शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकांना केंद्राचे पॅकेज, रिझर्व्ह बँकेची भूमिका काय

By admin | Updated: September 6, 2014 03:05 IST

देशातील आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्हा सहकारी बँकांना पुनर्जीवित करण्यासाठी २३७५ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.

नागपूर : देशातील आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्हा सहकारी बँकांना पुनर्जीवित करण्यासाठी २३७५ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ही बाब लक्षात घेता नागपूर, वर्धा व बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसंदर्भात रिझर्व्ह बँकेने काय भूमिका घेतली आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, शुक्रवारी केली. रिझर्व्ह बँकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. आर्थिक अडचणींमुळे चार टक्के भांडवल पर्याप्ततेची (सीआरएआर) अट पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या नागपूर, वर्धा व बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने गेल्या ९ मे रोजी ‘बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट-१९४९’च्या कलम २२(५) अन्वये हा निर्णय घेऊन तिन्ही बँकांना बँकिंग व्यवहार थांबविण्याचे आदेश दिले आहेत. याविरुद्ध बँकांनी उच्च न्यायालयात वेगवेगळ्या रिट याचिका दाखल केल्या आहेत. उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेच्या आदेशावर अंतरिम स्थगिती दिलेली आहे. दरम्यान, केंद्र शासनाने देशातील २३ जिल्हा सहकारी बँकांना पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात उत्तर प्रदेशातील १६, महाराष्ट्रातील ३, जम्मू-काश्मीरमधील ३, तर पश्चिम बंगालमधील एका बँकेचा समावेश आहे. याशिवाय राज्य शासनाने १९ जून रोजी तिन्ही बँकांना ३१९.५४ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नागपूर बँकेला ९२.९४ कोटी, वर्धा बँकेला १०२.५६ कोटी, तर बुलडाणा बँकेला १२४.०४ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. परंतु, त्यासाठी विविध जाचक अटी ठेवण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाने बँकांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतरच व रिझर्व्ह बँकेने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करून परवाना देण्याची तयारी दर्शविल्यावरच तिन्ही बँकांना अर्थसाहाय्य करण्यात यावे, अशी एक अट होती. यावर तिन्ही जिल्हा सहकारी व रिझर्व्ह बँकेने आक्षेप घेतला होता. यानंतर शासनाने न्यायालयाच्या निर्णयासंदर्भातील अट वगळली, पण रिझर्व्ह बँकेने परवाना देण्याची अट कायम ठेवली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मुकेश समर्थ यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)