शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अमरावती-शेलाड रोडचा विकास कशामुळे लांबला? हायकोर्टाची महामार्ग प्राधिकरणला विचारणा

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: October 5, 2023 17:36 IST

यापूर्वी हे काम गेल्या ७ जुलैपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली होती

नागपूर : अमरावती ते शेलाड रोडचा विकास कशामुळे लांबला, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला केली व यावर येत्या १९ ऑक्टोबरपर्यंत विस्तृत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.

यासंदर्भात ॲड. अरुण पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय पृथ्वीराज चव्हाण व उर्मिला जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, महामार्ग प्राधिकरणने प्रतिज्ञापत्र दाखल करून अमरावती ते कुरणखेड टप्प्याचे ८९ टक्के तर, कुरणखेड ते शेलाड टप्प्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाल्याचे व उर्वरित काम येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल, असे सांगितले.

यापूर्वी हे काम गेल्या ७ जुलैपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली होती. करिता, न्यायालयाने हे निर्देश दिले. नागपूर ते अमरावती आणि अमरावती-चिखली महामार्गावरील शेलाड ते चिखलीपर्यंतच्या टप्प्याचे विकास काम पूर्ण झाले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. फिरदौस मिर्झा तर, प्राधिकरणतर्फे ॲड. अनीश कठाणे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयroad transportरस्ते वाहतूकHigh Courtउच्च न्यायालय