शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
3
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
4
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
5
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
6
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
7
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
9
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
10
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
11
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
12
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
13
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
14
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
15
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
16
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
17
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
18
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
19
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
20
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

-तर शासनाच्या मदतीने होणाऱ्या संमेलनाचा फायदा काय? संमेलनाध्यक्ष किशोर सानप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 01:52 IST

साहित्य संमेलने मुळात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केली जातात. त्यासाठी शासनाकडून मदतही केली होती. पण शासनाचा पैसा संमेलनाच्या आयोजनावर व लेखकाच्या मानधनावर खर्च होत असेल तर अशा संमेलनाचा फायदा काय, असा सवाल राज्यस्तरीय संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. किशोर सानप यांनी केला. यवतमाळात होणाºया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावरून टीका होत असताना, डॉ. किशोर सानप यांनी साहित्याच्या व्यासपीठावरून पुन्हा फुंकर घातली आहे.

ठळक मुद्दे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहित्य संमेलने मुळात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केली जातात. त्यासाठी शासनाकडून मदतही केली होती. पण शासनाचा पैसा संमेलनाच्या आयोजनावर व लेखकाच्या मानधनावर खर्च होत असेल तर अशा संमेलनाचा फायदा काय, असा सवाल राज्यस्तरीय संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. किशोर सानप यांनी केला. यवतमाळात होणाºया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावरून टीका होत असताना, डॉ. किशोर सानप यांनी साहित्याच्या व्यासपीठावरून पुन्हा फुंकर घातली आहे.पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे दोन दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दीक्षाभूमीजवळील बी.आर.मुंडले शाळेच्या प्लॅटिनम सभागृहात करण्यात आले आहे. शनिवारी महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक व समीक्षक डॉ. किशोर सानप यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, निखिल मुंडले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विष्णू मनोहर, प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे, उपाध्यक्ष विजया ब्राह्मणकर आदी उपस्थित होते.यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना नंदा जिचकार म्हणाल्या की, समाजाचा समतोल राखण्याचे काम साहित्यात आहे. नवीन पिढीला साहित्याची गोडी लावणे गरजेचे आहे. कॉन्व्हेंट संस्कृतीवर माझा आक्षेप असून मुलांना प्राथमिक शिक्षण हे मराठीतूनच दिले पाहिजे, असे झाल्यास साहित्यबद्दल नव्या पिढीमध्ये गोडी निर्माण होईल. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. उपाध्याय म्हणाले की, साहित्यात माणसाचे मन वळविण्याची शक्ती आहे. जी गोष्ट काठीने होऊ शकत नाही, ती उपदेशाने झाल्याची अनुभूती मला कारागृहामध्ये काम करताना आली. जिथे साहित्याची चर्चा होते, तिथे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होते. साहित्यात दैवी ताकद आहे. माणसाचे टेन्शन घालविण्यास गोळीपेक्षा साहित्य जास्त असरदार आहे. कायदा आणि साहित्य हातात हात घालून चालल्यास समाज आणि मनाचे परिवर्तन होऊ शकते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना विष्णू मनोहर म्हणाले की, चांगले संगीत, नाटक, साहित्य आणि भोजन असेल तर कुठलाही सोहळा आनंददायी ठरतो. राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात हा योग आला आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनnagpurनागपूर