शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील गव्हाचे पीक वाळण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 11:54 IST

सध्या गहू भरण्याचा काळ असून, पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. मौदा तालुक्यात सिंचनाची प्रभावी साधने नसल्याने पाण्याअभावी गव्हाचे पीक सध्या सुकण्याच्या मार्गावर आहे.

कालव्याचे पाणी सोडा : शेतकऱ्यांची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धानाची कापणी केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. सध्या गहू भरण्याचा काळ असून, पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. मौदा तालुक्यात सिंचनाची प्रभावी साधने नसल्याने पाण्याअभावी गव्हाचे पीक सध्या सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गव्हाच्या पिकाला संजीवनी देण्यासाठी ओलितासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मौदा तालुक्यात हक्काचे ओलिताचे साधन नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. तालुक्यात तलाव व बंधाऱ्यांची संख्या बरीच असली तरी बहुतांश तलाव व बंधारे दुरुस्तीअभावी गाळ साचल्याने बुजल्यागत झाले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून गव्हाची पेरणी केली. गव्हाचे पीक ११० ते १३० दिवसांचे आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी मिळणार अशी आशा बाळगत गव्हाची पेरणी केली.सुरुवातीला पेंच प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडल्याने पिकाला पाणी मिळाले. त्यामुळे आजवर गव्हाचे पीक जोमदार होते. सध्या गव्हाचे दाणे भरण्याचा काळ आहे. या काळात गव्हाच्या पिकाला पाण्याची नितांत गरज असते. मात्र, याच काळात ओलितासाठी पाणी मिळेनासे झाले आहे.उशिरा पेरणी व थंडीचा जोर कमी झाल्याने तसेच सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने गव्हाचे दाणे अपरिपक्व राहण्याची शक्यता बाळावली असून, यातून गव्हाचे उत्पादन व दर्जा खालावणार आहे. शिवाय, काही शिवारातील गव्हाचे पीक आता पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गवहाचे पीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खात व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती