शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वूई वाँन्ट जस्टीस...

By admin | Updated: November 26, 2014 01:07 IST

काहीच चूक नसताना मुलांना भीतीच्या वातावरणात वावरण्याची पाळी आली आहे. आधी कुश नंतर युग असे किती बळी गेल्यानंतर शासन यावर कठोर उपाययोजना करणार आहे,

बालकांची मानवी शृंखला : पंतप्रधानांना पाठविले १.१० लाख पत्रनागपूर : काहीच चूक नसताना मुलांना भीतीच्या वातावरणात वावरण्याची पाळी आली आहे. आधी कुश नंतर युग असे किती बळी गेल्यानंतर शासन यावर कठोर उपाययोजना करणार आहे, असा प्रश्न उपस्थित करून उपराजधानीतील ५० शाळांमधील हजारो बालकांनी आज ‘वुई वॉंट जस्टीस’चा सूर काढून वर्धा मार्ग दणाणून टाकला.आठ वर्षाच्या युग चांडक याचे अपहरण करून त्याची क्रूरपणे हत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या घटनेच्या तीन वर्षापूर्वी कुश कटारिया या आठ वर्षाच्या बालकाचीही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे बालकांच्या होत असलेल्या हत्येबाबत त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी सेंटर पॉईंट ग्रुप आॅफ स्कूल्स आणि युग फाऊंडेशनच्यावतीने आज लोकमत चौक ते पंचशील चौकादरम्यान मानवी शृंखला तयार करण्यात आली. यानिमित्त ‘युग की पुकार’ या संकल्पनेवर ५० शाळांमधील विद्यार्थ्यांनी चित्र साकारले. आंदोलनात १८ वर्षाखालील मुलांवर होणाऱ्या दुष्कृत्यांसाठी एका विशेष न्यायालयाचे गठन करून आरोपींना १०० दिवसाच्या आत कठोर शिक्षा करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनात उपस्थित विद्यार्थ्यांनी ‘काय कृती कराल तुम्ही जेंव्हा युगच्या जागेवर असू आम्ही’, ‘परत नको वार एकदाच करा निर्धार’, ‘आधी कुश आता युग, काय होती दोघांची चूक’, ‘हर बेटाबेटी अपनी हे सुरक्षा इनकी करनी है’, ‘बचपन सुरक्षित होगा तो देश सुरक्षित होगा’ असे वाक्य लिहिलेले फलक हातात घेऊन लक्ष वेधले. यावेळी समीर मेघे, माजी मंत्री अनिस अहमद, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय पाटील, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, माजी आमदार यादवराव देवगडे यांनी आंदोलनात भेट दिली. यशस्वितेसाठी प्रकल्प समन्वयक संजय वलीवकर, अरुण देव उपाध्याय, मुक्ता चॅटर्जी, डॉ. मुकेश चांडक यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)युगच्या आईचे डोळे पाणावलेआंदोलनात युगचे वडील मुकेश चांडक आणि त्याची आई उपस्थित होती. युगच्या हत्येनंतर शहरातील हजारो बालक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहून युगच्या आईचे डोळे पाणावले आणि तिला आपला हुंदका आवरता आला नाही. माझा युग तर गेला परंतु इतर मुलांची सुरक्षा वाढविण्याची गरज असल्याचे तिने यावेळी सांगितले.दुसरा युग, कुश होऊ नयेहिवरीनगरच्या सेंट झेविअर्स स्कूलची विद्यार्थिनी दिव्या भाजीपाले हिने दुसऱ्यांना युग, कुशसारख्या घटना होऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. समाजात शांतता प्रस्थापित करून बालकांना सुरक्षा देण्यासाठी शासनाने कडक उपाययोजना करण्याची मागणी तिने केली.