शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

वूई वाँन्ट जस्टीस...

By admin | Updated: November 26, 2014 01:07 IST

काहीच चूक नसताना मुलांना भीतीच्या वातावरणात वावरण्याची पाळी आली आहे. आधी कुश नंतर युग असे किती बळी गेल्यानंतर शासन यावर कठोर उपाययोजना करणार आहे,

बालकांची मानवी शृंखला : पंतप्रधानांना पाठविले १.१० लाख पत्रनागपूर : काहीच चूक नसताना मुलांना भीतीच्या वातावरणात वावरण्याची पाळी आली आहे. आधी कुश नंतर युग असे किती बळी गेल्यानंतर शासन यावर कठोर उपाययोजना करणार आहे, असा प्रश्न उपस्थित करून उपराजधानीतील ५० शाळांमधील हजारो बालकांनी आज ‘वुई वॉंट जस्टीस’चा सूर काढून वर्धा मार्ग दणाणून टाकला.आठ वर्षाच्या युग चांडक याचे अपहरण करून त्याची क्रूरपणे हत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या घटनेच्या तीन वर्षापूर्वी कुश कटारिया या आठ वर्षाच्या बालकाचीही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे बालकांच्या होत असलेल्या हत्येबाबत त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी सेंटर पॉईंट ग्रुप आॅफ स्कूल्स आणि युग फाऊंडेशनच्यावतीने आज लोकमत चौक ते पंचशील चौकादरम्यान मानवी शृंखला तयार करण्यात आली. यानिमित्त ‘युग की पुकार’ या संकल्पनेवर ५० शाळांमधील विद्यार्थ्यांनी चित्र साकारले. आंदोलनात १८ वर्षाखालील मुलांवर होणाऱ्या दुष्कृत्यांसाठी एका विशेष न्यायालयाचे गठन करून आरोपींना १०० दिवसाच्या आत कठोर शिक्षा करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनात उपस्थित विद्यार्थ्यांनी ‘काय कृती कराल तुम्ही जेंव्हा युगच्या जागेवर असू आम्ही’, ‘परत नको वार एकदाच करा निर्धार’, ‘आधी कुश आता युग, काय होती दोघांची चूक’, ‘हर बेटाबेटी अपनी हे सुरक्षा इनकी करनी है’, ‘बचपन सुरक्षित होगा तो देश सुरक्षित होगा’ असे वाक्य लिहिलेले फलक हातात घेऊन लक्ष वेधले. यावेळी समीर मेघे, माजी मंत्री अनिस अहमद, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय पाटील, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, माजी आमदार यादवराव देवगडे यांनी आंदोलनात भेट दिली. यशस्वितेसाठी प्रकल्प समन्वयक संजय वलीवकर, अरुण देव उपाध्याय, मुक्ता चॅटर्जी, डॉ. मुकेश चांडक यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)युगच्या आईचे डोळे पाणावलेआंदोलनात युगचे वडील मुकेश चांडक आणि त्याची आई उपस्थित होती. युगच्या हत्येनंतर शहरातील हजारो बालक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहून युगच्या आईचे डोळे पाणावले आणि तिला आपला हुंदका आवरता आला नाही. माझा युग तर गेला परंतु इतर मुलांची सुरक्षा वाढविण्याची गरज असल्याचे तिने यावेळी सांगितले.दुसरा युग, कुश होऊ नयेहिवरीनगरच्या सेंट झेविअर्स स्कूलची विद्यार्थिनी दिव्या भाजीपाले हिने दुसऱ्यांना युग, कुशसारख्या घटना होऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. समाजात शांतता प्रस्थापित करून बालकांना सुरक्षा देण्यासाठी शासनाने कडक उपाययोजना करण्याची मागणी तिने केली.