शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

रस्ते अपघातांत नेमके बळी किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:41 IST

उपराजधानीतील रस्ते अपघातांमध्ये नेमके किती बळी गेले याबाबत प्रशासकीय पातळीवरच संभ्रम असल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देमंत्रालय आणि वाहतूक शाखेच्या माहितीत तफावत : मृत्यूच्या आकडेवारीबाबत प्रशासकीय गोंधळ योगेश पांडे।

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील रस्ते अपघातांमध्ये नेमके किती बळी गेले याबाबत प्रशासकीय पातळीवरच संभ्रम असल्याची बाब समोर आली आहे. एकीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे २०१६ साली नागपुरातील अपघातांमध्ये ३०७ बळी गेल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीत हाच आकडा ३१० इतका आहे. मृतांच्या आकडेवारीत केवळ तीनचा फरक असला तरी यातून प्रशासकीय गोंधळ निश्चितच समोर आला आहे.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने देशपातळीवर झालेल्या अपघातांचा अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालात १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ५० शहरांतील आकडेवारीदेखील आहे. २०१६ साली नागपुरात १ हजार ३७३ अपघात झाले व यात ३०७ बळी गेले असे नमूद आहे. मात्र नागपूर पोलिसांच्या वाहतूक विभागाची आकडेवारी वेगळेच आकडे देत आहे.‘लोकमत’कडे २२ एप्रिल २०१७ रोजी माहितीच्या अधिकारात वाहतूक विभागाने दिलेली रस्त्यांची आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार शहरात २०१६ मध्ये रस्ते अपघातांमध्ये ३१० नागरिकांचा मृत्यू झाला होता असे स्पष्ट करण्यात आले आहे. मंत्रालय आणि वाहतूक शाखेच्या आकडेवारीत तीन मृत्यूंचा फरक आहे. मंत्रालयाला ही माहिती शहर प्रशासनाकडूनच पुरविण्यात आली असेल. बळींच्या फरकाचा आकडा मोठा नसला तरी प्रशासकीय पातळीवर ही बाब गंभीरतेने घेतली जाणारी निश्चितच आहे. शिवाय मृतांचा आकडा नेमका किती असा संभ्रमदेखील निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे खुद्द नागपूरचे असतानादेखील त्यांच्या शहरातील आकडेवारीबाबत इतकी तफावत असेल तर बाकी शहरांत काय स्थिती असेल असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.