शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य व नाट्य अशा दोन वेगळ्या संमेलनांची गरज काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 21:26 IST

अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी मराठी भाषेच्या साहित्यिकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मराठी साहित्यात नाटकांना स्थान देण्यात येत नाही. त्यामुळेच मग साहित्य व नाट्य अशी दोन वेगवेगळी संमेलने घ्यावी लागतात. त्यामुळे खर्चदेखील दुप्पट होतो. एकत्र संमेलन घेतले असते तर वंचितांना उरलेल्या निधीतून मदत करता आली असती, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनियोजित नाट्य संमेलनाध्यक्षांचा सवाल : मराठी साहित्यात नाटकांना स्थान नसल्याची खंत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी मराठी भाषेच्या साहित्यिकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मराठीसाहित्यात नाटकांना स्थान देण्यात येत नाही. त्यामुळेच मग साहित्य व नाट्य अशी दोन वेगवेगळी संमेलने घ्यावी लागतात. त्यामुळे खर्चदेखील दुप्पट होतो. एकत्र संमेलन घेतले असते तर वंचितांना उरलेल्या निधीतून मदत करता आली असती, असे मत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाच्या हीरक महोत्सवाच्या समापन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. विद्यापीठाच्या ग्रामगीता भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख सतीश बडवे उपस्थित होते. मंचावर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे, प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी व डॉ.प्रमोद मुनघाटे हेदेखील उपस्थित होते. मराठी साहित्यात नाटकांना स्थान का देण्यात येत नाही, असा सवाल उपस्थित करत त्यांनी मराठी भाषेला हे दिवस आपल्याच लोकांनी आणले असे ते म्हणाले. मराठी साहित्य व्यक्ती व्यक्तीचा संघर्ष रंगविण्यातच अडकले आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोडा पण देशस्तरावरदेखील मराठी साहित्य जात नाही. चर्चासत्रातच मराठी भाषेच्या विकासाच्या दिशा अडकून पडतात. आपण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार याची प्रतीक्षा करत आहोत. मात्र यासाठी दिल्लीच्या मान्यतेची आवश्यकता का, आपण अभिजात मराठी भाषा दिन सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रेमानंद गज्वी यांनी केले.विद्यापीठ हे ज्ञानाची केंद्र आहे. येथील विभागात सद्यस्थितीत प्राध्यापकांवर कामाचा ताण आहे. विभागातील सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरली गेली पाहिजेत. राम गणेश गडकरी यांनी मराठी भाषेसाठी मौैलिक योगदान दिले. मात्र मराठी लोक त्यांनाच विसरले, असे मत सतीश बडवे यांनी व्यक्त केले. एखाद्या संस्थेचे वय वाढते तेव्हा ती संस्था बलशाली होते. मात्र मागील काही काळापासून शैक्षणिक संस्थांचे वय वाढत आहे व विविध अडचणींमुळे त्यांना वृद्धापकाळच येत आहे. ही स्थिती लवकरच बदलेल, असा विश्वास कुलगुरूंनी बोलून दाखविला.एलकुंचवारांचा उल्लेख का नाही ?यावेळी डॉ.अक्षयकुमार काळे यांनी प्रास्ताविकातून मराठी विभागाचा प्रवास मांडला. मात्र यात ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या नावाचा विसर पडल्याची बाब प्रेमानंद गज्वी यांनी बोलून दाखविली. मराठी साहित्याचा विचार करत असताना त्यात नाटकांनादेखील स्थान मिळण्याची आवश्यकता आहे. मात्र साहित्यिक स्वत:च्याच सोयीचा विचार करतात, असा चिमटा त्यांनी काढला. विदर्भात रंगभूमी आहे, मात्र नाटके करण्यासाठी बाहेरील नट येतात. विदर्भात श्रीराम लागू यांच्यासारखे नट का निर्माण होत नाही, असा सवालदेखील त्यांनी केला.महिलांना लुगडं नेसणे पुरुषांनी शिकविलेयावेळी गज्वी यांनी बालगंधर्वांबाबत बोलत असताना महिलांना लुगडं नेसणे पुरुषांनी शिकविले असल्याचे वक्तव्य केले. महिलांनी स्वत:चे संवर्धन करायला हवे होते. ते न झाल्याने पुरुषांना पुढाकार घ्यावा लागला. मराठी साहित्यात सौंदर्यदृष्टी आहे. मात्र त्यांची चर्चा होत नाही हे दुर्दैव आहे, असेदेखील ते म्हणाले. येत्या काळात रंगमंचावर नाटके होणार नाहीत. तर तंत्रज्ञानातील बदलामुळे घरी बसूनच नाटके पाहता येतील, असा अंदाजदेखील त्यांनी व्यक्त केला.काळेंची विद्यापीठातील प्राध्यापकांच्या दर्जावर शंकाडॉ.अक्षयकुमार काळे यांनी नागपूर विद्यापीठातील प्राध्यापकांच्या दर्जावर शंका उपस्थित करणारे वक्तव्य केले. प्राध्यापक अक्षरश: पोस्टात पत्र टाकावे त्याप्रमाणे ‘रिसर्च पेपर’ प्रकाशित करण्यासाठी पाठवितात. प्राध्यापकांना ऐकण्यासाठी वर्गांत विद्यार्थी येत नाही. अगोदरच्या काळी दर्जेदार प्राध्यापक होते. आता तर विभागातून एकदा गेलेला प्रमुख परत येऊ नये यासाठी प्रयत्न होतो, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य