शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

-तर शासनाच्या मदतीने होणाऱ्या संमेलनाचा फायदा काय? संमेलनाध्यक्ष किशोर सानप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 01:52 IST

साहित्य संमेलने मुळात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केली जातात. त्यासाठी शासनाकडून मदतही केली होती. पण शासनाचा पैसा संमेलनाच्या आयोजनावर व लेखकाच्या मानधनावर खर्च होत असेल तर अशा संमेलनाचा फायदा काय, असा सवाल राज्यस्तरीय संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. किशोर सानप यांनी केला. यवतमाळात होणाºया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावरून टीका होत असताना, डॉ. किशोर सानप यांनी साहित्याच्या व्यासपीठावरून पुन्हा फुंकर घातली आहे.

ठळक मुद्दे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहित्य संमेलने मुळात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केली जातात. त्यासाठी शासनाकडून मदतही केली होती. पण शासनाचा पैसा संमेलनाच्या आयोजनावर व लेखकाच्या मानधनावर खर्च होत असेल तर अशा संमेलनाचा फायदा काय, असा सवाल राज्यस्तरीय संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. किशोर सानप यांनी केला. यवतमाळात होणाºया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावरून टीका होत असताना, डॉ. किशोर सानप यांनी साहित्याच्या व्यासपीठावरून पुन्हा फुंकर घातली आहे.पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे दोन दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दीक्षाभूमीजवळील बी.आर.मुंडले शाळेच्या प्लॅटिनम सभागृहात करण्यात आले आहे. शनिवारी महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक व समीक्षक डॉ. किशोर सानप यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, निखिल मुंडले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विष्णू मनोहर, प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे, उपाध्यक्ष विजया ब्राह्मणकर आदी उपस्थित होते.यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना नंदा जिचकार म्हणाल्या की, समाजाचा समतोल राखण्याचे काम साहित्यात आहे. नवीन पिढीला साहित्याची गोडी लावणे गरजेचे आहे. कॉन्व्हेंट संस्कृतीवर माझा आक्षेप असून मुलांना प्राथमिक शिक्षण हे मराठीतूनच दिले पाहिजे, असे झाल्यास साहित्यबद्दल नव्या पिढीमध्ये गोडी निर्माण होईल. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. उपाध्याय म्हणाले की, साहित्यात माणसाचे मन वळविण्याची शक्ती आहे. जी गोष्ट काठीने होऊ शकत नाही, ती उपदेशाने झाल्याची अनुभूती मला कारागृहामध्ये काम करताना आली. जिथे साहित्याची चर्चा होते, तिथे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होते. साहित्यात दैवी ताकद आहे. माणसाचे टेन्शन घालविण्यास गोळीपेक्षा साहित्य जास्त असरदार आहे. कायदा आणि साहित्य हातात हात घालून चालल्यास समाज आणि मनाचे परिवर्तन होऊ शकते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना विष्णू मनोहर म्हणाले की, चांगले संगीत, नाटक, साहित्य आणि भोजन असेल तर कुठलाही सोहळा आनंददायी ठरतो. राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात हा योग आला आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनnagpurनागपूर