शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मानधनात वाढ देता की जाता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:19 IST

महाराष्ट्रात महिला व बालविकास विभागाच्यावतीने एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाडी सेविकांना पाच हजार आणि मदतनिसांना २,५०० मानधन देण्यात येते.

ठळक मुद्देअंगणवाडी सेविकांचा सरकारला सवाल : शासनाच्या पत्राची होळी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात महिला व बालविकास विभागाच्यावतीने एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाडी सेविकांना पाच हजार आणि मदतनिसांना २,५०० मानधन देण्यात येते. या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र अंगणवाडी कृती समितीने ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपात सहभागी होणाºया अंगणवाडी कर्मचाºयांवर शासनाने शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्र दिले असून, या पत्राची संविधान चौकात अंगणवाडी सेविकांनी होळी केली. सरकारने माधनधनात वाढ करावी अन्यथा खर्ची रिकामी करावी असा इशारा अंगणवाडी कर्मचाºयांनी यावेळी दिला.अंगणवाडी कर्मचाºयांना तेलंगणा, दिल्ली, केरळमध्ये १० हजार मानधन देण्यात येते. परंतु महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाºयांना तुटपुंजे मानधन देण्यात येत असल्यामुळे सातत्याने मोर्चे काढल्यानंतर शासनाने महिला व बालविकास विभागाच्या अध्यक्षतेखाली २० आॅगस्ट २०१६ रोजी मानधनवाढ समिती गठित केली. समितीने अंगणवाडी कर्मचाºयांना मानधनात दुपटीने वाढ करण्याची शिफारस केली, परंतु तरीसुद्धा शासन मानधनात वाढ करण्यास टाळाटाळ करीत आहे. याशिवाय अंगणवाडी कर्मचाºयांचे मानधन चार महिने न देणे, मिळणारा अपुरा निधी वाढवून देण्यास टाळाटाळ करणे यामुळे काम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे संतप्त अंगणवाडी कर्मचाºयांनी ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.संपात सहभागी होणाºया अंगणवाडी कर्मचाºयांना शासनाने शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. या पत्राची अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने संविधान चौकात होळी करून निषेध केला आहे. यावेळी आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे, सीटूचे जिल्हाध्यक्ष मधुकर भरणे, सल्लागार प्रमिला मर्दाने, रेखा कोहाळ, वनिता कापसे, अमिता गजभिये, चंदा मेंढे, रजनी सूर्यवंशी, प्रमिला नाईक, चंद्रशेखर शुक्ला, रूपचंद्र गद्रे, शीला जगताप यांच्यासह शेकडो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.