शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तुमची जमीन आरक्षित झाल्यास काय कराल? काय म्हणतो प्रादेशिक नियोजन व नगररचना कायदा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2023 09:00 IST

Nagpur News महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना कायद्यांतर्गत तुमची जमीन आरक्षित झाल्यास आणि तुम्हाला आरक्षण रद्द करायचे असल्यास काय कराल ? याचे उत्तर नसेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आहात. कारण, यासंदर्भात कायद्यात काय तरतूद आहे, याची माहिती तुम्हाला येथे मिळेल.

राकेश घानोडे

नागपूर : महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना कायद्यांतर्गत तुमची जमीन आरक्षित झाल्यास आणि तुम्हाला आरक्षण रद्द करायचे असल्यास काय कराल ? याचे उत्तर नसेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आहात. कारण, यासंदर्भात कायद्यात काय तरतूद आहे, याची माहिती तुम्हाला येथे मिळेल.

सक्षम प्राधिकरणे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना कायद्यांतर्गत एखाद्या शहराचा विकास आराखडा तयार करताना खासगी जमिनीही विविध उद्देशाकरिता आरक्षित करू शकतात. परंतु, यानंतर विशिष्ट परिस्थितीमध्ये संबंधित जमीन मालकाला त्या जमिनीचे आरक्षण रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकतो. त्या विशिष्ट परिस्थितीची तरतूद कायद्यातील कलम १२७ मध्ये करण्यात आली आहे. या कलमानुसार, या कायद्यांतर्गत एखाद्या उद्देशाकरिता आरक्षित केलेली, वाटप केलेली किंवा नेमून दिलेली जमीन, अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून दहा वर्षांंच्या कालावधीत संपादित केली गेली नाही तर जमीन मालक किंवा त्या जमिनीमध्ये रुची असलेली इतर व्यक्ती संबंधित सक्षम प्राधिकरणला जमीन खरेदी करण्यासंदर्भात नोटीस जारी करू शकते. तसेच, सक्षम प्राधिकरणने ती नोटीस तामील झाल्यापासून २४ महिन्यांत जमीन संपादित करण्यासाठी काहीच कृती केली नाही तर जमिनीचे आरक्षण, वाटप व नेमणूक रद्द समजली जाते. त्यानंतर ती जमीन संबंधित मालकाला विकासाच्या उद्देशाकरिता उपलब्ध करून दिली जाते.

विकास आराखड्यात सुधारणा झाल्यास ?

कलम २ (९) मधील व्याख्येनुसार विकास आराखड्यामध्ये सुधारित विकास आराखड्याचाही समावेश होतो. त्यामुळे आधी प्रसिद्ध झालेल्या अंतिम विकास आराखड्यात कलम ३८ अंतर्गत भविष्यामध्ये सुधारणा केली गेल्यास, सक्षम प्राधिकरणला आरक्षित जमीन संपादित करण्यासाठी सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून दहा वर्षांची नवीन मुदत मिळते. कारण, कलम ३१(६) अनुसार तो सुधारित विकास आराखडा हा अंतिम विकास आराखडा बनतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘मंदाकिनी खंगार व इतर’ प्रकरणामध्ये गेल्या ४ मे रोजी दिलेल्या निर्णयात ही बाब स्पष्ट केली आहे. या परिस्थितीत सक्षम प्राधिकरण सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून दहा वर्षांमध्ये आरक्षित जमीन संपादित करण्यात अपयशी ठरल्यास जमीन मालकाला आरक्षण रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होतो.

मालकांनी योग्य काळजी घ्यावी

या कायद्यांतर्गत जमीन आरक्षणमुक्त करण्यासाठी मालकांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. १० वर्षांत जमिनीचे संपादन झाले नाही तर सक्षम प्राधिकरणला लगेच कलम १२७ अंतर्गत नोटीस जारी केली पाहिजे. तसेच, नोटीससोबत जमिनीच्या मालकी हक्काची कागदपत्रे व आरक्षणाला १० वर्षे पूर्ण झाल्याचे पुरावे जोडणे गरजेचे आहे.

- ॲड. महेश धात्रक, हायकोर्ट.

टॅग्स :Governmentसरकार