शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

'लोकप्रियतेच्या योजना नको, आर्थिक शिस्त हवी'; भास्कर जाधवांची सरकारवर टीका

By मंगेश व्यवहारे | Updated: December 21, 2024 12:19 IST

भास्कर जाधव यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सरकारवर केली. 

मंगेश व्यवहारे 

नागपूर : ‘निवडणुका जिंकण्यासाठी लोकप्रियतेच्या योजना लागू करायच्या आणि निवडणूक होताच तो पैसा जनतेवर वेगवेगळे कर लादून वसूल करायचा. याऐवजी राज्याला आर्थिक शिस्त लावायला हवी,’ अशी टीका शनिवारी शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सरकारवर केली. 

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अंमित दिनी भास्कर जाधव यांनी राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर तसेच बिनखात्याच्या ४१ मंत्र्यांवर कठोर शब्दांत टीका केली. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारकडून होणाऱ्या आर्थिक शिस्तीच्या अभावावर आणि अनावश्यक खर्चांवर चिंता व्यक्त केली. प्रकल्प, योजना यांवरील खर्च कमी होता कामा नये. यासाठी आर्थिक शिस्त आणण्याची गरज आहे. तसेच पुरवणी मागण्यासंदर्भात गोडबोले समितीच्या मार्गदर्शक तत्वानुसार, पुरवणी मागणी या अर्थसंकल्पाच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये. परंतु, सरकारने पुरवणी मागण्यांची मर्यादा ओलांडत वीस टक्क्यांपर्यंत नेली आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.’  मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मस्साजोग येथील सरपंचाच्या हत्येप्रकरणी दिलेल्या उत्तरामुळे मंत्री धनंजय मुंडे आज सभागृहात अवतरले असावेत, असा टोला त्यांनी लगावला. 

- सरकारमध्ये ४१ बिनखात्याचे मंत्री

विद्यमान सरकारने ४१ बिनखात्याचे मंत्री अधिवेशनकाळात काम करत असल्याचा अनोखा विक्रम नोंदविला आहे. अगदी दोन उपमुख्यंत्रीसुद्धा बिनखात्याचे आहेत. एकटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण कारभार चालवित आहेत. सरकारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले की ते लोकशाहीला मारक असते. त्यामुळे सत्तापक्ष मुजोर बनतो. तसे चित्र सध्या दिसून येत आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधव