शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी कोणते उपाय करताय? उच्च न्यायालयाची परखड विचारणा

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: September 14, 2022 11:11 IST

आरोग्य संचालकांकडे मागितले उत्तर

नागपूर : राज्यातील आदिवासी भागांमधील बालके कुपोषणामुळे दगावत आहेत. कुपोषित बालकांची संख्या सतत वाढत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने नमूद करून बालकांचे कुपोषणामुळे होणारे मृत्यू थांबविण्यासाठी राज्य सरकार कोणत्या उपाययोजना करीत आहे, अशी परखड विचारणा आरोग्य संचालकांना केली आणि यावर येत्या २३ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, वरिष्ठ ॲड. जुगलकिशोर गिल्डा यांनी जनहित याचिकाकर्ते डॉ. राजेंद्र बर्मा व डॉ. रवींद्र कोल्हे यांचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करून अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व धारणी या आदिवासी क्षेत्रामधील बालके आताही कुपोषणामुळे दगावत असल्याची माहिती दिली. या क्षेत्रामध्ये सध्या ४०० बालके कुपोषित आहेत. त्यांपैकी १५० बालकांची प्रकृती गंभीर आहे. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास त्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. सध्या मुसळधार पावसामुळे या क्षेत्रातील नागरिक आरोग्य सुविधेपासून वंचित आहेत, याकडेही ॲड. गिल्डा यांनी लक्ष वेधले. उच्च न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन सदर आदेश दिला. याशिवाय, आरोग्य संचालकांनी न्यायालयाच्या रेकॉर्डवरील विविध नवीन अहवाल लक्षात घेता यावर सर्वसमावेशक अहवाल सादर करावा, असे निर्देशही दिले.

दूषित पाण्यामुळे १२ व्यक्तींचा मृत्यू

गेल्या काही दिवसांत मेळघाट व धारणी भागात दूषित पाण्यामुळे १२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या भागातील ४६ गावांना मध्य प्रदेश कंपनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. या कंपनीला विजेचे बिल अदा करण्यात आले नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. नागरिकांना नाइलाजास्तव दूषित पाणी प्यावे लागत आहे. राज्याच्या महावितरण कंपनीने या भागात वीजपुरवठ्याची व्यवस्था केली नाही, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.

नंदुरबार जिल्हाधिकारी, हाजीर हो!

उच्च न्यायालयाने १७ ऑगस्ट २०२२ रोजी आदेश दिल्यानंतरही नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील कुपोषित बालके, कुपोषण थांबविण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना, इत्यादींविषयी अहवाल सादर केला नाही. त्यामुळे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी २३ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता न्यायालयामध्ये व्यक्तिश: हजर होऊन यावर स्पष्टीकरण सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. कोअर कमिटीचे सदस्य बंडू साने व लतिका राजपूर यांनी माता व बालकांच्या आरोग्याचा मूल्यांकन अहवाल न्यायालयात सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावरही भूमिका स्पष्ट करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले.

कुपोषण मृत्यू अद्याप शून्यावर आले नाहीत

मे २००६ मध्ये उच्च न्यायालयाने बालकांचे कुपोषणामुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. त्यासाठी सरकारला पाच वर्षांची मुदत देण्यात आली होती. परंतु, परिस्थितीत अद्याप समाधानकारक सुधारणा झाली नाही. १९९२-९३ मध्ये मेळघाट व धारणी येथे तब्बल एक हजार बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकारnandurbar-acनंदुरबार