शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

हे काय आक्रित? अचानक का सुकायला लागली कडुनिंबाची झाडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 07:00 IST

Nagpur News एकाएकी नागपुरातील कडूनिंबाची झाडे वाळत चालली आहेत. यामागे नेमके काय कारण आहे याचा शास्त्रज्ञ शोध घेत आहेत.

ठळक मुद्देकर्नाटक, आंध्रनंतर महाराष्ट्रात राेगाचा प्रादुर्भाववनस्पती तज्ज्ञांनाही प्रश्न

निशांत वानखेडे

नागपूर : शहरातील कडुनिंबाची झाडे अचानक सुकायला लागल्याने पर्यावरणवाद्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. धक्कादायक म्हणजे कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर दक्षिणेकडील राज्यानंतर महाराष्ट्रातही कडुनिंबाच्या झाडाला हाेणाऱ्या या आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून नागपूरमध्येही हे चित्र दिसायला लागले आहे. वनस्पती तज्ज्ञांच्या मते या आजारावर उपाययाेजना करणे अशक्यप्राय असल्याने चिंता अधिकच वाढली आहे.

विशेष म्हणजे कडुनिंबाचे झाड आजारमुक्त झाड म्हणून ओळखले जाते. झाडाची पाने, फांद्या व खाेड मानवी शरीरासाठी आराेग्यदायी मानले जाते आणि पेस्टीसाईड म्हणून दात घासण्याच्या पेस्टपासून अनेक वस्तूंमध्ये कडुनिंबाचा उपयाेग केला जाताे. मात्र हेच कडुनिंबाचे झाड सध्या आजाराने ग्रासले आहे. सदरच्या माऊंट राेडवरील एका झाडाची पाने अशाचप्रकारे सुकायला लागली आहेत. सिव्हिल लाईन्स आणि प्रतापनगर परिसरातही काही सुकत चाललेली झाडे दिसून येत आहेत.

हा ‘डायबॅक’ आजाराचा प्रादुर्भाव

याबाबत कृषी महाविद्यालयाच्या ॲग्राेफाॅरेस्ट्री विभागाचे प्रमुख डाॅ. विजय इलाेरकर यांनी माहिती दिली. ही एक प्रकारची पिकांवर हल्ला करणाऱ्या टाेळधाडीप्रमाणे आहे. काही प्रजातीचे टाेळ विशिष्ट पिकांवर किंवा झाडांवर हल्ला करतात. ‘कि-माॅस्किटाे’ नामक टाेळ केवळ उंच असलेल्या कडुनिंबाच्या झाडावरच हल्ला करते. झाडाची काेवळी पाने खायला सुरुवात करते. या टाेळीच्या हल्ल्यानंतर झाडाला पुढे ‘डायबॅक’ नामक आजाराचा प्रादुर्भाव हाेताे. डायबॅक हा आजार केवळ कडुनिंबाच्या झाडालाच हाेताे. टाेळ टाेकावरची काेवळी पाने खाते व पाने सुकायला लागतात. नंतर खाेडही सुकते व त्यामुळे झाड मृतप्राय हाेऊन जाते. या टाेळीचा लहान किंवा तरुण झाडावर फारसा परिणाम हाेत नाही.

उपाय नसल्याने चिंता

डाॅ. इलाेरकर यांच्या मते कि-माॅस्किटाे टाेळीच्या नियंत्रणासाठी किंवा आजाराचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी सध्यातरी उपाय नाही. त्यामुळे चिंता अधिक आहे. सध्यातरी घरगुती उपाय म्हणून खाली पडलेला सुकलेला पाला जाळून त्याचा धूर करून टाेळीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. कृषी महाविद्यालय निरीक्षण करून उपाय करण्याचा प्रयत्न करेल.

दक्षिणेकडे शेकडाे झाडे बळी

कर्नाटक व आंध्रप्रदेशात या आजाराचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. त्याचा प्रकाेप तेलंगणा राज्यापर्यंत पाेहोचला असून या हल्ल्यात कडुनिंबाची शेकडाे झाडे बळी ठरली आहेत. आता हा प्रकाेप महाराष्ट्रातही दिसून येत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही हानीकारक बाब आहे. सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी भावना पर्यावरणप्रेमी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :wildlifeवन्यजीव