यात १० जण सुटीवर, १० जणांची साप्ताहिक रजा असते. १० ते १५ जण दुसºया जबाबदारीत गुंतले असतात. उरलेले ६५ ते ७० कैदी २,४०० कैद्यांना सांभाळण्याची कसरत कशी करीत असतील, त्याची कल्पनाच न केलेली बरी. हीच अवस्था राज्यभरातील कारागृहांची आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येकच कारागृहात खतरनाक कैदीच सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात तर काही कैद्यांसह मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दहशतवादी अब्दुल गनी तुर्क आणि मोहम्मद अजगर हे दोघे सुरक्षा रक्षक म्हणून कैद्यांना सांभाळण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.

भांडण, हाणामारी रोजचीच !

कारागृहात कैद्यांमधील भांडणं नेहमीचाच प्रकार झाला आहे. एकमेकांवर प्राणघातक हल्ला करण्याच्या घटनाही नेहमीच घडतात. अनेक घटनांची पोलिसात तक्रार होत नसल्याने त्या  बाहेर चर्चेला येत नाहीत.  जर्मन बेकरी हत्याकांडातील दहशतवादी हिमायत बेग आणि त्याच्या साथीदारांनी नागपुरातील बहुचर्चित युग चांडक अपहरण आणि हत्याकांडात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला राजेश धन्नालाल दवारे याला  २५ मे २०१६ ला बेदम मारहाण केली. त्याच्या हत्येचाही प्रयत्न केला. ५ जुलै २०१६ ला जांभुळकर आणि नागपूरे नामक कैद्यांनी चव्हाण नामक कैद्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. नारायण केवट याच्यावर २३ सप्टेंबर २०१५ ला, तर २०१४ च्या सप्टेंबर महिन्यात अमर लोहकरे याच्यावर आतमधील गुंडांनी प्राणघातक हल्ला चढवला होता. या व्यतिरिक्त अनेक अशा घटना आहेत की ज्या कारागृहाच्या बाहेर चर्चेलाच येत नाहीत. आंघोळीसाठी आणि नैसर्गिक विधीला अगोदर जाण्यासाठी कारागृहात त्यांच्यात जवळपास रोजच भांडणं होतात. याच कैद्यांपैकी काही जण (सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे) भांडण, हाणामारी करणारांना आवरत असतात. 

राज्य कारागृह प्रशासनाला हादरा

आयुष पुगलियाच्या हत्येमुळे राज्य कारागृह प्रशासनाला जोरदार हादरा बसला आहे. या संबंधाने कारागृह प्रशासन प्रमूख, अतिरिक्त पोलीस महासंचालक  डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी संपर्क करून ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली, अशी प्रस्तूत प्रतिनिधीने विचारणा केली. त्यावर बोलताना अद्याप काही स्पष्ट झाले नाही, असे ते म्हणाले. त्यांच्यात कोणते भांडण झाल्याचे आमच्या रेकॉर्डवर नाही. त्यामुळे हत्येसारखा गुन्हा कसा घडला, यावर भाष्य करता येत नाही. मात्र, या प्रकरणाला कारागृहातील कैदी, अधिकारी की कर्मचारी जबाबदार आहेत,त्याची चौकशी सुरू केल्याचे डॉ. उपाध्याय म्हणाले. या घटनेपासून बोध घेत राज्यातील सर्व कारागृहांच्या अधिका-यांना आज एक विशेष सूचना देण्यात आली असून, आपसात भांडणा-या कैद्यांवर विशेष लक्ष ठेवा, असे सूचविण्यता आले आहे, असेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हा