शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्या थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
5
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
6
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
8
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
9
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
10
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
11
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
12
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
13
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
14
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
15
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
16
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
17
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
18
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
19
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
20
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण

मंत्री नसलेले सरकार विदर्भाला काय न्याय देणार? विदर्भ राज्य आंदोलन समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 22:58 IST

ज्या सरकारमध्ये मंत्रीच नाहीत, मुख्यमंत्र्यांकडे कोणतेच खाते नाही, ते सरकार विदर्भाला काय न्याय देणार, असा परखड प्रश्न विदर्भ राज्य आंदोलन समितीने उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देसहा दिवसासाठी सरकार विदर्भात येतेच कशाला?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाला बळजबरीने महाराष्ट्रात सामील करण्यासाठी २८ सप्टेंबर १९५३ साली नागपूर करार करण्यात आला. या करारानुसार विदर्भातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नागपुरात पाच आठवड्याचे अधिवेशन घेण्याचा करार करण्यात आला होता. त्यातून विदर्भातील जनतेचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा होती. मात्र ज्या सरकारमध्ये मंत्रीच नाहीत, मुख्यमंत्र्यांकडे कोणतेच खाते नाही, ते सरकार विदर्भाला काय न्याय देणार, असा परखड प्रश्न विदर्भ राज्य आंदोलन समितीने उपस्थित केला आहे.नागपुरातील अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ राज्य आंदोलन समितीने सहा दिवसासाठी विदर्भात येताच कशाला, असा प्रश्न पत्रकातून उपस्थित करून सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. विदर्भातील तरुणांना २३ टक्के नोकऱ्या, उच्चपदाच्या नोकरीमध्येसुद्धा २३ टक्के विदर्भाचा वाटा, महाराष्ट्राच्या तिजोरीमधील २३ टक्के वाटा विदर्भाच्या विकासावर खर्च, विदर्भात नागपूरला पाच आठवड्याचे अधिवेशन, महाराष्ट्र राज्यातील सर्व संचालकांचे मुख्य कार्यालये नागपूरला आणणे आदी अनेक आश्वासनांचा समावेश या करारात होता. परंतु यापैकी एकही आश्वासन महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत पूर्ण केले नाही. हा वैदर्भीय जनतेचा विश्वासघातच आहे. हा करार पाळण्यातच न आल्याने या कराराला काहीच अर्थ उरला नाही.महाराष्ट्र सरकारकडूनच या कराराचा भंग होत असल्याने महाराष्ट्रात राहायचेच कशाला, त्यापेक्षा हक्काचा वेगळा विदर्भ द्या, अशी मागणी या पत्रकातून करण्यात आली आहे.नागपूरला अधिवेशनासाठी येऊन जनतेचे १५-२० कोटी रुपये उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार आहे. यंदाच्या सहा दिवसाच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराचे तास नाहीत. त्यामुळे कोणतेही फलित निघणार नाही. सरकारचे अजून मंत्रिमंडळ पूर्ण झाले नाही, खातेवाटप होऊ शकले नाही, हे सरकार विदर्भाचे व शेतकऱ्यांचे काय भले करणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज मुक्तीची मागणी करणाऱ्या या मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफी करावी, अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही या पत्रकातून मुख्य संयोजन राम नेवले यांनी केली आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन