शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी कोणते उपाय करताय? उच्च न्यायालयाची परखड विचारणा

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: September 14, 2022 11:11 IST

आरोग्य संचालकांकडे मागितले उत्तर

नागपूर : राज्यातील आदिवासी भागांमधील बालके कुपोषणामुळे दगावत आहेत. कुपोषित बालकांची संख्या सतत वाढत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने नमूद करून बालकांचे कुपोषणामुळे होणारे मृत्यू थांबविण्यासाठी राज्य सरकार कोणत्या उपाययोजना करीत आहे, अशी परखड विचारणा आरोग्य संचालकांना केली आणि यावर येत्या २३ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, वरिष्ठ ॲड. जुगलकिशोर गिल्डा यांनी जनहित याचिकाकर्ते डॉ. राजेंद्र बर्मा व डॉ. रवींद्र कोल्हे यांचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करून अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व धारणी या आदिवासी क्षेत्रामधील बालके आताही कुपोषणामुळे दगावत असल्याची माहिती दिली. या क्षेत्रामध्ये सध्या ४०० बालके कुपोषित आहेत. त्यांपैकी १५० बालकांची प्रकृती गंभीर आहे. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास त्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. सध्या मुसळधार पावसामुळे या क्षेत्रातील नागरिक आरोग्य सुविधेपासून वंचित आहेत, याकडेही ॲड. गिल्डा यांनी लक्ष वेधले. उच्च न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन सदर आदेश दिला. याशिवाय, आरोग्य संचालकांनी न्यायालयाच्या रेकॉर्डवरील विविध नवीन अहवाल लक्षात घेता यावर सर्वसमावेशक अहवाल सादर करावा, असे निर्देशही दिले.

दूषित पाण्यामुळे १२ व्यक्तींचा मृत्यू

गेल्या काही दिवसांत मेळघाट व धारणी भागात दूषित पाण्यामुळे १२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या भागातील ४६ गावांना मध्य प्रदेश कंपनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. या कंपनीला विजेचे बिल अदा करण्यात आले नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. नागरिकांना नाइलाजास्तव दूषित पाणी प्यावे लागत आहे. राज्याच्या महावितरण कंपनीने या भागात वीजपुरवठ्याची व्यवस्था केली नाही, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.

नंदुरबार जिल्हाधिकारी, हाजीर हो!

उच्च न्यायालयाने १७ ऑगस्ट २०२२ रोजी आदेश दिल्यानंतरही नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील कुपोषित बालके, कुपोषण थांबविण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना, इत्यादींविषयी अहवाल सादर केला नाही. त्यामुळे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी २३ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता न्यायालयामध्ये व्यक्तिश: हजर होऊन यावर स्पष्टीकरण सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. कोअर कमिटीचे सदस्य बंडू साने व लतिका राजपूर यांनी माता व बालकांच्या आरोग्याचा मूल्यांकन अहवाल न्यायालयात सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावरही भूमिका स्पष्ट करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले.

कुपोषण मृत्यू अद्याप शून्यावर आले नाहीत

मे २००६ मध्ये उच्च न्यायालयाने बालकांचे कुपोषणामुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. त्यासाठी सरकारला पाच वर्षांची मुदत देण्यात आली होती. परंतु, परिस्थितीत अद्याप समाधानकारक सुधारणा झाली नाही. १९९२-९३ मध्ये मेळघाट व धारणी येथे तब्बल एक हजार बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकारnandurbar-acनंदुरबार