शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

फेलोशीपच्या ‘हायपॉवर कमिटी’चे काय झाले? पीएच.डी. पात्रताधारकांचा सवाल 

By निशांत वानखेडे | Updated: March 10, 2024 18:45 IST

दाेन महिन्यानंतरही कमिटीकडून काेणताच अहवाल न आल्याने कमिटीचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नागपूर: बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी. फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या घटनेला आता दाेन महिन्याचा कालावधी लोटला आहे. परीक्षा रद्द करून याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने हायपाॅवर कमिटी स्थापन केली हाेती. मात्र दाेन महिन्यानंतरही कमिटीकडून काेणताच अहवाल न आल्याने कमिटीचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

फेलाेशीपसाठी एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांचे रणकंदन अजुनही सुरुच आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर यासाठी तिन्ही संघटनेच्या विद्यार्थ्यांकडून आंदाेलन चालले आहे. मात्र सरकारकडून याबाबत काहीच हालचाली हाेत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड राेष तयार हाेत आहे. फेलाेशीप पात्रतेसाठी १० जानेवारी २०२४ राेजी परीक्षा घेण्यात आली हाेती. राज्यातील ४ केंद्रांपैकी नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षा केंद्रांवर महाज्योती पीएचडी फेलोशिप परीक्षेचा पेपर पुन्हा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या चार सेट पैकी २ सेट हे लीक असून ते झेरॉक्स कॉपी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. ए आणि बी सेट हे सीलबंद हाेते, तर उर्वरित सी आणि डी हे लीक हाेते. शिवाय त्यांना स्टेपलर केलेल्या पिन आढळून आल्या. त्यामुळे पेपरफुटीवर आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला.

विशेष म्हणजे महाज्याेतीने यापूर्वी निर्धारीत केलेली परीक्षासुद्धा रद्द करण्यात आली हाेती. अशा प्रकारामुळे महाज्याेतीच्या भाेंगळ कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये तीव्र राेष पसरला आहे. धक्कादायक म्हणजे बार्टीचे पीएचडी पात्रताधारक २०२२ पासून आणि सारथी व महाज्याेतीचे पात्रताधारक २०२३ पासून फेलाेशीप मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत. सरकारने हायपाॅवर कमिटी स्थापन केली पण दाेन महिने लाेटूनही या कमिटीचा अहवाल आला नाही की सरकारकडून कुठला निर्णय हाेत नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत सरकारकडून काहीच हालचाली हाेत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

अशात लवकरच लाेकसभेच्या व त्यानंतर राज्याच्या निवडणुका ताेंडावर येऊ घातल्या आहेत. लाेकसभेच्या निवडणुकीसाठी आचार संहिता लागली की या विषयावर पुन्हा तीन महिने कुठलाही निर्णय हाेण्याची शक्यता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता अधिकच वाढत चालली आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाहीविद्यार्थ्यांसोबत खेळ खेळला जात आहे. शासन जर वारंवार अशा चुका करीत असून ते किती गंभीर आहेत हे लक्षात येतं. शासनाने पात्रता परीक्षेचा ससेमिरा थांबवून सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, अशी आग्रही मागणी आता विद्यार्थ्यांच्या वतीने केली जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूर