शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल्स व रेस्टॉरंट बंद करून काय साध्य होणार; संचालकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 11:41 IST

Nagpur News राज्य शासनाने संपूर्ण राज्याला लेव्हल-३ मध्ये टाकून त्यानुसार सोई-सुविधा दिल्या आहेत. त्याअंतर्गत हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के क्षमता आणि दुपारी ४ वाजता बंद करायचे आहे.

ठळक मुद्दे- संचालकांना आर्थिक नुकसान : हॉटेल्स व रेस्टॉरंट बंद करून काय साध्य होणार? संचालकांचा सवाल - सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमता राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : राज्य शासनाने आठवड्यापूर्वी पाचस्तरीय धोरण घोषित करताना नागपूर जिल्ह्याला पहिल्या स्तरात टाकून त्याअंतर्गत येणाऱ्या सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे हॉटेल्स व रेस्टॉरंट रात्री ११ पर्यंत सुरू होते. पण आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविल्याने राज्य शासनाने संपूर्ण राज्याला लेव्हल-३ मध्ये टाकून त्यानुसार सोई-सुविधा दिल्या आहेत. त्याअंतर्गत हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के क्षमता आणि दुपारी ४ वाजता बंद करायचे आहे. दीड वर्षांपासून आर्थिक नुकसान सोसावे लागत असलेल्या हॉटेल्स व रेस्टॉरंट संचालकांच्या नुकसानीत आणखी भर पडणार आहे. हॉटेल्स व रेस्टॉरंट बंद करून काय साध्य होणार, असा संचालकांचा सवाल आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. याशिवाय मृत्यूवर नियंत्रण आले आहे. प्रशासनाने निर्बंध हटविल्याने विविध बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. ही गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संचालक म्हणाले, कोरोना निर्बंधामुळे राज्याच्या अन्य भागातील, शासकीय, कॉर्पोरेट आणि कंपन्याचे अधिकारी तसेच अन्य राज्यातील लोक नागपुरात येत नसल्याने नागपुरातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त हॉटेल्स व लॉज केवळ २० टक्के क्षमतेने सुरू आहेत. त्यातच आता ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्बंध टाकल्याने हॉटेल्समध्ये प्रवासी आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहक येणारच नाही. रेस्टॉरंटचा व्यवसाय रात्री ८ नंतरच असल्याने ग्राहक घराबाहेर निघण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे हॉटेल्स व रेस्टॉरंट संचालकांच्या आर्थिक नुकसानीत आणखी भर पडली आहे. त्यामुळे बँकांचे कर्ज व व्याजाचा बोझा वाढला आहे. गुजरात सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही प्रॉपर्टी टॅक्स आणि वीज अधिभारात सूट द्यावी, असे संचालकांचे मत आहे.

 

हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार?

राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाने हॉटेल्स व रेस्टॉरंटवर निर्बंध टाकल्याने संचालक अचंबित झाले आहेत. या आर्थिक नुकसानीतून बाहेर कसे पडावे, यावर ते चिंतेत आहेत. या व्यवसायासाठी दुपारी ४ पर्यंत वेळ सोईस्कर नाहीच. व्यवसाय होत नसल्याने कर्मचाऱ्यांना पगार कसा द्यायचा, हासुद्धा गंभीर प्रश्न आहे.

तेजिंदरसिंग रेणू, हॉटेल व्यावसायिक.

हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतो. उत्पन्न होत नसल्याने कर्मचारी ठेवून उपयोग नाही. ही स्थिती दीड वर्षांपासून आहे. पूर्वी व्यवसाय बंद असल्याने कर्मचाऱ्यांना काही महिने पूर्ण तर काही महिने अर्धे वेतन दिले. यावर्षीही कोरोनामुळे नुकसान सोसावे लागत आहे. कमी वेतनामुळे कर्मचारीही सोडून जात आहेत.

वसंत गुप्ता, हॉटेल व्यावसायिक.

 

हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल :

गेल्यावर्षी हॉटेल सहा महिने बंद असताना मालकाने अर्धा पगार दिला. त्यानंतर पूर्णवेळ पगार सुरू झाला. पण आता हॉटेलमध्ये ग्राहक नसल्याने मालकाने बऱ्याच कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. सध्या अर्धा पगार सुरू आहे. त्यामुळे कुटुंबांचा खर्च चालविणे कठीण झाले आहे.

सदानंद उइके, हॉटेल कर्मचारी.

 

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे कुटुंबाचे हाल होत आहे. गेल्यावर्षी चार महिने नोकरी नव्हती. यावर्षी नोकरी मिळाली आणि वेतन सुरू झाले. पण आता निर्बंधामुळे अर्धे वेतन मिळत आहे. या वेतनात कुटुंबाचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलले कठीण झाले आहे.

प्रणय देवळे, हॉटेल कर्मचारी.

 

- हॉटेल्स सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार असल्याने संचालकांना आर्थिक नुकसान आणि बँकांचे कर्ज व व्याजाचा बोझा वाढणार आहे.

 

- हॉटेल्स पूर्णवेळ सुरू राहणार नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन, हॉटेल्सची देखभाल, वीजबिल, इतर खर्च आदींची समस्या निर्माण झाली आहे.

- गेल्यावर्षी केंद्र सरकारच्या लॉकडाऊननंतर खर्च परवडत नसल्याच्या कारणाने अनेकांनी हॉटेल्स सुरू केले नाहीत. वारंवार निर्बंधामुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे.

टॅग्स :hotelहॉटेल