शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी मनपाने १८ वर्षात काय केले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 21:49 IST

Water resources regulatory authority, nagpur news पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी मनपाने गेल्या १८ वर्षात काय केले, असा संतापजनक सवाल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केला.

ठळक मुद्देजलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचा मनपाला सवालयाचिकेवर सुनावणी, कालबद्ध कार्यक्रम आखण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पेंच प्रकल्पातून १९९५ मध्ये ११२ दलघमी पाणी महानगरपालिकेला देण्यात आले. लोकसंख्या वाढल्यावर २००२ मध्ये अटी-शर्तींवर पुन्हा ७८ दलघमी पाणी देण्यात आले. या १८ वर्षाच्या काळात महानगरपालिकेचे पाणीपुरवठ्यासाठी स्वत:चे स्रोत निर्माण करावे असे ठरले होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी मनपाने गेल्या १८ वर्षात काय केले, असा संतापजनक सवाल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केला. त्यावर अमृत योजना, सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटचे काम सुरू असल्याचे सांगृून मनपाच्या प्रतिनिधींनी वेळ मारून नेली.

ॲड. आशिष जयस्वाल यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी नागपुरातील सिंचन सेवा भवन महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणापुढे सुनावणी झाली. प्राधिकरणाचे विधी सदस्य रामनाथ तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला प्राधिकरणाचे सेक्रेटरी रामनाथ सोनवणे, तांत्रिक सदस्य एस. डी. कुलकर्णी, प्राधिकरणाचे अर्थ सदस्य डॉ. एस टी सांगळे आणि सदस्य ॲड. शकुंतला वाडेकर ऑनलाईन उपस्थित होते. तर मनपाच्या वतीने पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नागपूर प्रशासक जयंत गवळी, पेंच प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रवीण झोड, उपजिल्हाधिकारी गंधे आणि याचिकाककर्तेे आमदार आशिष जयस्वाल उपस्थित होते.

पेंच प्रकल्पातून घेतल्या जाणाऱ्या पाण्यावर नागपूर शहरातील लोकसंख्येला १८ वर्षापासून पाणीपुरवठा होत आहे. पेंच प्रकल्पातील उपलब्ध पाण्यावर १५ टक्के पेयजल, १० टक्के औद्योगिक वापर आणि ७५ टक्के सिंचनाच्या वापरासाठी हक्क आहे. मात्र १९९५ मध्ये मनपासाठी अटी-शर्तींवर अधीन राहून तात्पुरते पाण्याचे आरक्षण करण्यात आले. पाण्याचे वाढीव आरक्षण देताना ८,४५४ हेक्टर सिंचन कपात करण्यात आली होती. हे करताना मनपाने स्वत:चे स्रोत निर्माण करायचे होते. कन्हानमध्ये रोहणाचे पाणी लिफ्ट करून वाढीव पाईपलाईनमधून ३ टीसीएम पाणी घ्यायचे ठरले होते. कन्हान-कोलारवर बॅरेज बांधायचे होते. पाणीगळती थांबविण्यासाठी पाईपलाईन बदलणे, चोरी थांबविण्यासाठी उपाययोजना करायच्या होत्या. ट्रीटमेंट वॅाटर प्लांट निर्माण करायचे होते. या काळात झालेल्या कामाचा आढावा प्राधिकरणाने सुनावणीदरम्यान घेतला. परंतु काहीच झाले नसल्याचे निदर्शनास आल्यावर नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :WaterपाणीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका