शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

हे काय आक्रित? अचानक का सुकायला लागली कडुनिंबाची झाडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 07:00 IST

Nagpur News एकाएकी नागपुरातील कडूनिंबाची झाडे वाळत चालली आहेत. यामागे नेमके काय कारण आहे याचा शास्त्रज्ञ शोध घेत आहेत.

ठळक मुद्देकर्नाटक, आंध्रनंतर महाराष्ट्रात राेगाचा प्रादुर्भाववनस्पती तज्ज्ञांनाही प्रश्न

निशांत वानखेडे

नागपूर : शहरातील कडुनिंबाची झाडे अचानक सुकायला लागल्याने पर्यावरणवाद्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. धक्कादायक म्हणजे कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर दक्षिणेकडील राज्यानंतर महाराष्ट्रातही कडुनिंबाच्या झाडाला हाेणाऱ्या या आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून नागपूरमध्येही हे चित्र दिसायला लागले आहे. वनस्पती तज्ज्ञांच्या मते या आजारावर उपाययाेजना करणे अशक्यप्राय असल्याने चिंता अधिकच वाढली आहे.

विशेष म्हणजे कडुनिंबाचे झाड आजारमुक्त झाड म्हणून ओळखले जाते. झाडाची पाने, फांद्या व खाेड मानवी शरीरासाठी आराेग्यदायी मानले जाते आणि पेस्टीसाईड म्हणून दात घासण्याच्या पेस्टपासून अनेक वस्तूंमध्ये कडुनिंबाचा उपयाेग केला जाताे. मात्र हेच कडुनिंबाचे झाड सध्या आजाराने ग्रासले आहे. सदरच्या माऊंट राेडवरील एका झाडाची पाने अशाचप्रकारे सुकायला लागली आहेत. सिव्हिल लाईन्स आणि प्रतापनगर परिसरातही काही सुकत चाललेली झाडे दिसून येत आहेत.

हा ‘डायबॅक’ आजाराचा प्रादुर्भाव

याबाबत कृषी महाविद्यालयाच्या ॲग्राेफाॅरेस्ट्री विभागाचे प्रमुख डाॅ. विजय इलाेरकर यांनी माहिती दिली. ही एक प्रकारची पिकांवर हल्ला करणाऱ्या टाेळधाडीप्रमाणे आहे. काही प्रजातीचे टाेळ विशिष्ट पिकांवर किंवा झाडांवर हल्ला करतात. ‘कि-माॅस्किटाे’ नामक टाेळ केवळ उंच असलेल्या कडुनिंबाच्या झाडावरच हल्ला करते. झाडाची काेवळी पाने खायला सुरुवात करते. या टाेळीच्या हल्ल्यानंतर झाडाला पुढे ‘डायबॅक’ नामक आजाराचा प्रादुर्भाव हाेताे. डायबॅक हा आजार केवळ कडुनिंबाच्या झाडालाच हाेताे. टाेळ टाेकावरची काेवळी पाने खाते व पाने सुकायला लागतात. नंतर खाेडही सुकते व त्यामुळे झाड मृतप्राय हाेऊन जाते. या टाेळीचा लहान किंवा तरुण झाडावर फारसा परिणाम हाेत नाही.

उपाय नसल्याने चिंता

डाॅ. इलाेरकर यांच्या मते कि-माॅस्किटाे टाेळीच्या नियंत्रणासाठी किंवा आजाराचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी सध्यातरी उपाय नाही. त्यामुळे चिंता अधिक आहे. सध्यातरी घरगुती उपाय म्हणून खाली पडलेला सुकलेला पाला जाळून त्याचा धूर करून टाेळीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. कृषी महाविद्यालय निरीक्षण करून उपाय करण्याचा प्रयत्न करेल.

दक्षिणेकडे शेकडाे झाडे बळी

कर्नाटक व आंध्रप्रदेशात या आजाराचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. त्याचा प्रकाेप तेलंगणा राज्यापर्यंत पाेहोचला असून या हल्ल्यात कडुनिंबाची शेकडाे झाडे बळी ठरली आहेत. आता हा प्रकाेप महाराष्ट्रातही दिसून येत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही हानीकारक बाब आहे. सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी भावना पर्यावरणप्रेमी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :wildlifeवन्यजीव