शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

काय रे पोरा, होईल का शक्य... होय बाबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 10:34 IST

आरामखुर्चीवर बसून बाबानी पहिलाच प्रश्न केला,‘काय रे पोरा, दीक्षा समारंभासाठी १४ ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे. समारंभाची व्यवस्था होईल का शक्य?’... माझ्या मुखातून एकच शब्द निघाला,‘होय बाबा...’

आनंद डेकाटे/निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मदीक्षेचा सोहळा निश्चित झाला होता आणि रेवाराम कवाडे व वामनराव गोडबोले यांनी याबाबत चर्चेसाठी बाबांच्या सांगण्यावरून मला बोलावून घेतले होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी अतिशय उत्साहात मी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेबांच्या २४, अलीपूर रोडवरील निवासस्थानी पोहचतो. काही वेळातच एका हातात काठी व नानकचंद रत्तू यांचा आधार घेत बाबासाहेब बाहेर आले. पहिलीच भेट आणि त्यांचे ते धीरोदात्त रूप पाहून मी भारावून गेलो होतो. आरामखुर्चीवर बसून त्यांनी पहिलाच प्रश्न केला,‘काय रे पोरा, दीक्षा समारंभासाठी १४ ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे. समारंभाची व्यवस्था होईल का शक्य?’... माझ्या मुखातून एकच शब्द निघाला,‘होय बाबा...’जेमतेम २८ वर्षे वय असलेले सदानंद फुलझेले त्यावेळी नागपूर महापालिकेचे उपमहापौर होते आणि साहजिकच समाजाचा एक तरुण नेता म्हणून या धम्मदीक्षा सोहळ्याच्या व्यवस्थेची जबाबदारी त्यांच्याकडे आली होती. यासंदर्भाने महामानवाशी झालेली ही पहिलीच भेट आणि या भेटीचा शब्द न् शब्द फुलझेले यांच्या हृदयावर कोरला गेला. यापूर्वी त्यांनी बाबासाहेबांना दुरून पाहिले होते व यानंतरही अनेक भेटी झाल्या; पण या पहिल्याच भेटीतील बाबासाहेबांचे हेच शब्द त्यांच्या आयुष्यासाठी दिशादर्शक ठरले. हजारो वर्षांच्या शोषित पीडित समाजाचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ साली धर्मांतराची घोषणा केली आणि त्यानंतर २१ वर्षे विविध धर्मांचा अभ्यास करून १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतात. या रक्तविहीन ऐतिहासिक धम्मक्रांतीचा महामेरू होणे, ही संधी नव्हे तर आयुष्याचे भाग्यच होते आणि ते तरुण सदानंद फुलझेले यांच्याकडे चालून आले होते. आज बजाजनगरच्या परिसरात धम्मदीक्षेच्या आठवणींचे जगविख्यात स्मारक उभे आहे आणि ते उभारणाऱ्यांमध्ये बाबासाहेबांच्या अनेक प्रेरणादूतांपैकी सदानंद फुलझेले यांचाही सिंहाचा वाटा आहे. सोहळ्याची तारीख निश्चित झाली असली तरी त्यासाठी जागा शोधणे व कार्यक्रमाचे नियोजन करणे हे मोठे यज्ञ होते. अखिल भारतीय बौद्ध महासभेचे नागपूर शाखेचे अध्यक्ष पं. रेवाराम कवाडे व सचिव वामनराव गोडबोले यांच्यासोबत फुलझेले यांनी ही जबाबदारी खांद्यावर घेतली होती. त्यावेळी माताकचेरीजवळ बजाजनगरातील हीच जागा धम्मदीक्षा सोहळ्यासाठी शोधण्यात आली. बाबासाहेबांनी इतर सहकाऱ्यांशी शहानिशा केल्यानंतर याच जागेला पसंती दिली होती. यानंतर प्रत्यक्ष सोहळा, धम्मदीक्षेसाठीचे व्यासपीठ आणि लाखो लोकांच्या बसण्याची व्यवस्था शहराचे उपमहापौर म्हणून सदानंद फुलझेले यांनी अगदी नेटाने पार पाडली. अनेक अडचणींचा सामना करीत, वेगवेगळ्या प्रकारची तयारी करीत हा ऐतिहासिक सोहळा भव्य रूपात पार पडला, यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. दोनच महिन्यात डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले होते. त्यानंतर या प्रेरणादूतांनी बाबासाहेबांच्या विचारांचे भव्य असे स्मारक धम्मदीक्षेच्या जागेवर उभारण्याचा निर्धार केला.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी