शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

फेलोशीपच्या ‘हायपॉवर कमिटी’चे काय झाले? पीएच.डी. पात्रताधारकांचा सवाल 

By निशांत वानखेडे | Updated: March 10, 2024 18:45 IST

दाेन महिन्यानंतरही कमिटीकडून काेणताच अहवाल न आल्याने कमिटीचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नागपूर: बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी. फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या घटनेला आता दाेन महिन्याचा कालावधी लोटला आहे. परीक्षा रद्द करून याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने हायपाॅवर कमिटी स्थापन केली हाेती. मात्र दाेन महिन्यानंतरही कमिटीकडून काेणताच अहवाल न आल्याने कमिटीचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

फेलाेशीपसाठी एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांचे रणकंदन अजुनही सुरुच आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर यासाठी तिन्ही संघटनेच्या विद्यार्थ्यांकडून आंदाेलन चालले आहे. मात्र सरकारकडून याबाबत काहीच हालचाली हाेत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड राेष तयार हाेत आहे. फेलाेशीप पात्रतेसाठी १० जानेवारी २०२४ राेजी परीक्षा घेण्यात आली हाेती. राज्यातील ४ केंद्रांपैकी नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षा केंद्रांवर महाज्योती पीएचडी फेलोशिप परीक्षेचा पेपर पुन्हा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या चार सेट पैकी २ सेट हे लीक असून ते झेरॉक्स कॉपी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. ए आणि बी सेट हे सीलबंद हाेते, तर उर्वरित सी आणि डी हे लीक हाेते. शिवाय त्यांना स्टेपलर केलेल्या पिन आढळून आल्या. त्यामुळे पेपरफुटीवर आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला.

विशेष म्हणजे महाज्याेतीने यापूर्वी निर्धारीत केलेली परीक्षासुद्धा रद्द करण्यात आली हाेती. अशा प्रकारामुळे महाज्याेतीच्या भाेंगळ कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये तीव्र राेष पसरला आहे. धक्कादायक म्हणजे बार्टीचे पीएचडी पात्रताधारक २०२२ पासून आणि सारथी व महाज्याेतीचे पात्रताधारक २०२३ पासून फेलाेशीप मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत. सरकारने हायपाॅवर कमिटी स्थापन केली पण दाेन महिने लाेटूनही या कमिटीचा अहवाल आला नाही की सरकारकडून कुठला निर्णय हाेत नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत सरकारकडून काहीच हालचाली हाेत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

अशात लवकरच लाेकसभेच्या व त्यानंतर राज्याच्या निवडणुका ताेंडावर येऊ घातल्या आहेत. लाेकसभेच्या निवडणुकीसाठी आचार संहिता लागली की या विषयावर पुन्हा तीन महिने कुठलाही निर्णय हाेण्याची शक्यता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता अधिकच वाढत चालली आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाहीविद्यार्थ्यांसोबत खेळ खेळला जात आहे. शासन जर वारंवार अशा चुका करीत असून ते किती गंभीर आहेत हे लक्षात येतं. शासनाने पात्रता परीक्षेचा ससेमिरा थांबवून सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, अशी आग्रही मागणी आता विद्यार्थ्यांच्या वतीने केली जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूर