शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

वाडी पालिकेची निवडणूक केव्हा?

By admin | Updated: November 22, 2014 02:37 IST

तीन महिन्यांपूर्वी वाडी ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा मिळाला. ग्रामपंचायत बरखास्त झाली. मात्र अद्याप निवडणूक झाली नसल्याने प्रशासकामार्फत काम सुरू आहे.

तीन महिन्यांपूर्वी वाडी ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा मिळाला. ग्रामपंचायत बरखास्त झाली. मात्र अद्याप निवडणूक झाली नसल्याने प्रशासकामार्फत काम सुरू आहे. परिणामी, तेथील विकासकामे खोळंबली असून कर्मचारीसुद्धा सुस्त झाल्याचे दिसून येते. वाडी ग्रामपंचायतला २५ आॅगस्ट २०१४ रोजी नगर परिषद घोषित करण्यात आले. नगर परिषदेचा दर्जा मिळताच ग्रामपंचायत बरखास्त करून नागपूर ग्रामीणच्या तहसीलदारांकडे प्रशासक म्हणून कार्यभार देण्यात आला. प्रशासक नियुक्त केला असला तरी लोकशाही मार्गाने नगर परिषदेचे कामकाज होणे गरजेचे आहे. त्यासाठी निवडणूक होणे आवश्यक आहे. परंतु, निवडणूकच न झाल्याने वाडी नगर परिषदेचे कामकाज अद्याप सुरळीत झाले नाही, असे दिसून येते. ग्रामपंचायत बरखास्त होताच येथील विकासकामे ठप्प पडली आहेत. प्रशासक म्हणून तहसीलदार आवश्यक तेवढा वेळ येथील कामासाठी देऊ शकत नाही. त्यातच त्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नाही. लोकप्रतिनिधी नसल्याने विकासकामांचा तसेच समस्या सोडविण्यासाठी तगादा लावणारा कुणीही नसल्याने नगर परिषदेचा ‘रामभरोसे कारभार’ सुरू आहे. नागरिकांना नगर परिषदेकडून विविध प्रमाणपत्राची आवश्यकता पडते. मात्र प्रशासक (तहसीलदार) नियमित कार्यालयात बसत नसल्याने नागरिकांना वारंवार नगर परिषदेच्या चकरा माराव्या लागतात. दोन-तीन दिवस कधी-कधी तर आठवडाभर चकरा मारल्यानंतर नागरिकांना प्रमाणपत्र मिळते, ही येथील वस्तुस्थिती आहे. नगर परिषद घोषित होताच या भागातील वॉर्ड क्र. २, ३, ४, ५ चे प्रतिनिधित्व करणारे जिल्हा परिषद सदस्य तसेच वॉर्ड क्र. २ व ४ आणि वॉर्ड क्र. ३ व ५ चे पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यामुळे या भागातील प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून ना पंचायत समितीत मांडू शकत; ना जिल्हा परिषदेत! असे असल्याने विकासकामे खोळंबली आहेत. समस्या सोडविल्या जात नाही. उलट समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.