शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत बदल कधी ?

By admin | Updated: November 29, 2015 03:29 IST

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत धोरणात्मक बदलीच्या प्रश्नाचे घोंगडे अजूनही भिजतच पडले आहे.

राज्यातील हजारो जि.प.शिक्षकांचा सवाल : आंदोलनाचा पवित्रायोगेश पांडे नागपूरजिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत धोरणात्मक बदलीच्या प्रश्नाचे घोंगडे अजूनही भिजतच पडले आहे. राज्यातील हजारो शिक्षकांना याचा फटका बसत असून अनेकांचे कौटुंबिक स्थैर्य नाहीसे झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नावर शिक्षकांचे समाधान झाले नसून या प्रक्रियेत बदल होणार कधी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कुटुंबापासून अनेक वर्षांपासून दूर असलेल्या या शिक्षकांच्या मागण्या ‘लोकमत’ने वेळोवेळी लावून धरल्या आहेत हे विशेष.गेल्या अनेक वर्षांपासून आंतरजिल्हा बदली शिक्षक न्यायाच्या प्रतीक्षेत ताटकळत आहेत. या बदली प्रकरणांमध्ये सध्या असलेल्या शासन निर्णयामुळे अनेक शिक्षक १० ते १५ वर्षे आंतरजिल्हा बदलीपासून वंचित आहेत. शिक्षक असलेले अनेक पती व पत्नी अनेक वर्षांपासून विविध जिल्ह्यांमध्ये नोकरीवर आहेत. त्यामुळे त्यांचे कौटुंबिक स्थैर्यच नाहीसे झाले आहे. आंतरजिल्हा बदल्या न झाल्याने १० ते १५ वर्षांपासून राज्यातील जवळपास १२ हजार शिक्षकांपैकी काही आई-वडिलांपासून, तर कोणी पत्नी-मुलांपासून दूर आहेत. कौटुंबिक स्थैर्य नसल्यामुळे त्याचा थेट परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे कारणदेखील शिक्षकांकडून देण्यात आले आहे.अशा शिक्षकांचे जिल्हा बदली प्रस्ताव विनाअट निकाली काढण्याची शिक्षकांची मागणी आहे. जिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यभरातील शिक्षक एकवटले आहेत. शिक्षक आंतरजिल्हा बदली सहकार कृती समितीच्या शिष्टमंडळाने पावसाळी अधिवेशनाच्या वेळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल, ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री, विरोधी पक्षनेते यांनाही निवेदन दिले होते. परंतु त्यावर अद्यापही सकारात्मक निर्णय झालेला नाही.कुटुंबासह आमरण उपोषणाचा आक्रमक इशाराशिक्षक आंतरजिल्हा बदली सहकार कृती समितीतर्फे पावसाळी अधिवेशनापासून आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. २८ जुलै रोजी मुंबई येथील आझाद मैदानात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. परंतु अद्यापही शासनाने मागण्यांची गंभीर दखल न घेतल्यामुळे ९ डिसेंबरपासून कुटुंबीयांसह नागपूरात बेमुदत आमरण उपोषण करण्याचा आक्रमक पवित्रा समितीने दिला आहे. यासंदर्भातील परवानगीचे पत्र पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे, अशी माहिती कृती समितीचे नागपूर संघटक विठ्ठल टेले यांनी दिली.(प्रतिनिधी)समितीच्या मुख्य मागण्यापती-पत्नी एकत्रीकरण प्रस्ताव विनाअट, विनाविलंब निकाली काढा.राज्याचे रोस्टर एकच करा.जिल्हानिहाय असलेले रोस्टर राज्यस्तरावर एकच करा. आंतरजिल्हा बदलीसाठी समान जात-संवगार्ची अट रद्द करून उमेदवार ते उमेदवार करा.नोव्हेंबर २००५ पासून सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी.आंतरजिल्हा शिक्षकांची बदलीनंतर सेवाज्येष्ठता मूळ नेमणूक दिनांकापासून गृहित धरा. राज्य स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करून बदली प्रक्रिया आॅनलाईन व्हावी.संपूर्ण सेवा काळात किमान तीन वेळा बदलीला मान्यता द्यावी.