शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपूर जिल्ह्यातील गव्हाचे पीक वाळण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 11:54 IST

सध्या गहू भरण्याचा काळ असून, पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. मौदा तालुक्यात सिंचनाची प्रभावी साधने नसल्याने पाण्याअभावी गव्हाचे पीक सध्या सुकण्याच्या मार्गावर आहे.

कालव्याचे पाणी सोडा : शेतकऱ्यांची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धानाची कापणी केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. सध्या गहू भरण्याचा काळ असून, पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. मौदा तालुक्यात सिंचनाची प्रभावी साधने नसल्याने पाण्याअभावी गव्हाचे पीक सध्या सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गव्हाच्या पिकाला संजीवनी देण्यासाठी ओलितासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मौदा तालुक्यात हक्काचे ओलिताचे साधन नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. तालुक्यात तलाव व बंधाऱ्यांची संख्या बरीच असली तरी बहुतांश तलाव व बंधारे दुरुस्तीअभावी गाळ साचल्याने बुजल्यागत झाले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून गव्हाची पेरणी केली. गव्हाचे पीक ११० ते १३० दिवसांचे आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी मिळणार अशी आशा बाळगत गव्हाची पेरणी केली.सुरुवातीला पेंच प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडल्याने पिकाला पाणी मिळाले. त्यामुळे आजवर गव्हाचे पीक जोमदार होते. सध्या गव्हाचे दाणे भरण्याचा काळ आहे. या काळात गव्हाच्या पिकाला पाण्याची नितांत गरज असते. मात्र, याच काळात ओलितासाठी पाणी मिळेनासे झाले आहे.उशिरा पेरणी व थंडीचा जोर कमी झाल्याने तसेच सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने गव्हाचे दाणे अपरिपक्व राहण्याची शक्यता बाळावली असून, यातून गव्हाचे उत्पादन व दर्जा खालावणार आहे. शिवाय, काही शिवारातील गव्हाचे पीक आता पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गवहाचे पीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खात व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती