शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी काय केले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:11 IST

नागपूर : दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण व मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देण्यासाठी आतापर्यंत कोणकोणत्या उपाययोजना केल्या, अशी विचारणा ...

नागपूर : दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण व मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देण्यासाठी आतापर्यंत कोणकोणत्या उपाययोजना केल्या, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केंद्र व राज्य सरकारला केली, तसेच यावर येत्या तीन आठवड्यात सविस्तर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

केंद्र व राज्य सरकारला या मुदतीमध्ये उत्तर सादर करण्यात अपयश आल्यास केंद्रीय कॅबिनेट सचिव, राज्याचे मुख्य सचिव, ऊर्जा विभागाचे सचिव व आदिवासी विकास विभागाचे सचिव यांनी न्यायालयामध्ये व्यक्तिश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करावे. स्पष्टीकरण असमाधानकारक आढळून आल्यास सरकारवर आवश्यक दावाखर्च बसवला जाईल, अशी तंबीही न्यायालयाने दिली. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, प्रकरणातील न्यायालय मित्र ॲड. फिरदोस मिर्झा यांनी शिक्षण हक्क कायदा व अन्न सुरक्षा कायद्यातील विविध तरतुदी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत केंद्र व राज्य सरकार जबाबदाऱ्यांना न्याय देण्यात अपयशी ठरले आहे, असा दावा केला. न्यायालयाला त्यात प्रथमदृष्ट्या तथ्य आढळून आल्यामुळे हा आदेश देण्यात आला. गडचिरोली येथील १० शालेय विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण व मध्यान्ह भोजन उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली होती. त्यावरून न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

-----------------

सरकारला कडक शब्दांत फटकारले

कोरोना संक्रमणामुळे शाळांमधील प्रत्यक्ष शिक्षण बंद आहे. सध्या शाळांद्वारे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत. इतर शालेय उपक्रमही ऑनलाईन राबविले जात आहेत. परंतु, दुर्गम भागात स्मार्टफोन, इंटरनेट व २४ तास वीज उपलब्ध नसल्यामुळे या भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. याशिवाय अनेक गावांमध्ये शाळेपर्यंत जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. शाळांमध्ये आवश्यक शिक्षक व कर्मचारी नाहीत. सध्या विद्यार्थी शाळेत जात नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत मध्यान्ह भोजन किंवा त्याऐवजी पैसे पोहचविण्यासाठी उपाययोजनाही करण्यात आल्या नाहीत. उच्च न्यायालयाने हे चित्र अतिशय गंभीर असल्याचे नमूद करून केंद्र व राज्य सरकारला कडक शब्दांत फटकारले.