शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

हे काय आक्रित? अचानक का सुकायला लागली कडुनिंबाची झाडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 07:00 IST

Nagpur News एकाएकी नागपुरातील कडूनिंबाची झाडे वाळत चालली आहेत. यामागे नेमके काय कारण आहे याचा शास्त्रज्ञ शोध घेत आहेत.

ठळक मुद्देकर्नाटक, आंध्रनंतर महाराष्ट्रात राेगाचा प्रादुर्भाववनस्पती तज्ज्ञांनाही प्रश्न

निशांत वानखेडे

नागपूर : शहरातील कडुनिंबाची झाडे अचानक सुकायला लागल्याने पर्यावरणवाद्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. धक्कादायक म्हणजे कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर दक्षिणेकडील राज्यानंतर महाराष्ट्रातही कडुनिंबाच्या झाडाला हाेणाऱ्या या आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून नागपूरमध्येही हे चित्र दिसायला लागले आहे. वनस्पती तज्ज्ञांच्या मते या आजारावर उपाययाेजना करणे अशक्यप्राय असल्याने चिंता अधिकच वाढली आहे.

विशेष म्हणजे कडुनिंबाचे झाड आजारमुक्त झाड म्हणून ओळखले जाते. झाडाची पाने, फांद्या व खाेड मानवी शरीरासाठी आराेग्यदायी मानले जाते आणि पेस्टीसाईड म्हणून दात घासण्याच्या पेस्टपासून अनेक वस्तूंमध्ये कडुनिंबाचा उपयाेग केला जाताे. मात्र हेच कडुनिंबाचे झाड सध्या आजाराने ग्रासले आहे. सदरच्या माऊंट राेडवरील एका झाडाची पाने अशाचप्रकारे सुकायला लागली आहेत. सिव्हिल लाईन्स आणि प्रतापनगर परिसरातही काही सुकत चाललेली झाडे दिसून येत आहेत.

हा ‘डायबॅक’ आजाराचा प्रादुर्भाव

याबाबत कृषी महाविद्यालयाच्या ॲग्राेफाॅरेस्ट्री विभागाचे प्रमुख डाॅ. विजय इलाेरकर यांनी माहिती दिली. ही एक प्रकारची पिकांवर हल्ला करणाऱ्या टाेळधाडीप्रमाणे आहे. काही प्रजातीचे टाेळ विशिष्ट पिकांवर किंवा झाडांवर हल्ला करतात. ‘कि-माॅस्किटाे’ नामक टाेळ केवळ उंच असलेल्या कडुनिंबाच्या झाडावरच हल्ला करते. झाडाची काेवळी पाने खायला सुरुवात करते. या टाेळीच्या हल्ल्यानंतर झाडाला पुढे ‘डायबॅक’ नामक आजाराचा प्रादुर्भाव हाेताे. डायबॅक हा आजार केवळ कडुनिंबाच्या झाडालाच हाेताे. टाेळ टाेकावरची काेवळी पाने खाते व पाने सुकायला लागतात. नंतर खाेडही सुकते व त्यामुळे झाड मृतप्राय हाेऊन जाते. या टाेळीचा लहान किंवा तरुण झाडावर फारसा परिणाम हाेत नाही.

उपाय नसल्याने चिंता

डाॅ. इलाेरकर यांच्या मते कि-माॅस्किटाे टाेळीच्या नियंत्रणासाठी किंवा आजाराचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी सध्यातरी उपाय नाही. त्यामुळे चिंता अधिक आहे. सध्यातरी घरगुती उपाय म्हणून खाली पडलेला सुकलेला पाला जाळून त्याचा धूर करून टाेळीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. कृषी महाविद्यालय निरीक्षण करून उपाय करण्याचा प्रयत्न करेल.

दक्षिणेकडे शेकडाे झाडे बळी

कर्नाटक व आंध्रप्रदेशात या आजाराचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. त्याचा प्रकाेप तेलंगणा राज्यापर्यंत पाेहोचला असून या हल्ल्यात कडुनिंबाची शेकडाे झाडे बळी ठरली आहेत. आता हा प्रकाेप महाराष्ट्रातही दिसून येत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही हानीकारक बाब आहे. सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी भावना पर्यावरणप्रेमी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :wildlifeवन्यजीव