शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुमची जमीन आरक्षित झाल्यास काय कराल? काय म्हणतो प्रादेशिक नियोजन व नगररचना कायदा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2023 09:00 IST

Nagpur News महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना कायद्यांतर्गत तुमची जमीन आरक्षित झाल्यास आणि तुम्हाला आरक्षण रद्द करायचे असल्यास काय कराल ? याचे उत्तर नसेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आहात. कारण, यासंदर्भात कायद्यात काय तरतूद आहे, याची माहिती तुम्हाला येथे मिळेल.

राकेश घानोडे

नागपूर : महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना कायद्यांतर्गत तुमची जमीन आरक्षित झाल्यास आणि तुम्हाला आरक्षण रद्द करायचे असल्यास काय कराल ? याचे उत्तर नसेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आहात. कारण, यासंदर्भात कायद्यात काय तरतूद आहे, याची माहिती तुम्हाला येथे मिळेल.

सक्षम प्राधिकरणे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना कायद्यांतर्गत एखाद्या शहराचा विकास आराखडा तयार करताना खासगी जमिनीही विविध उद्देशाकरिता आरक्षित करू शकतात. परंतु, यानंतर विशिष्ट परिस्थितीमध्ये संबंधित जमीन मालकाला त्या जमिनीचे आरक्षण रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकतो. त्या विशिष्ट परिस्थितीची तरतूद कायद्यातील कलम १२७ मध्ये करण्यात आली आहे. या कलमानुसार, या कायद्यांतर्गत एखाद्या उद्देशाकरिता आरक्षित केलेली, वाटप केलेली किंवा नेमून दिलेली जमीन, अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून दहा वर्षांंच्या कालावधीत संपादित केली गेली नाही तर जमीन मालक किंवा त्या जमिनीमध्ये रुची असलेली इतर व्यक्ती संबंधित सक्षम प्राधिकरणला जमीन खरेदी करण्यासंदर्भात नोटीस जारी करू शकते. तसेच, सक्षम प्राधिकरणने ती नोटीस तामील झाल्यापासून २४ महिन्यांत जमीन संपादित करण्यासाठी काहीच कृती केली नाही तर जमिनीचे आरक्षण, वाटप व नेमणूक रद्द समजली जाते. त्यानंतर ती जमीन संबंधित मालकाला विकासाच्या उद्देशाकरिता उपलब्ध करून दिली जाते.

विकास आराखड्यात सुधारणा झाल्यास ?

कलम २ (९) मधील व्याख्येनुसार विकास आराखड्यामध्ये सुधारित विकास आराखड्याचाही समावेश होतो. त्यामुळे आधी प्रसिद्ध झालेल्या अंतिम विकास आराखड्यात कलम ३८ अंतर्गत भविष्यामध्ये सुधारणा केली गेल्यास, सक्षम प्राधिकरणला आरक्षित जमीन संपादित करण्यासाठी सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून दहा वर्षांची नवीन मुदत मिळते. कारण, कलम ३१(६) अनुसार तो सुधारित विकास आराखडा हा अंतिम विकास आराखडा बनतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘मंदाकिनी खंगार व इतर’ प्रकरणामध्ये गेल्या ४ मे रोजी दिलेल्या निर्णयात ही बाब स्पष्ट केली आहे. या परिस्थितीत सक्षम प्राधिकरण सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून दहा वर्षांमध्ये आरक्षित जमीन संपादित करण्यात अपयशी ठरल्यास जमीन मालकाला आरक्षण रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होतो.

मालकांनी योग्य काळजी घ्यावी

या कायद्यांतर्गत जमीन आरक्षणमुक्त करण्यासाठी मालकांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. १० वर्षांत जमिनीचे संपादन झाले नाही तर सक्षम प्राधिकरणला लगेच कलम १२७ अंतर्गत नोटीस जारी केली पाहिजे. तसेच, नोटीससोबत जमिनीच्या मालकी हक्काची कागदपत्रे व आरक्षणाला १० वर्षे पूर्ण झाल्याचे पुरावे जोडणे गरजेचे आहे.

- ॲड. महेश धात्रक, हायकोर्ट.

टॅग्स :Governmentसरकार