शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

हम लड़ेंगे और जीतेंगे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:40 IST

देश एकसंघ राहिला पाहिजे यासाठी इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले. त्या प्रभावशाली पंतप्रधान होत्या. भारत शक्तिशाली देश असल्याचा त्यांनी जगाला संदेश दिला.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचा निर्धार : इंदिरा गांधी जन्मशताब्दी सांगता सोहळा

ऑनलाईन लोकमत नागपूर : देश एकसंघ राहिला पाहिजे यासाठी इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले. त्या प्रभावशाली पंतप्रधान होत्या. भारत शक्तिशाली देश असल्याचा त्यांनी जगाला संदेश दिला. परंतु गेल्या तीन वर्षात देशातील लोकशाहीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाला एकसंघ ठेवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. १९७७ च्या पराभवानंतर इंदिरा गांधी यांनी नागपुरात ‘हम हारे तो क्या हुआ, फिर जितेंगे’ असा विश्वास व्यक्त केला होता. याच नागपुरात ‘हम लड़ेंगे और जीतेंगे’ असा निर्धार करून पुढील निवडणुकीत सरकारला खाली खेचा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केले.नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्यावतीने सिव्हील लाईन येथील चिटणवीस सेंटरच्या मैदानावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्मशताब्दी सांगता सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे, काँग्रेसचे विधानसभेचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, माजी मंत्री वसंत पुरके, राजेंद्र मुळक, माजी खासदार भीमराराज भाटी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी यांच्यासारख्या नेत्यांनी हा देश घडविला. परंतु शासनकर्ते सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून इतिहासात बदल करून या नेत्यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुस्तकातून पुसाल परंतु लोकांच्या मनातून या नेत्यांना पुसता येणार नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळे भाजपा हादरला आहे. गुजरात निवडणुकीत सोनिया गांंधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस शंभर टक्के निवडून येईल. या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये तळ ठोकून असल्याची टीका चव्हाण यांनी केली.देशात परिवर्तनाचे वारे सुरू झाले आहे. नांदेड, भिवंडी, मालेगाव, गुरुदासपूर व चित्रकूट येथील निकाल याचे द्योतक आहे. व्यापारीही आता‘कमल का फूल एकही भूल’ असे म्हणत आहे. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता. परंतु भाजपा सरकार गरिबाला हटविण्याचा प्रयत्न करीत आहे. इंदिराजींना कठीण काळात‘लोकमत’चे जाहीर आभारइंदिरा गांधी एकविसाव्या शतकातील वादळी व्यक्तिमत्त्व होते. या पोलादी महिलेच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘लोकमत’ने त्यांच्या जीवनावर आधारित विशेषांक काढला. या माध्यमातून नवीन पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली. या उपक्रमाचे कौतुक करून अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणातून लोकमतचे जाहीर आभार मानले.