शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघातांत नेमके बळी किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:41 IST

उपराजधानीतील रस्ते अपघातांमध्ये नेमके किती बळी गेले याबाबत प्रशासकीय पातळीवरच संभ्रम असल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देमंत्रालय आणि वाहतूक शाखेच्या माहितीत तफावत : मृत्यूच्या आकडेवारीबाबत प्रशासकीय गोंधळ योगेश पांडे।

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील रस्ते अपघातांमध्ये नेमके किती बळी गेले याबाबत प्रशासकीय पातळीवरच संभ्रम असल्याची बाब समोर आली आहे. एकीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे २०१६ साली नागपुरातील अपघातांमध्ये ३०७ बळी गेल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीत हाच आकडा ३१० इतका आहे. मृतांच्या आकडेवारीत केवळ तीनचा फरक असला तरी यातून प्रशासकीय गोंधळ निश्चितच समोर आला आहे.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने देशपातळीवर झालेल्या अपघातांचा अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालात १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ५० शहरांतील आकडेवारीदेखील आहे. २०१६ साली नागपुरात १ हजार ३७३ अपघात झाले व यात ३०७ बळी गेले असे नमूद आहे. मात्र नागपूर पोलिसांच्या वाहतूक विभागाची आकडेवारी वेगळेच आकडे देत आहे.‘लोकमत’कडे २२ एप्रिल २०१७ रोजी माहितीच्या अधिकारात वाहतूक विभागाने दिलेली रस्त्यांची आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार शहरात २०१६ मध्ये रस्ते अपघातांमध्ये ३१० नागरिकांचा मृत्यू झाला होता असे स्पष्ट करण्यात आले आहे. मंत्रालय आणि वाहतूक शाखेच्या आकडेवारीत तीन मृत्यूंचा फरक आहे. मंत्रालयाला ही माहिती शहर प्रशासनाकडूनच पुरविण्यात आली असेल. बळींच्या फरकाचा आकडा मोठा नसला तरी प्रशासकीय पातळीवर ही बाब गंभीरतेने घेतली जाणारी निश्चितच आहे. शिवाय मृतांचा आकडा नेमका किती असा संभ्रमदेखील निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे खुद्द नागपूरचे असतानादेखील त्यांच्या शहरातील आकडेवारीबाबत इतकी तफावत असेल तर बाकी शहरांत काय स्थिती असेल असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.