शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

हे काय आक्रित? अचानक का सुकायला लागली कडुनिंबाची झाडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 07:00 IST

Nagpur News एकाएकी नागपुरातील कडूनिंबाची झाडे वाळत चालली आहेत. यामागे नेमके काय कारण आहे याचा शास्त्रज्ञ शोध घेत आहेत.

ठळक मुद्देकर्नाटक, आंध्रनंतर महाराष्ट्रात राेगाचा प्रादुर्भाववनस्पती तज्ज्ञांनाही प्रश्न

निशांत वानखेडे

नागपूर : शहरातील कडुनिंबाची झाडे अचानक सुकायला लागल्याने पर्यावरणवाद्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. धक्कादायक म्हणजे कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर दक्षिणेकडील राज्यानंतर महाराष्ट्रातही कडुनिंबाच्या झाडाला हाेणाऱ्या या आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून नागपूरमध्येही हे चित्र दिसायला लागले आहे. वनस्पती तज्ज्ञांच्या मते या आजारावर उपाययाेजना करणे अशक्यप्राय असल्याने चिंता अधिकच वाढली आहे.

विशेष म्हणजे कडुनिंबाचे झाड आजारमुक्त झाड म्हणून ओळखले जाते. झाडाची पाने, फांद्या व खाेड मानवी शरीरासाठी आराेग्यदायी मानले जाते आणि पेस्टीसाईड म्हणून दात घासण्याच्या पेस्टपासून अनेक वस्तूंमध्ये कडुनिंबाचा उपयाेग केला जाताे. मात्र हेच कडुनिंबाचे झाड सध्या आजाराने ग्रासले आहे. सदरच्या माऊंट राेडवरील एका झाडाची पाने अशाचप्रकारे सुकायला लागली आहेत. सिव्हिल लाईन्स आणि प्रतापनगर परिसरातही काही सुकत चाललेली झाडे दिसून येत आहेत.

हा ‘डायबॅक’ आजाराचा प्रादुर्भाव

याबाबत कृषी महाविद्यालयाच्या ॲग्राेफाॅरेस्ट्री विभागाचे प्रमुख डाॅ. विजय इलाेरकर यांनी माहिती दिली. ही एक प्रकारची पिकांवर हल्ला करणाऱ्या टाेळधाडीप्रमाणे आहे. काही प्रजातीचे टाेळ विशिष्ट पिकांवर किंवा झाडांवर हल्ला करतात. ‘कि-माॅस्किटाे’ नामक टाेळ केवळ उंच असलेल्या कडुनिंबाच्या झाडावरच हल्ला करते. झाडाची काेवळी पाने खायला सुरुवात करते. या टाेळीच्या हल्ल्यानंतर झाडाला पुढे ‘डायबॅक’ नामक आजाराचा प्रादुर्भाव हाेताे. डायबॅक हा आजार केवळ कडुनिंबाच्या झाडालाच हाेताे. टाेळ टाेकावरची काेवळी पाने खाते व पाने सुकायला लागतात. नंतर खाेडही सुकते व त्यामुळे झाड मृतप्राय हाेऊन जाते. या टाेळीचा लहान किंवा तरुण झाडावर फारसा परिणाम हाेत नाही.

उपाय नसल्याने चिंता

डाॅ. इलाेरकर यांच्या मते कि-माॅस्किटाे टाेळीच्या नियंत्रणासाठी किंवा आजाराचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी सध्यातरी उपाय नाही. त्यामुळे चिंता अधिक आहे. सध्यातरी घरगुती उपाय म्हणून खाली पडलेला सुकलेला पाला जाळून त्याचा धूर करून टाेळीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. कृषी महाविद्यालय निरीक्षण करून उपाय करण्याचा प्रयत्न करेल.

दक्षिणेकडे शेकडाे झाडे बळी

कर्नाटक व आंध्रप्रदेशात या आजाराचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. त्याचा प्रकाेप तेलंगणा राज्यापर्यंत पाेहोचला असून या हल्ल्यात कडुनिंबाची शेकडाे झाडे बळी ठरली आहेत. आता हा प्रकाेप महाराष्ट्रातही दिसून येत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही हानीकारक बाब आहे. सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी भावना पर्यावरणप्रेमी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :wildlifeवन्यजीव