शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी कोणते उपाय करताय? उच्च न्यायालयाची परखड विचारणा

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: September 14, 2022 11:11 IST

आरोग्य संचालकांकडे मागितले उत्तर

नागपूर : राज्यातील आदिवासी भागांमधील बालके कुपोषणामुळे दगावत आहेत. कुपोषित बालकांची संख्या सतत वाढत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने नमूद करून बालकांचे कुपोषणामुळे होणारे मृत्यू थांबविण्यासाठी राज्य सरकार कोणत्या उपाययोजना करीत आहे, अशी परखड विचारणा आरोग्य संचालकांना केली आणि यावर येत्या २३ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, वरिष्ठ ॲड. जुगलकिशोर गिल्डा यांनी जनहित याचिकाकर्ते डॉ. राजेंद्र बर्मा व डॉ. रवींद्र कोल्हे यांचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करून अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व धारणी या आदिवासी क्षेत्रामधील बालके आताही कुपोषणामुळे दगावत असल्याची माहिती दिली. या क्षेत्रामध्ये सध्या ४०० बालके कुपोषित आहेत. त्यांपैकी १५० बालकांची प्रकृती गंभीर आहे. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास त्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. सध्या मुसळधार पावसामुळे या क्षेत्रातील नागरिक आरोग्य सुविधेपासून वंचित आहेत, याकडेही ॲड. गिल्डा यांनी लक्ष वेधले. उच्च न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन सदर आदेश दिला. याशिवाय, आरोग्य संचालकांनी न्यायालयाच्या रेकॉर्डवरील विविध नवीन अहवाल लक्षात घेता यावर सर्वसमावेशक अहवाल सादर करावा, असे निर्देशही दिले.

दूषित पाण्यामुळे १२ व्यक्तींचा मृत्यू

गेल्या काही दिवसांत मेळघाट व धारणी भागात दूषित पाण्यामुळे १२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या भागातील ४६ गावांना मध्य प्रदेश कंपनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. या कंपनीला विजेचे बिल अदा करण्यात आले नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. नागरिकांना नाइलाजास्तव दूषित पाणी प्यावे लागत आहे. राज्याच्या महावितरण कंपनीने या भागात वीजपुरवठ्याची व्यवस्था केली नाही, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.

नंदुरबार जिल्हाधिकारी, हाजीर हो!

उच्च न्यायालयाने १७ ऑगस्ट २०२२ रोजी आदेश दिल्यानंतरही नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील कुपोषित बालके, कुपोषण थांबविण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना, इत्यादींविषयी अहवाल सादर केला नाही. त्यामुळे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी २३ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता न्यायालयामध्ये व्यक्तिश: हजर होऊन यावर स्पष्टीकरण सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. कोअर कमिटीचे सदस्य बंडू साने व लतिका राजपूर यांनी माता व बालकांच्या आरोग्याचा मूल्यांकन अहवाल न्यायालयात सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावरही भूमिका स्पष्ट करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले.

कुपोषण मृत्यू अद्याप शून्यावर आले नाहीत

मे २००६ मध्ये उच्च न्यायालयाने बालकांचे कुपोषणामुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. त्यासाठी सरकारला पाच वर्षांची मुदत देण्यात आली होती. परंतु, परिस्थितीत अद्याप समाधानकारक सुधारणा झाली नाही. १९९२-९३ मध्ये मेळघाट व धारणी येथे तब्बल एक हजार बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकारnandurbar-acनंदुरबार