शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

वाडी पालिकेची निवडणूक केव्हा?

By admin | Updated: November 22, 2014 02:37 IST

तीन महिन्यांपूर्वी वाडी ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा मिळाला. ग्रामपंचायत बरखास्त झाली. मात्र अद्याप निवडणूक झाली नसल्याने प्रशासकामार्फत काम सुरू आहे.

तीन महिन्यांपूर्वी वाडी ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा मिळाला. ग्रामपंचायत बरखास्त झाली. मात्र अद्याप निवडणूक झाली नसल्याने प्रशासकामार्फत काम सुरू आहे. परिणामी, तेथील विकासकामे खोळंबली असून कर्मचारीसुद्धा सुस्त झाल्याचे दिसून येते. वाडी ग्रामपंचायतला २५ आॅगस्ट २०१४ रोजी नगर परिषद घोषित करण्यात आले. नगर परिषदेचा दर्जा मिळताच ग्रामपंचायत बरखास्त करून नागपूर ग्रामीणच्या तहसीलदारांकडे प्रशासक म्हणून कार्यभार देण्यात आला. प्रशासक नियुक्त केला असला तरी लोकशाही मार्गाने नगर परिषदेचे कामकाज होणे गरजेचे आहे. त्यासाठी निवडणूक होणे आवश्यक आहे. परंतु, निवडणूकच न झाल्याने वाडी नगर परिषदेचे कामकाज अद्याप सुरळीत झाले नाही, असे दिसून येते. ग्रामपंचायत बरखास्त होताच येथील विकासकामे ठप्प पडली आहेत. प्रशासक म्हणून तहसीलदार आवश्यक तेवढा वेळ येथील कामासाठी देऊ शकत नाही. त्यातच त्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नाही. लोकप्रतिनिधी नसल्याने विकासकामांचा तसेच समस्या सोडविण्यासाठी तगादा लावणारा कुणीही नसल्याने नगर परिषदेचा ‘रामभरोसे कारभार’ सुरू आहे. नागरिकांना नगर परिषदेकडून विविध प्रमाणपत्राची आवश्यकता पडते. मात्र प्रशासक (तहसीलदार) नियमित कार्यालयात बसत नसल्याने नागरिकांना वारंवार नगर परिषदेच्या चकरा माराव्या लागतात. दोन-तीन दिवस कधी-कधी तर आठवडाभर चकरा मारल्यानंतर नागरिकांना प्रमाणपत्र मिळते, ही येथील वस्तुस्थिती आहे. नगर परिषद घोषित होताच या भागातील वॉर्ड क्र. २, ३, ४, ५ चे प्रतिनिधित्व करणारे जिल्हा परिषद सदस्य तसेच वॉर्ड क्र. २ व ४ आणि वॉर्ड क्र. ३ व ५ चे पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यामुळे या भागातील प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून ना पंचायत समितीत मांडू शकत; ना जिल्हा परिषदेत! असे असल्याने विकासकामे खोळंबली आहेत. समस्या सोडविल्या जात नाही. उलट समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.