शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

हम लड़ेंगे और जीतेंगे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:40 IST

देश एकसंघ राहिला पाहिजे यासाठी इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले. त्या प्रभावशाली पंतप्रधान होत्या. भारत शक्तिशाली देश असल्याचा त्यांनी जगाला संदेश दिला.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचा निर्धार : इंदिरा गांधी जन्मशताब्दी सांगता सोहळा

ऑनलाईन लोकमत नागपूर : देश एकसंघ राहिला पाहिजे यासाठी इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले. त्या प्रभावशाली पंतप्रधान होत्या. भारत शक्तिशाली देश असल्याचा त्यांनी जगाला संदेश दिला. परंतु गेल्या तीन वर्षात देशातील लोकशाहीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाला एकसंघ ठेवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. १९७७ च्या पराभवानंतर इंदिरा गांधी यांनी नागपुरात ‘हम हारे तो क्या हुआ, फिर जितेंगे’ असा विश्वास व्यक्त केला होता. याच नागपुरात ‘हम लड़ेंगे और जीतेंगे’ असा निर्धार करून पुढील निवडणुकीत सरकारला खाली खेचा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केले.नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्यावतीने सिव्हील लाईन येथील चिटणवीस सेंटरच्या मैदानावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्मशताब्दी सांगता सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे, काँग्रेसचे विधानसभेचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, माजी मंत्री वसंत पुरके, राजेंद्र मुळक, माजी खासदार भीमराराज भाटी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी यांच्यासारख्या नेत्यांनी हा देश घडविला. परंतु शासनकर्ते सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून इतिहासात बदल करून या नेत्यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुस्तकातून पुसाल परंतु लोकांच्या मनातून या नेत्यांना पुसता येणार नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळे भाजपा हादरला आहे. गुजरात निवडणुकीत सोनिया गांंधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस शंभर टक्के निवडून येईल. या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये तळ ठोकून असल्याची टीका चव्हाण यांनी केली.देशात परिवर्तनाचे वारे सुरू झाले आहे. नांदेड, भिवंडी, मालेगाव, गुरुदासपूर व चित्रकूट येथील निकाल याचे द्योतक आहे. व्यापारीही आता‘कमल का फूल एकही भूल’ असे म्हणत आहे. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता. परंतु भाजपा सरकार गरिबाला हटविण्याचा प्रयत्न करीत आहे. इंदिराजींना कठीण काळात‘लोकमत’चे जाहीर आभारइंदिरा गांधी एकविसाव्या शतकातील वादळी व्यक्तिमत्त्व होते. या पोलादी महिलेच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘लोकमत’ने त्यांच्या जीवनावर आधारित विशेषांक काढला. या माध्यमातून नवीन पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली. या उपक्रमाचे कौतुक करून अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणातून लोकमतचे जाहीर आभार मानले.